शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहर खड्ड्यात; मनपा झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:57 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे. खड्ड्यांना औरंगाबादकर जाम वैतागले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुरूम आणि मातीने बुजविले होते. पावसामुळे ही माती केव्हाच वाहून गेली. छोटे छोटे खड्डे आता अधिक मोठे झाले असून, दुचाकी वाहनधारकांसाठी ते मृत्यूदूत बनून ठिकठिकाणी उभे आहेत. शहरात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली असतानाही मनपा प्रशासन झोपेत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पुढील कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी सुमारे ४० लाख देशी-विदेशी पर्यटक येतात. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येणाºया पाहुण्यांचा ओघही सतत कायम असतो. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादची ख्याती जगभर पसरलेली आहे. स्थानिक महापालिका प्रशासनामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. शहरात कोणत्याच मूलभूत सोयी- सुविधा नसल्याने शहरात आलेल्या पाहुण्यांना कशासाठी आपण आलो आहोत, असा प्रश्न पडतो. यंदा जून महिन्यात बºयापैकी पाऊस झाला. तेव्हाच खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नंतर गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. राजकीय दबावापोटी का होईना प्रशासनाने लाजत लाजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे मुरूम, खडी, मातीने बुजविले. मनपाच्या नऊ वॉर्ड कार्यालयांनी मिळून सुमारे ५ हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. या कामापोटी लाखो रुपयांचे बिलही तयार करण्यात आले.मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसाने महापालिकेने केलेले काम पूर्णपणे वाहून गेले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागतोय. चारचाकी वाहनांचे सस्पेन्शन बºयापैकी असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चारचाकी वाहनांमध्ये फिरतात. त्यामुळे त्यांनाही औरंगाबादकरांचे दु:ख कळायला तयार नाही.पावसाळा संपल्यावर तरी शहरातील खड्डे डांबराच्या साह्याने पॅचवर्क करून बुजविण्याची तूर्त कोणतीही योजना मनपा प्रशासनाकडे नाही. आणखी काही महिने औरंगाबादकरांना या मोठमोठ्या खड्ड्यांचा त्रास असाच सहन करावा लागणार हे निश्चित. मनपा प्रशासन आणि पदाधिकारी सध्या १०० कोटींच्या निविदा काढणे, कंत्राटदार ‘निश्चित’करणे यात व्यस्त आहे.