शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शहर खड्ड्यात; मनपा झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:57 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे. खड्ड्यांना औरंगाबादकर जाम वैतागले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुरूम आणि मातीने बुजविले होते. पावसामुळे ही माती केव्हाच वाहून गेली. छोटे छोटे खड्डे आता अधिक मोठे झाले असून, दुचाकी वाहनधारकांसाठी ते मृत्यूदूत बनून ठिकठिकाणी उभे आहेत. शहरात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली असतानाही मनपा प्रशासन झोपेत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पुढील कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी सुमारे ४० लाख देशी-विदेशी पर्यटक येतात. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येणाºया पाहुण्यांचा ओघही सतत कायम असतो. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादची ख्याती जगभर पसरलेली आहे. स्थानिक महापालिका प्रशासनामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. शहरात कोणत्याच मूलभूत सोयी- सुविधा नसल्याने शहरात आलेल्या पाहुण्यांना कशासाठी आपण आलो आहोत, असा प्रश्न पडतो. यंदा जून महिन्यात बºयापैकी पाऊस झाला. तेव्हाच खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नंतर गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. राजकीय दबावापोटी का होईना प्रशासनाने लाजत लाजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे मुरूम, खडी, मातीने बुजविले. मनपाच्या नऊ वॉर्ड कार्यालयांनी मिळून सुमारे ५ हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. या कामापोटी लाखो रुपयांचे बिलही तयार करण्यात आले.मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसाने महापालिकेने केलेले काम पूर्णपणे वाहून गेले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागतोय. चारचाकी वाहनांचे सस्पेन्शन बºयापैकी असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चारचाकी वाहनांमध्ये फिरतात. त्यामुळे त्यांनाही औरंगाबादकरांचे दु:ख कळायला तयार नाही.पावसाळा संपल्यावर तरी शहरातील खड्डे डांबराच्या साह्याने पॅचवर्क करून बुजविण्याची तूर्त कोणतीही योजना मनपा प्रशासनाकडे नाही. आणखी काही महिने औरंगाबादकरांना या मोठमोठ्या खड्ड्यांचा त्रास असाच सहन करावा लागणार हे निश्चित. मनपा प्रशासन आणि पदाधिकारी सध्या १०० कोटींच्या निविदा काढणे, कंत्राटदार ‘निश्चित’करणे यात व्यस्त आहे.