शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

शहर खड्ड्यात; मनपा झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:57 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे. खड्ड्यांना औरंगाबादकर जाम वैतागले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुरूम आणि मातीने बुजविले होते. पावसामुळे ही माती केव्हाच वाहून गेली. छोटे छोटे खड्डे आता अधिक मोठे झाले असून, दुचाकी वाहनधारकांसाठी ते मृत्यूदूत बनून ठिकठिकाणी उभे आहेत. शहरात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली असतानाही मनपा प्रशासन झोपेत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पुढील कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी सुमारे ४० लाख देशी-विदेशी पर्यटक येतात. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येणाºया पाहुण्यांचा ओघही सतत कायम असतो. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादची ख्याती जगभर पसरलेली आहे. स्थानिक महापालिका प्रशासनामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. शहरात कोणत्याच मूलभूत सोयी- सुविधा नसल्याने शहरात आलेल्या पाहुण्यांना कशासाठी आपण आलो आहोत, असा प्रश्न पडतो. यंदा जून महिन्यात बºयापैकी पाऊस झाला. तेव्हाच खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नंतर गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. राजकीय दबावापोटी का होईना प्रशासनाने लाजत लाजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे मुरूम, खडी, मातीने बुजविले. मनपाच्या नऊ वॉर्ड कार्यालयांनी मिळून सुमारे ५ हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. या कामापोटी लाखो रुपयांचे बिलही तयार करण्यात आले.मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसाने महापालिकेने केलेले काम पूर्णपणे वाहून गेले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागतोय. चारचाकी वाहनांचे सस्पेन्शन बºयापैकी असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चारचाकी वाहनांमध्ये फिरतात. त्यामुळे त्यांनाही औरंगाबादकरांचे दु:ख कळायला तयार नाही.पावसाळा संपल्यावर तरी शहरातील खड्डे डांबराच्या साह्याने पॅचवर्क करून बुजविण्याची तूर्त कोणतीही योजना मनपा प्रशासनाकडे नाही. आणखी काही महिने औरंगाबादकरांना या मोठमोठ्या खड्ड्यांचा त्रास असाच सहन करावा लागणार हे निश्चित. मनपा प्रशासन आणि पदाधिकारी सध्या १०० कोटींच्या निविदा काढणे, कंत्राटदार ‘निश्चित’करणे यात व्यस्त आहे.