शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शहर खड्ड्यात; मनपा झोपेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:57 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पावसाळा सुरू झाल्यापासून शहरात खड्ड्यांचा मुद्दा गाजतोय. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण शहरच खड्डेमय बनले आहे. खड्ड्यांना औरंगाबादकर जाम वैतागले आहेत. गणेश विसर्जनासाठी महापालिकेने शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे मुरूम आणि मातीने बुजविले होते. पावसामुळे ही माती केव्हाच वाहून गेली. छोटे छोटे खड्डे आता अधिक मोठे झाले असून, दुचाकी वाहनधारकांसाठी ते मृत्यूदूत बनून ठिकठिकाणी उभे आहेत. शहरात खड्ड्यांची परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली असतानाही मनपा प्रशासन झोपेत आहे. खड्डे बुजविण्यासाठी पुढील कोणतेही नियोजन प्रशासनाकडे नाही.पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात दरवर्षी सुमारे ४० लाख देशी-विदेशी पर्यटक येतात. उद्योगधंद्यांच्या निमित्ताने येणाºया पाहुण्यांचा ओघही सतत कायम असतो. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ या पर्यटन स्थळांमुळे औरंगाबादची ख्याती जगभर पसरलेली आहे. स्थानिक महापालिका प्रशासनामुळे पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. शहरात कोणत्याच मूलभूत सोयी- सुविधा नसल्याने शहरात आलेल्या पाहुण्यांना कशासाठी आपण आलो आहोत, असा प्रश्न पडतो. यंदा जून महिन्यात बºयापैकी पाऊस झाला. तेव्हाच खड्ड्यांचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, महापालिका प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नंतर गणेशोत्सवानिमित्त खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला. राजकीय दबावापोटी का होईना प्रशासनाने लाजत लाजत गणेश विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गांवरील खड्डे मुरूम, खडी, मातीने बुजविले. मनपाच्या नऊ वॉर्ड कार्यालयांनी मिळून सुमारे ५ हजारांहून अधिक खड्डे बुजविल्याचा दावा करण्यात आला. या कामापोटी लाखो रुपयांचे बिलही तयार करण्यात आले.मागील काही दिवसांमध्ये झालेल्या संततधार पावसाने महापालिकेने केलेले काम पूर्णपणे वाहून गेले. शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या खड्ड्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकी वाहनधारकांना सहन करावा लागतोय. चारचाकी वाहनांचे सस्पेन्शन बºयापैकी असते. त्यामुळे त्यांना फारसा त्रास जाणवत नाही. महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी चारचाकी वाहनांमध्ये फिरतात. त्यामुळे त्यांनाही औरंगाबादकरांचे दु:ख कळायला तयार नाही.पावसाळा संपल्यावर तरी शहरातील खड्डे डांबराच्या साह्याने पॅचवर्क करून बुजविण्याची तूर्त कोणतीही योजना मनपा प्रशासनाकडे नाही. आणखी काही महिने औरंगाबादकरांना या मोठमोठ्या खड्ड्यांचा त्रास असाच सहन करावा लागणार हे निश्चित. मनपा प्रशासन आणि पदाधिकारी सध्या १०० कोटींच्या निविदा काढणे, कंत्राटदार ‘निश्चित’करणे यात व्यस्त आहे.