शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शाळा सिद्धी उपक्रमात जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर

By admin | Updated: March 5, 2017 00:26 IST

जालना : शाळा सिद्धि उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल २२७० शाळांनी २८ फेब्रुवारी अंतिम मुदतीत आॅनलाईन माहिती भरल्याने जिल्हा स्वयंमूल्यमापनात राज्यात दुसरा क्रमांकावर आहे.

जालना : शालेय शिक्षण विभागाने हाती घेतलेल्या शाळा सिद्धि उपक्रमात जिल्ह्यातील तब्बल २२७० शाळांनी २८ फेब्रुवारी अंतिम मुदतीत आॅनलाईन माहिती भरल्याने जिल्हा स्वयंमूल्यमापनात राज्यात दुसरा क्रमांकावर आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता वाढावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. यात डिजीटल क्लास रूम, ज्ञानरचनावाद, शैक्षणीक साहित्य निर्मीती, नवोपक्रम, प्रशिक्षण, प्रदर्शन सादरीकरण, नाविण्य उपक्रम, अध्ययन, अध्यापन, कृतीशील अध्ययन पध्दती यासह संगणक प्रणालीच्या माध्यमातून शाळा शिक्षण विद्यार्थ्यांची माहिती आॅनलाईन भरून घेणे आदी उपक्रम शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यातच नव्याने शाळा सिध्दी उप्रकमांची शिक्षण विभागाकडून भर घातली आहे. शाळेत असणाऱ्या भौतिक सुविधा, मनुष्यबळ, अध्ययन अध्यापक, माहितीची उपलब्धता कशी आहे. याची तपासणी शाळेचे क्रीडागण, उपक्रमे, साहित्य, वर्गखोल्या,वीज व विद्युत उपकरण, ग्रथालय, प्रयोगशाळा, संगणक उतरता रस्ता, मध्यान्ह भोजन, स्वयंपाक खोली, त्यातील भांडी, पेयजल व्यवस्था, विद्यार्थ्यांना हात धुण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह आदी मानकाच्या आधारे स्वयंमुल्यमापनाच्या माध्यमातून शाळेची सविस्तर माहिती सादर करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे निर्दश होते. यात जालना जिल्ह्यातील २३६२ शाळापैकी २२७० शाळांनी आपली अपडेट माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आॅनलाईन पाठविली आल्याने राज्यातून जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. (प्रतिनिधी)