शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
4
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
5
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
6
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
7
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
8
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
9
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
10
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
11
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
12
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
13
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
14
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
15
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
16
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
17
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
18
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
19
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
20
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!

‘समृद्धी’साठी जिल्ह्याला १३०० कोटींची गरज!

By admin | Updated: June 28, 2017 00:50 IST

औरंगाबाद : समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६०० हेक्टर जमिनीची दरनिश्चिती आता पूर्णत्वाकडे असून, दि. २९ जून रोजी हा दर जाहीर होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समृद्धी महामार्गासाठी संपादित करावयाच्या औरंगाबाद जिल्ह्यातील १६०० हेक्टर जमिनीची दरनिश्चिती आता पूर्णत्वाकडे असून, दि. २९ जून रोजी हा दर जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी सुमारे बाराशे ते तेराशे कोटी रुपयांची गरज असेल. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज यासंदर्भात सूतोवाच केले व पत्रकारांशी संवाद साधला. मोबदल्यासंदर्भातही आक्षेप स्वीकारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी जिरायती दाखवल्या जात असल्याची तक्रार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली होती. यासंदर्भात नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले की, असा प्रकार झाला असेल तर त्याची चौकशी केली जाईल. मोबदला निश्चित झाल्यानंतर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाईल व मोबदल्याविषयी काही आक्षेप असल्यास तक्रार करता येईल. त्यामुळे बागायती-जिरायतीबाबत शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यातील औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील १६०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता दरनिश्चितीही अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी १९५० पासूनच्या जमिनीच्या टायटलची तपासणी केली जात आहे. दरनिश्चिती करताना शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.