शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

दोन टक्के पाणीसाठ्यावरच जिल्ह्याची मदार

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण संख्या १४२ आहे. यापैकी केवळ ६४ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी आहे. यातील काही प्रकल्पात गाळमिश्रीत पाणी असल्याने ते पिण्यायोग्य नाही. भर पावसाळ्यात सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याची मागील तीन दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंचन प्रकल्पांध्ये केवळ दोन टक्के साठा शिल्लक राहिल्याने आता पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरची संख्या ५५० वरजिल्ह्यात पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येत आहे. सद्य स्थितीत ५६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. एकट्या आष्टी तालुक्यासाठी १२५ टँकर लावण्यात आलेले आहेत. बीड ९८, गेवराई ९३, वडवणी ६, शिरूर कासार ३९, पाटोदा २५, अंबाजोगाई ५, केज ५०, परळी १८, धारूर २१, माजलगाव ३७ एवढ्या टँकरद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागात पाटोदा १, केज १५, आष्टी १७, शिरूर कासार ३, धारूर १५ याप्रमाणे ४९ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.आगामी काळात पाऊस पडला नाही तर भर पावसाळ्यात ८५० च्या जवळपास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)