बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण संख्या १४२ आहे. यापैकी केवळ ६४ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी आहे. यातील काही प्रकल्पात गाळमिश्रीत पाणी असल्याने ते पिण्यायोग्य नाही. भर पावसाळ्यात सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याची मागील तीन दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंचन प्रकल्पांध्ये केवळ दोन टक्के साठा शिल्लक राहिल्याने आता पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरची संख्या ५५० वरजिल्ह्यात पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येत आहे. सद्य स्थितीत ५६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. एकट्या आष्टी तालुक्यासाठी १२५ टँकर लावण्यात आलेले आहेत. बीड ९८, गेवराई ९३, वडवणी ६, शिरूर कासार ३९, पाटोदा २५, अंबाजोगाई ५, केज ५०, परळी १८, धारूर २१, माजलगाव ३७ एवढ्या टँकरद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागात पाटोदा १, केज १५, आष्टी १७, शिरूर कासार ३, धारूर १५ याप्रमाणे ४९ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.आगामी काळात पाऊस पडला नाही तर भर पावसाळ्यात ८५० च्या जवळपास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)
दोन टक्के पाणीसाठ्यावरच जिल्ह्याची मदार
By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST