शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

दोन टक्के पाणीसाठ्यावरच जिल्ह्याची मदार

By admin | Updated: August 26, 2015 00:29 IST

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.

बीड : जनावरांच्या चाऱ्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात केवळ २ टक्के एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिला असल्याने प्रशासन देखील चिंताक्रांत आहे.जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्पांची एकूण संख्या १४२ आहे. यापैकी केवळ ६४ प्रकल्पांमध्ये जोत्याखाली पाणी आहे. यातील काही प्रकल्पात गाळमिश्रीत पाणी असल्याने ते पिण्यायोग्य नाही. भर पावसाळ्यात सिंचन प्रकल्प कोरडेठाक पडण्याची मागील तीन दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे जलतज्ज्ञांचे म्हणणे आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली असून हंडाभर पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सिंचन प्रकल्पांध्ये केवळ दोन टक्के साठा शिल्लक राहिल्याने आता पिण्यासाठी पाणी आणायचे कोठून ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. टँकरची संख्या ५५० वरजिल्ह्यात पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवण्यात येत आहे. सद्य स्थितीत ५६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. एकट्या आष्टी तालुक्यासाठी १२५ टँकर लावण्यात आलेले आहेत. बीड ९८, गेवराई ९३, वडवणी ६, शिरूर कासार ३९, पाटोदा २५, अंबाजोगाई ५, केज ५०, परळी १८, धारूर २१, माजलगाव ३७ एवढ्या टँकरद्वारे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागात पाटोदा १, केज १५, आष्टी १७, शिरूर कासार ३, धारूर १५ याप्रमाणे ४९ टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे.आगामी काळात पाऊस पडला नाही तर भर पावसाळ्यात ८५० च्या जवळपास टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊ शकते. (प्रतिनिधी)