शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ८ लाख ८३ हजार ऐतखाऊ

By admin | Updated: October 22, 2014 01:17 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद इच्छा असूनही हाताला काम मिळत नसेल अथवा काम असूनही ते करण्याची इच्छा नसेल. कारण काहीही असो जिल्ह्यातील तब्बल ८ लाख ८३ हजार ६६० जण कसलेही काम करीत

विशाल सोनटक्के , उस्मानाबादइच्छा असूनही हाताला काम मिळत नसेल अथवा काम असूनही ते करण्याची इच्छा नसेल. कारण काहीही असो जिल्ह्यातील तब्बल ८ लाख ८३ हजार ६६० जण कसलेही काम करीत नसल्याचे नुकत्याच झालेल्या पाहणीत आढळून आले आहे. एकूणच काम न करणारा ५३.३१ टक्के वर्ग काम करणाऱ्या ४६.६९ टक्के लोकांवर अवलंबून असल्याचेही या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.एखाद्याच्या घरातील कितीजण कार्यरत राहतात यावर त्या कुटुंबाची आर्थिक प्रगती दिसून येते. हीच बाब एखादे गाव, तालुका तसेच जिल्ह्यालाही लागू पडते. उद्योग, व्यवसायाची संधी सहज मिळत नसली तरी अनेकजण प्रयत्नांची पराकाष्टा करुन रोजगाराचे साधन मिळवितात. मात्र अनेकांना संधी असूनही ती मिळविण्यासाठी ते धडपड करतातच असे नाही. पर्यायाने जो वर्ग काम करतो त्याला या नाकर्त्यांचा भार सोसावा लागतो. पर्यायाने आर्थिक उन्नतीमध्ये कुटुंब मागे पडते. हाच नियम एखाद्या गावाला आणि जिल्ह्यालाही लागू होतो. उस्मानाबाद जिल्ह्याचा विचार करता २०११ मध्ये जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न ४८,८८७ इतके होते. ते २०१२ मध्ये ५४,८३३ वर पोहोचले. मात्र राज्याच्या दरडोई उत्पन्नाशी उस्मानाबाद जिल्ह्याची तुलना करता, मोठी तफावत असल्याचे दिसून येते. २०१२ मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न १,०५,६२३ इतके होते. म्हणजेच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न हे राज्याच्या दरडोई उत्पन्नाच्या निम्मे असल्याचे दिसून येते. दरडोई उत्पन्न कमी होण्यासाठी अनेक कारणे असली तरी माणसाची कार्यप्रवणता यामध्ये महत्वाचा घटक आहे. आणि यामध्येच जिल्हावासीय कमी पडत असल्याचे दिसून येते.उस्मानाबाद जिल्ह्याची मदार आजही शेतीवरच अवलंबून आहे. त्यामुळे काम करणाऱ्या वर्गामध्ये शेतकरी आणि शेतमजुरांची संख्या इतर उद्योगाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात २८ लाख ४ हजार २३५ शेतकरी असून, हे सर्वजण काम करणाऱ्या वर्गात मोडतात. यापाठोपाठ क्रमांक लागतो तो शेतमजुरांचा जिल्ह्यात विविध ठिकाणी २ लाख ६५ हजार १६७ मजूर शेतीकामामध्ये स्वत:ला जुंपून घेतात. तर छोट्या मोठ्या वस्तूंच्या निर्मितीचे तसेच दुरुस्तीबरोबरच घरगुती उद्योग करणाराही मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. असे १५ हजार २६१ जण विविध मार्गाद्वारे कार्यप्रवण असून, इतर प्रकारे काम करणाऱ्यांची संख्या १ लाख ३७ हजार २३१ एवढी असल्याचे ही आकडेवारी सांगते. अशा पद्धतीने मुख्य व सिमांतिक काम करणाऱ्यांची जिल्ह्यातील एकूण संख्या ७ लाख ७३ हजार ९१६ एवढी असून, त्यांची टक्केवारी ४६.६९ एवढी होते. मात्र काम न करणाऱ्यांची संख्या यापेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात तब्बल ८ लाख ८३ हजार ६६० जण काहीही काम करीत नसून, अंशाची टक्केवारी ५३.३१ टक्के आहे. म्हणजेच काम करणाऱ्या ४६.६९ टक्के लोकांवर या काम न करणाऱ्या ५३.३१ टक्के लोकांचा भार असल्याचे दिसून येते. एकूणच जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढवायचे असेल तर बेरोजगारांच्या हातांना काम देण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.