शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जिल्ह्यात १३ हजार क्विंटल तूर शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 23:50 IST

परभणी : १० जूनपासून तूर खरेदी बंद झाल्याने १३ हजार क्विंटल तुरीच्या खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शासनाने आतापर्यंत परभणी जिल्ह्यामधून १ लाख ७२ हजार क्विंटल तुरीची खरेदी केली असली तरी १० जूनपासून तूर खरेदी बंद झाल्याने १३ हजार क्विंटल तुरीच्या खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे़ खरेदीला मुदतवाढ मिळते की नाही? याविषयी साशंकता निर्माण झाल्याने तूर उत्पादक हवालदिल झाले आहेत़ परभणी, मानवत, गंगाखेड, जिंतूर आणि सेलू या पाच तालुक्यांमध्ये हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू करून शासनाने तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला़ मात्र केंद्र सुरू झाल्यापासून या केंद्रावरील गोंधळ सुरूच राहिला़ केंद्र शासनाच्या नाफेड या एजन्सीने आणि काही तूर राज्य शासनाने खरेदी केली आहे़ २७ डिसेंबर २०१६ रोजी खरेदी केंद्र सुरू झाले़ मात्र सुरुवातीला बारदान्याची टंचाई, त्यानंतर साठवणुकीचा प्रश्न आणि काटे कमी असल्याने खरेदी केंद्रावर गोंधळाची स्थिती पहावयास मिळाली़ या केंद्रावरील तूर घेऊन आलेल्या वाहनांच्या रांगा शेवटपर्यंत कायम राहिल्या़ तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता १० जून रोजी जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद केले आहेत़ हे केंद्र बंद झाल्यानंतरही गंगाखेड आणि परभणीच्या खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा कायम आहेत़ त्यामुळे या तुरीचे करायचे काय? असा प्रश्न उभा टाकला आहे़ जिल्ह्यातील पाचही केंद्रांवर १ लाख ७२ हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे़ जिल्ह्यामध्ये विक्रमी तूर उत्पादन झाले असून, शासनाने देखील तुरीची विक्रमी खरेदी केली आहे़ असे असले तरी अजून सुमारे १३ हजार क्विंटल तूर खरेदी करणे बाकी आहे़ विशेष म्हणजे, केंद्र बंद होण्यापूर्वी ही वाहने केंद्रासमोर रांगेत उभी आहेत़ त्यामुळे या तुरीच्या खरेदीची जबाबदारी शासनाचीच असून, शासन आता या प्रश्नी काय निर्णय घते, याकडे उत्पादकांचे लक्ष लागले आहे़