शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

जिल्हाधिकाऱ्यांच्या मोबाईल सेवेचा फज्जा

By admin | Updated: May 18, 2017 00:19 IST

लातूर : ‘मी दौऱ्यावर असलो, आपली भेट होऊ शकली नाही तर मोबाईल नंबरवर संपर्क साधा, असा फलक नूतन जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी दालनाबाहेर लावला आहे़ मात्र पहिल्याच दिवशी या सेवेचा फज्जा उडाला

दत्ता थोरे । लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : ‘मी दौऱ्यावर असलो, आपली भेट होऊ शकली नाही तर थेट ९९२१०४४४६६ या मोबाईल नंबरवर संपर्क साधा, असा मोठा फलक नूतन जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांनी दालनाबाहेर लावला आहे़ मात्र पहिल्याच दिवशी या सेवेचा फज्जा उडाला असून, ‘लोकमत’ने १२ वेळा वेगवेगळ्या नंबरवरून कॉल केला व एक वेळा संदेश पाठवून सेवेची सतर्कता जाणून घेण्याचा प्रयत्न केला़ मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळू शकला नाही़ स्वत:हून सार्वजनिक केलेल्या मोबाईल सेवेचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला़जिल्हाधिकारी जी़श्रीकांत बुधवारी शहरात होते़ जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या दालनात ३़३० पर्यंत असल्याचे त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी सांगितले़ ४ नंतर मात्र ते कार्यालयात नव्हते़ दौऱ्यावर असतील असे समजून, ‘लोकमत’ने त्यांनी जनतेसाठी खुल्या केलेल्या मोबाईल नंबरवर कॉल केला़ मात्र त्यांच्याकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही़ ‘लोकमत’चा प्रतिनिधी असल्याचा मॅसेजही पाठविण्यात आला़ मात्र नूतन जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्याकडून या संदेशालाही प्रतिसाद मिळाला नाही़ विशेष म्हणजे त्यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून पदभार घेतल्यानंतर आपल्या दालनाच्या बाहेर मोठा फलक लावला आहे़ या फलकावर ‘मी दौऱ्यावर असल्यास, आपली भेट न झाल्यास थेट ९९२१०४४४६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा़ निवेदन द्यायचे असेल तर याच मोबाईल नंबरच्या व्हॉट्सअ‍ॅपवर टाकावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे़ त्यामुळे ‘लोकमत’ने जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाचे कौतूक केले़ ‘असा सेवा देणारा लातूरचा पहिला जिल्हाधिकारी असल्याची बातमी प्रसिद्ध केली़’ मात्र ‘लोकमत’ प्रतिनिधींनी ९९२२९३०२०८, ९४२१५९८९९२, ८६६८७६९८२७, ९०४९०७२७७८, ९७६५६६०१०७ या क्रमांकांच्या मोबाईलवरून जिल्हाधिकारी जी़ श्रीकांत यांच्याशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ वारंवार रिंग दिली़ १२ वेळा कॉल केला़ परंतु, जिल्हाधिकाऱ्यांकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही़ त्यांच्या या सार्वजनिक सेवेचा फज्जाच दिसला़ विशेष म्हणजे यापूर्वीचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी आपला मोबाईल नंबर सार्वजनिक केला नसला तरी त्यांच्या मोबाईलवर रिंग गेल्यानंतर किंवा ते कामात व्यस्त असल्यामुळे मोबाईल उचलू शकले नसले तर त्यांचा मॅसेज किंवा प्रतिकॉल यायचा़ याचा त्यांनी गवगवाही केला नाही़ पण कामाची व्यस्तता संपल्यास प्रतिकॉल नक्की यायचा़ मात्र नूतन जिल्हाधिकाऱ्यांनी आपला मोबाईल स्वत:हून सार्वजनिक करून तो उचलला नाही की प्रतिकॉल केला नाही़ त्यामुळे हा त्यांचा स्टंट आहे, की ते खरेच कामात होते, याचे उत्तर त्यांनी मोबाईल न उचलल्यामुळे जाणून घेता आले नाही़ जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर लावलेल्या सूचना फलकावरील त्यांचा मोबाईल नंबर सेव्ह करण्यासाठी बुधवारीही कार्यालयाबाहेर नागरिक दिसले़