शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

खदानींच्या मोजणीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By admin | Updated: December 16, 2015 00:14 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सरकारी आणि गायरान जमिनीवरील १०४ खदानींची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि खनिकर्म अधिकाऱ्यांना सोमवारी एका बैठकीत दिले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सरकारी आणि गायरान जमिनीवरील १०४ खदानींची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि खनिकर्म अधिकाऱ्यांना सोमवारी एका बैठकीत दिले. वाळू, मुरूम आणि दगडाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली असून, ही पथके २४ तास गस्तीवर राहतील, असा दावा करण्यात आला आहे. खदानींची मोजणी करण्यासाठी ८ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. तालुका आणि जिल्हास्तरावर हे पथक कार्यरत राहणार असून वाळू, मुरूम आणि दगडाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाईल. या वाहनधारकांकडे पावती नसेल तर ते वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी दिली. जिल्ह्यातील खाजगी २४ क्रशर आणि खदानींच्या तपासणी अहवालात गैरप्रकार झाल्याचे आढळून आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी आणि गायरान जमिनीवर असलेल्या १०४ खदानींची तपासणी करण्याचा निर्णय सोमवारी एका बैठकीत घेतला. या खदानींची गौण खनिज विभागाचे अधिकारी टोटल मशीनद्वारे मोजणी करून तपासणी करतील. त्यांना उपविभागीय अधिकारी, तहसीलदार हे मदत करणार असून, गायरान आणि सरकारी जमिनीवरील खदानींची मोजणी पूर्ण केल्यानंतरच त्यांचे परवाने दिले जातील. आठ महिन्यांत १८ कोटींची वसुली गौण खनिज विभागाने ८ महिन्यांत वाळूपट्ट्यांच्या लिलावातून आणि क्रशर, खदान मालकांकडून रॉयल्टीमधून १८ कोटी ४४ लाख २६ हजार रुपयांची वसुली केली आहे. मागील वर्षी ही वसुली ८ कोटी ४३ लाख इतकी होती. यावर्षी सरकारने ६० कोटींचे उद्दिष्ट दिले असून, अद्याप वाळूपट्ट्यांचे लिलाव झालेले नाहीत. मार्चअखेरपर्यंत ४० कोटींची वसुली करणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे यांनी सांगितले.