शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आर्थिक मदतीसाठी जिल्हा कचेरीवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 00:10 IST

शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरुन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. त्यांना आर्थिक मदत करावी, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा कचेरीवर श्रावस्तीनगर, सादतनगर, नारायणनगर आदी भागांतील नागरिकांनी मोर्चा काढला.शहरात २० आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांतील घरांमध्ये पाणी शिरले होते. चुन्ना नाल्याला आलेल्या पुराचे पाणी श्रावस्तीनगर, सादतनगर, तेहरानगर, राऊत कॉलनी, शिल्पकारनगर, नारायणनगर, नवीन श्रावस्तीनगर, सावित्रीबाई फुलेनगर, जयभीमनगर आदी भागांतील नागरिकांच्या घरात शिरले. त्यामुळे त्यांचे संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य, मौल्यवान वस्तू वाहून गेल्या. यामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने या बाबीची दखल घेतली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. आजही अनेक नागरिक प्रशासनाने केलेल्या निवाºयामध्ये आहेत. या भागातील नागरिकांना त्वरित मदत द्यावी, बेघरांना घरे द्यावीत, येथील नागरिकांचे पुनर्वसन करावे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी अशोक काकांडीकर, पद्माकर सोनकांबळे, साहेबराव चौदंते, भीमराव क्षीरसागर, रवी सोनसळे, अ.रईस, युनसू आदींची उपस्थिती होती.