शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँक निवडणूक : तीन पॅनेलची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किमान तीन पॅनेल निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अब्दुल सत्तार, संदिपान ...

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत किमान तीन पॅनेल निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, हरिभाऊ बागडे आणि नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनेल, डॉ. कल्याण काळे, सुभाष झांबड, कैलास पाटील व अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनेल असे मिळून दोन पॅनेल उभे राहण्याची चर्चा होत होती. परंतु अंबादास मानकापे पाटील यांच्या नेतृत्वाखाली एका तिसऱ्या पॅनेलची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे व अब्दुल सत्तार हे भाजपचे हरिभाऊ बागडे व नितीन पाटील यांच्याबरोबर आहेत. राष्ट्रवादीचे अभिजित देशमुखही त्यांच्या बरोबरच आहेत. अब्दुल सत्तार यांनी आपल्या मर्जीतले उमेदवार प्रत्येक मतदारसंघातून उभे केले असल्याची चर्चा आहे.

आदर्श सहकारी बँकेचे अंबादास मानकापे पाटील यांनी विविध मतदारसंघांतून आपली माणसे उभी केली आहेत. तीच तीच माणसे, तेच तेच नात्यागोत्याचे राजकारण याला छेद देण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच बँकेच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

डॉ. कल्याण काळे यांच्यासमवेत किरण पाटील-डोणगावकर, रवींद्र काळे, जगन्नाथ काळे ही मंडळी परिश्रम घेताना दिसत आहे.

अर्जांच्या छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली. वास्तविक ही यादी कालच प्रसिद्ध व्हायला हवी होती. बुधवारी दुपारी ३ ऐवजी सायंकाळी ५ वाजता यादी बँकेच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली. हा विलंब कशासाठी होता, याची उलट-सुलट चर्चा होत होती.

दुसरे म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेचे कामकाज बँकेच्या कार्यालयातूनच होत आहे. यापूर्वी असे कधी घडले नव्हते. पहिल्यांदाच प्रथा खंडित झाली. सहकार खात्याच्या जिल्हा प्रबंधकांच्या कार्यालयातून निर्वाचन अधिकाऱ्याने निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे, असे जाणकारांचे मत पडले.

आचारसंहिता लागू असतानाही बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या कार्यालयातून बैठका होणे, चर्चा होणे यालाही काहीजणांचा आक्षेप आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयातूनच अर्ज भरणे, छाननी करणे,अर्ज मागे घेणे ही प्रक्रिया राबवावयास हवी होती, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.