शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

जिल्हा प्रशासन गाळ काढणार

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

जालना : जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता जिल्हा प्रशासनाद्वारे विविध विभाग व संस्था,

जालना : जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता जिल्हा प्रशासनाद्वारे विविध विभाग व संस्था, संघटनांच्या सहकार्याने मोठी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा दुष्काळी स्थिती अनुभवत आहे. याही वर्षी अल्पशा पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी सदृश्य स्थिती गंभीर बनली आहे. विशेषत: खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रबी पेरण्याही खोळंबल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नायक यांनी नमूद केले. जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळेच टंचाईचे संकट उभे राहिल, अशी चिन्हे दिसत असल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी नायक यांनी जानेवारीपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्याच्या तीनचार महिन्यात टंचाई जाणवेल, असा अंदाज व्यक्त करीत नायक यांनी टंचाई निवारणाच्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी कोरड्याठाक पडलेल्या प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता मोहीम राबविण्यात आली. याही वर्षी गाळ काढणीकरता युद्धपातळीवर लोकसहभागातून मोठी मोहीम राबविली जाईल, अशी माहिती दिली. प्रशासनाने सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य संस्था व संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे ठरविल्याचे नायक यांनी म्हटले. रोहयोतूनकाही लघू प्रकल्पातील गाळ अकुशल मजुरांद्वारे काढला जाणार आहेत. मोठ्या प्रकल्पातून गाळ काढण्याकरीता मशिनरींचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळे आवश्यक ती मशिनरी उपलब्ध करून दिली जाईल व प्रत्येक तालुक्यात या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप यावे, म्हणून सर्वार्थांने प्रयत्न केले जातील.४संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात वैरण विकासाचा एक अभिनव प्रयोग राबविला जाणार असल्याचे नायक यांनी म्हटले. विशेषत: प्रकल्प परिसरात गाळ पेरणीतून चारा उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. घाणेवाडी, पीरकल्याण तसेच बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पाच्या परिसरात वैरण विकासाचा कार्यक्रम युद्धपातळीवर घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करीत त्याअनुषंगाने नियोजनही करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. सलमान खान फाऊंडेशन, जिल्हा नियोजन समिती व उद्योजकांकडून ग्रामीण भागात गेल्यावर्षी दिलेल्या पाण्याच्या टाक्या जमा केल्या जाणार असून त्या टाक्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जाणार असल्याचे नायक यांनी म्हटले. ४लोअर दुधना व जुई धरणातील पाणीसाठ्याचा टंचाईच्या या पार्श्वभूमीवर मोठा उपयोग घेता येईल, असा विश्वास नायक यांनी व्यक्त केला. परतूर व मंठा या दोन तालुक्यांसह घनसावंगी तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यासाठी लोअर दुधना प्रकल्प टँकर पॉईन्ट ठरविता येईल. तसेच जुईतूनही जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणी देता येईल, असे ते म्हणाले. यासंबंधीचे नियोजन करण्यात येत असून त्यादृष्टीने संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.