शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा प्रशासन गाळ काढणार

By admin | Updated: November 14, 2014 00:53 IST

जालना : जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता जिल्हा प्रशासनाद्वारे विविध विभाग व संस्था,

जालना : जिल्ह्यातील कोरडेठाक पडलेल्या लघू व मध्यम सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता जिल्हा प्रशासनाद्वारे विविध विभाग व संस्था, संघटनांच्या सहकार्याने मोठी मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा दुष्काळी स्थिती अनुभवत आहे. याही वर्षी अल्पशा पावसाने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी सदृश्य स्थिती गंभीर बनली आहे. विशेषत: खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून रबी पेरण्याही खोळंबल्या आहेत, असे जिल्हाधिकारी नायक यांनी नमूद केले. जमिनीतील पाणी पातळी खोलवर गेल्यामुळेच टंचाईचे संकट उभे राहिल, अशी चिन्हे दिसत असल्याचे स्पष्ट करीत जिल्हाधिकारी नायक यांनी जानेवारीपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचे ते म्हणाले. उन्हाळ्याच्या तीनचार महिन्यात टंचाई जाणवेल, असा अंदाज व्यक्त करीत नायक यांनी टंचाई निवारणाच्या उपाययोजना अंमलात आणल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला. दोन वर्षांपूर्वी कोरड्याठाक पडलेल्या प्रकल्पातील गाळ काढण्याकरीता मोहीम राबविण्यात आली. याही वर्षी गाळ काढणीकरता युद्धपातळीवर लोकसहभागातून मोठी मोहीम राबविली जाईल, अशी माहिती दिली. प्रशासनाने सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य संस्था व संघटनांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी करण्याचे ठरविल्याचे नायक यांनी म्हटले. रोहयोतूनकाही लघू प्रकल्पातील गाळ अकुशल मजुरांद्वारे काढला जाणार आहेत. मोठ्या प्रकल्पातून गाळ काढण्याकरीता मशिनरींचाच वापर करावा लागणार आहे. त्यामुळे आवश्यक ती मशिनरी उपलब्ध करून दिली जाईल व प्रत्येक तालुक्यात या मोहिमेस लोकचळवळीचे स्वरूप यावे, म्हणून सर्वार्थांने प्रयत्न केले जातील.४संभाव्य चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यात वैरण विकासाचा एक अभिनव प्रयोग राबविला जाणार असल्याचे नायक यांनी म्हटले. विशेषत: प्रकल्प परिसरात गाळ पेरणीतून चारा उत्पादनावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. घाणेवाडी, पीरकल्याण तसेच बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पाच्या परिसरात वैरण विकासाचा कार्यक्रम युद्धपातळीवर घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करीत त्याअनुषंगाने नियोजनही करण्यात आले असल्याचे ते म्हणाले. सलमान खान फाऊंडेशन, जिल्हा नियोजन समिती व उद्योजकांकडून ग्रामीण भागात गेल्यावर्षी दिलेल्या पाण्याच्या टाक्या जमा केल्या जाणार असून त्या टाक्यांचा पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जाणार असल्याचे नायक यांनी म्हटले. ४लोअर दुधना व जुई धरणातील पाणीसाठ्याचा टंचाईच्या या पार्श्वभूमीवर मोठा उपयोग घेता येईल, असा विश्वास नायक यांनी व्यक्त केला. परतूर व मंठा या दोन तालुक्यांसह घनसावंगी तालुक्यातील काही गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यासाठी लोअर दुधना प्रकल्प टँकर पॉईन्ट ठरविता येईल. तसेच जुईतूनही जाफराबाद व भोकरदन तालुक्यातील गावांना टँकरद्वारे पाणी देता येईल, असे ते म्हणाले. यासंबंधीचे नियोजन करण्यात येत असून त्यादृष्टीने संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.