शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १०८ टँकर सुरू

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

उस्मानाबाद : दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्याच गतीने टँकर आणि अधिग्रहणाची संख्याही वाढत आहे.

उस्मानाबाद : दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्याच गतीने टँकर आणि अधिग्रहणाची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यातील ८३ गावातील सुमारे १ लाख ८१ हजार ६६१ लोकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच २७९ गावांमध्ये विहीर, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. गतवर्षीही सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसागणिक भर पडू लागली आहे. उस्मानाबाद, भूम आणि कळंब या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. ५० टक्क्यावर टँकर या तीन तालुक्यात सुरु आहेत. जिल्ह्यातील ८० गावे आणि ३ वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १७ गावांना २० टँकर, तुळजापूर ५ गावांना १०, उमरगा १० गावांना १३, लोहारा १ गावास ६, कळंब २० गावांना २६, भूम १७ गावांना २२, वाशी ६ गावांना ७ तर परंडा तालुक्यातील ४ गावांमध्ये ४ टँकर सुरु आहेत. दरम्यान, टँकरप्रमाणेच अधिग्रहणाची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. जिल्ह्यातील २७९ गावांमध्ये ५६१ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टँकरसाठी ९६ तर टॅकर व्यतिरिक्त ४६५ अधिग्रहणाचा समावेश आहे. टंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होवू लागल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणे वाढत आहेत. (प्रतिनिधी)