शहरं
Join us  
Trending Stories
1
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
3
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
4
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
5
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
6
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
7
एकीकडे 'घरवाली' दुसरीकडे 'बाहेरवाली'; दोघींसोबत आनंदाने जगत होता तरुण अन् एक दिवस असं काही झालं... 
8
पितृपक्ष इंदिरा एकादशी २०२५: १० राशींवर श्रीहरी प्रसन्न, शिव-गौरी-लक्ष्मी कृपा; शुभ-लाभ-पैसा!
9
'क्रिस्टल ब्लॅक पर्ल' रंगात होंडा अमेझ भारतात लॉन्च; नव्या लूकमध्ये दिसते आणखी धासू!
10
बीचवर फिरायला गेलेल्या तरुणीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार; पोलिसांनी आरोपी कसे शोधले?
11
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
12
आयटी इंजिनिअरने १० टक्के पगारवाढ मागितली, नोकरी गमावली; मग त्याला काढणाऱ्याचीही गेली...
13
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
14
'ओझेम्पिक टीथ' म्हणजे काय? वजन कमी करण्याच्या औषधाचा होतोय 'असा' दुष्परिणाम
15
Nupur Bora: नुपूर बोरा आहे तरी कोण? सहा वर्षात अनेक गैरव्यवहार, घरातही सापडलं मोठं घबाड!
16
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
17
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
18
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
19
बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला
20
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स

जिल्ह्यात १०८ टँकर सुरू

By admin | Updated: May 9, 2015 00:53 IST

उस्मानाबाद : दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्याच गतीने टँकर आणि अधिग्रहणाची संख्याही वाढत आहे.

उस्मानाबाद : दिवसेंदिवस टंचाईच्या झळा तीव्र होवू लागल्या आहेत. त्याच गतीने टँकर आणि अधिग्रहणाची संख्याही वाढत आहे. जिल्ह्यातील ८३ गावातील सुमारे १ लाख ८१ हजार ६६१ लोकांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच २७९ गावांमध्ये विहीर, कुपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.जिल्ह्यात मागील ३ ते ४ वर्षापासून सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत आहे. गतवर्षीही सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात पाण्याची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे. परिणामी टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसागणिक भर पडू लागली आहे. उस्मानाबाद, भूम आणि कळंब या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न तीव्र बनला आहे. ५० टक्क्यावर टँकर या तीन तालुक्यात सुरु आहेत. जिल्ह्यातील ८० गावे आणि ३ वाड्यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील १७ गावांना २० टँकर, तुळजापूर ५ गावांना १०, उमरगा १० गावांना १३, लोहारा १ गावास ६, कळंब २० गावांना २६, भूम १७ गावांना २२, वाशी ६ गावांना ७ तर परंडा तालुक्यातील ४ गावांमध्ये ४ टँकर सुरु आहेत. दरम्यान, टँकरप्रमाणेच अधिग्रहणाची संख्याही त्याच गतीने वाढत आहे. जिल्ह्यातील २७९ गावांमध्ये ५६१ जलस्त्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये टँकरसाठी ९६ तर टॅकर व्यतिरिक्त ४६५ अधिग्रहणाचा समावेश आहे. टंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होवू लागल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणे वाढत आहेत. (प्रतिनिधी)