शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

२० गावांचा विद्यूत पुरवठा होणार खंडित

By admin | Updated: September 19, 2014 01:01 IST

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही ३३ केव्ही वीज केंद्र्रांतर्गत २० गावांनी महावितरण कंपनीकडे वीज देयके भरले नसल्याने या गावांचा विजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचा आदेश

कोळगाव : गेवराई तालुक्यातील मादळमोही ३३ केव्ही वीज केंद्र्रांतर्गत २० गावांनी महावितरण कंपनीकडे वीज देयके भरले नसल्याने या गावांचा विजपुरवठा तात्काळ खंडित करण्याचा आदेश महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढले आहेत. या गावांची शून्य वसुली आहे. तात्काळ थकित देयके न भरल्यास महावितरण कडक कारवाई करणार असल्याने जवळपास २० गावांचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.तालुक्यातील मादळमोही येथे ३३ उपकेंद्र आहे. या केंद्रांतर्गत अनेक गावांना वीज पुरवठा करण्यात येतो. सध्या मादळमोही ३३ केव्ही उपकेंद्रांतर्गत आॅगस्ट २०१४ पर्यंत २० गावांतील शेतकऱ्यांनी कृषीपंपाचे वीजदेयके भरलेले नाही. यामध्ये खडकी, धारवंटा, मानकापूर चिखली, कवडगाव, वडगाव, खुशी, कोळेवाडी, गाडेवाडी, टकलेवाडी, वंजारवाडी, बुधनरवाडी, आदी गावांत शून्य टक्के वसुली आहे. त्यामुळे २० गावांचा वीज पुरवठा तात्काळ बंद करण्याचे आदेश महावितरण कंपनीने दिले आहेत. तरी तात्काळ थकित वीजबील न भरल्यास महावितरणकडून कारवाई करण्यात येणार आहे.ज्या गावांची वसुली २० टक्यांपेक्षा कमी आहे, अशा गावांची वीज बिलाची वसुली वाढविण्याकरीता महावितरण कंपनीकडून वीज बील भरण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. मात्र या जनजागृती अंतर्गतही वीज बील भरणा न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.यामुळे वीज बील वसूली करीता महामंडळाचे कर्मचारी गावोगावी वाऱ्या करू लागले आहेत. त्यामुळे ज्या लोकांकडे वीज बील बाकी आहे त्यांचे धाबे दणाणले आहेत. मागील अनेक दिवसापासून महावितरण कंपनीकडून मोफत वीज वापरणाऱ्यांवर कडक कारवाई होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.याबाबत मादळमोहीचे कनिष्ठ अभियंता प्रमोद दारतोंडे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांकडे कृषी पंपाची थकबाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊन वील बील भरावे व होणारी कारवाई टाळावी. यासाठी पथके तयार करण्यात आले असून हे पथके गावोगावी जाणार आहेत. ग्राहकांनी वीज बील भरून महामंडळाला सहकार्य करण्याचे अवाहनही त्यांनी केली आहे. (वार्ताहर)