शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

१६ लाख एलईडी बल्बचे वाटप...!

By admin | Updated: July 14, 2015 00:29 IST

अशोक कारके , औरंगाबाद विजेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वीज बचतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.

अशोक कारके , औरंगाबाद विजेची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे सरकारने वीज बचतीकडे लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याचा एक भाग म्हणून आता महावितरणच्या माध्यमातून घरगुती वीज ग्राहकांना एलईडी बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येत आहेत. औरंगाबाद परिमंडळामध्ये १५ लाख ८१ हजार एलईडी बल्ब वितरित करण्यात येणार आहेत, असे परिमंडळाचे मुख्य अभियंता सतीश चव्हाण यांनी सांगितले. शहरात २ लाख ३२ हजार तर औरंगाबाद ग्रामीणमध्ये २ लाख ६६ हजार व जालना जिल्ह्यात १ लाख ५८ हजार घरगुती वीज ग्राहक आहेत. या साडेसहा लाख वीज ग्राहकांना महावितरणकडून जवळपास १६ लाख एलईडी बल्ब सवलतीमध्ये देणार आहेत. परिमंडळातील शंभर टक्के घरगुती ग्राहकांनी एलईडी दिवे वापरल्यास जवळपास ७० टक्के विजेची बचत होईल. त्यामुळे घरगुती वीजबिल कमी होईल. त्याचा फायदा ग्राहक आणि कंपनीला होईल. राज्यात कंपनीचे १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहक आहेत. या सर्व ग्राहकांनी एलईडी वापरल्यास दरवर्षी १ हजार ३०० मेगावॅट युनिट विजेची बचत होणार आहे. एक घरगुती ग्राहकाला ७ वॅट क्षमतेचे दोन ते चार बल्ब सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. तीन वर्षापर्यंत बल्बची गॅरंटी देण्यात येईल. पूर्वी अ‍ॅल्युमिनियमच्या तारा असलेले बल्ब वापरले जात होते. यात अधिक वीज खर्च होत होती. आता बहुतांशी नागरिक सीएफएल बल्ब वापरत आहेत. या बल्बमुळेही विजेची बचत होते. पण त्यापेक्षा अधिक बचत एलईडी बल्ब वापरल्याने होते. कारण त्यामध्ये सिलीकॉन धातूने बनविलेली डायड सिस्टिम वापरली जाते. वीज बचतीचे गणित ४० व्हॅटच्या एका बल्बचा वापर होत असेल तर २५ तासांना १ युनिट रीडिंग पडते. एक एलईडी बल्ब वापरल्यास १२५ तासांना एक युनिट रीडिंग पडते. एलईडी बल्ब वापरल्यास जवळपास ८० टक्के विजेची बचत होईल, असे गणित आहे.