शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
5
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
6
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
7
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
8
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
9
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
10
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
11
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
12
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
13
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
14
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
15
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
16
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
17
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
18
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
19
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
20
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का

‘डासमुक्तीचा पॅटर्न टेंभूर्णीचा, नांदेड जिल्हा परिषदेचा नव्हे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2016 00:11 IST

नांदेड : डासमुक्तीचा पॅटर्न देशातच नव्हे, तर जगभरात गाजत असताना या पॅटर्नच्या हक्काबाबत वाद निर्माण झाला आहे़

नांदेड : डासमुक्तीचा पॅटर्न देशातच नव्हे, तर जगभरात गाजत असताना या पॅटर्नच्या हक्काबाबत वाद निर्माण झाला आहे़ हिमायतनगर तालुक्यातील टेंभूर्णी येथील ग्रामस्थांनी डासमुक्तीचा पॅटर्न आमचा असून जिल्हा परिषद नांदेड याचे श्रेय घेत असल्याचा आरोप केला आहे़ यापुढे डासमुक्तीचा टेंभूर्णी पॅटर्न असा उल्लेख करण्याची मागणी करीत बुधवारी जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात आले़ हिमायतनगर तालुक्यातील टेंभूर्णी येथे सर्वप्रथम डासमुक्तीची सुरूवात २००४-०५ मध्ये करण्यात आली़ आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने शोषखड्डे तयार करून गाव गटारमुक्त करण्यात आले़ त्यामुळे डासांची उत्पत्ती कमी होवून गाव डासमुक्त झाले़ याबाबतची माहिती जिल्हा परिषद व पंचायत समिती हिमायतनगर यांच्याकडे होती़ त्यांच्या सांगण्यावरून जि़ प़ मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी टेंभूर्णी गावास नोव्हेंबर ते डिसेंबर २०१४ या कालावधीत वारंवार भेटी देवून गावकऱ्यांशी संवाद साधला़ त्यांनी श्रमदान व लोक- सहभागातून केलेल्या कामाची पाहणी केली़ या बाबीचा अभ्यास करून व केलेल्या कामाची उपयोगिता लक्षात आल्यानंतर ११ जानेवारी २०१५ रोजी टेंभूर्णी येथे जि़ प़ चे सर्व विभाग प्रमुख व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांची बैठक घेऊन केलेल्या कामाची माहिती दिली़ हे डासमुक्तीचे व गटारमुक्तीचे काम टेंभूर्णी पॅटर्न या नावाने जिल्हाभर राबविण्याची घोषणा केली़ त्यानंतर दिल्ली येथील स्वच्छता विभागाच्या बैठकीत ग्रामविकास मंत्रालयाकडे या कार्याचे सादरीकरण करण्यात आले़ या कामास नारेगा आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडून २ हजार रूपये अनुदान मंजूर करून हे काम पूर्ण नांदेड जिल्ह्यात सुरू केले़ मात्र जेव्हा ग्रामीण विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव व्ही़ गिरिराज नांदेड दौऱ्यावर आले असताना श्रमदान व लोकसहभागातून टेंभूर्णी गावाने केलेले काम न दाखवता २ हजार रूपये अनुदान देवून ज्या गावात काम केले तेच गाव दाखविण्यात आले़ शासनदरबारी डासमुक्तीचा पॅटर्न म्हणून २१ डिसेंबर २०१५ रोजी शासन निर्णय झाला व आता हा डासमुक्तीचा नांदेड पॅटर्न म्हणून सातासमुद्रापार गेला़ त्यामुळे टेंभूर्णी येथील सरपंच, शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, गोरगरीब जनतेवर अन्याय झाला असल्याचे सरपंच प्रल्हाद भाऊराव पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे़ दरम्यान, बुधवारी टेंभर्णूी येथील नागरिकांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले़ (प्रतिनिधी)