शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित

By admin | Updated: March 19, 2017 23:44 IST

जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

जालना : महावितरणकडून वीज बिल वसुलीसाठीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. तीन दिवसांत शहरातील २५७ वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहरात सुमारे दीड कोटी रूपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. महावितरणकडून मार्चअखेर वसुली पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरात वीज बिल वसुली चार पथकांची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात पाच कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तीन दिवसांपासून नवीन तसेच जुन्या जालन्यात वसुली करण्यात आली. थकबाकीपोटी वीज ग्राहकांकडून २ कोटी ५१ लाखांची थकबाकीची वसुली झाली. अद्यापही दीड कोटींची थकबाकी असल्याने महावितरणकडून ही मोहीम कडक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे महावितरणकडनू आवाहन करण्यात येऊनही ग्राहक थकबाकी भरण्यास तयार नाहीत. त्यांचा वीजपुरवठा तात्पुरता तसेच कायमस्वरूपी खंडित येत आहे. आत्तापर्यंत २५७ ग्राहकांचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. महावितरणने वारंवार सूचना तसेच नोटिसा बजावूनही अनेक ग्राहक थकबाकी भरण्यास इच्छुक नसल्याचे चित्र आहे. चार पथके असून, अभियंत्यांसह इतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. जालना जिल्ह्यात वीज चोरी व गळतीचे प्रमाण जास्त आहे. त्या तुलनेत थकबाकी वसुलीचे प्रमाणही कमी आहे. जिल्ह्यात फक्त चार ते पाच फिडर भारनियमन मुक्त आहेत. (प्रतिनिधी)