शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

धनादेशाचा अनादर; तीन जणांना कैद

By admin | Updated: January 3, 2017 23:26 IST

कळंब : धनादेश न वटल्याप्रकरणी तिघा जणांना कळंब न्यायालयाने जवळपास सात लाखाचा दंड व कैदेची शिक्षा सुनावली़

कळंब : तालुक्यातील हावरगाव येथील शंभू महादेव साखर कारखान्याकडून ऊस तोडणी व वाहतूक ठेक्यासाठी घेतलेली उचल रक्कमेचा परतावा म्हणून कारखान्याला दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी तिघा जणांना कळंब न्यायालयाने जवळपास सात लाखाचा दंड व कैदेची शिक्षा सुनावली़शंभू महादेव कारखान्यासाठी ऊस तोडणी व वाहतूक ठेकेदार म्हणून काम करण्यासाठी गोरख चित्राव (रा़ भडाचीवाडी), नामदेव उत्तम रणखांब (रा़ कुमाळवाडी) व मधुकर विठ्ठल पाटील (रा़ चिंचोली) या तिघांनी गळीत हंगाम सन २००८-०९ मध्ये कारखान्यासोबत करार केला होता़ यासाठी तिघांनी अनुक्रमे ६ लाख १२ हजार ६७६ रूपये, ३ लाख ९५ हजार ४९१ रूपये व २ लाख ३९ हजार १५० रूपयांची उचल घेतली होती़ गळीत हंगाम संपल्यानंतर त्यांच्याकडे अनुक्रमे ३ लाख ७७ हजार १४६, १ लाख ६० हजार ७२३ व १ लाख ४७ हजार ७९८ रूपये बाकी राहिली होती़ यासाठी तिघांनी उपरोक्त रक्कमेचे धनादेश कारखान्याकडे दिले होते़ परंतू त्यांच्या खात्यावर पुरेशा रक्कमा नसल्याने धनादेशाचा अनादर झाला़ तसेच त्यांनी त्यांच्याकडील येणे असलेली रक्कमही कारखान्यास दिली नाही़ यामुळे कारखान्याच्या वतीने दादासाहेब खराटे यांनी अ‍ॅड़ व्हीक़े़माने यांच्या मार्फत कळंब येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरणे दाखल केली होती़ या प्रकरणाच्या सुनावणीनंतर समोर आलेले पुरावे, अ‍ॅड़ व्हीक़े़माने यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश एस़एस़उबाळे यांनी गोरख चित्राव यास ४ लाख रूपयांचा दंड व एक वर्षाची साधी कैद, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, नामदेव रणखांब यास एक लाख ७५ हजार रूपये दंड व सहा महिने साधी कैद व दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, तसेच मधुकर पाटील यास एक लाख ६० हजार रूपये दंड व सहा महिने साधी कैद, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावल्याचे अ‍ॅड माने म्हणले.