शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

भूखंडावरच कच-याची विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:47 IST

वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरलगत मोकळ्या भूखंडावरच कच-याची विल्हेवाट लावली जात आहे. कच-याच्या ढिगा-यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूरलगत मोकळ्या भूखंडावरच कच-याची विल्हेवाट लावली जात आहे. कच-याच्या ढिगा-यामुळे दुर्गंधी पसरत असल्याने प्रदूषणाचा धोका वाढला आहे. याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने उद्योजक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.स्थानिक प्रशासन व लगतचे काही कारखानदार आपला कचरा साजापूर गावालगतच वडगावकडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला मोकळ्या भूखंडावर कचरा टाकत आहेत. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने कचरा जागेवरच सडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. कारखानदारांकडून कच-याबरोबरच केमिकलयुक्त पदार्थ टाकले जात असल्याने दुर्गंधीत भर पडत आहे. दुर्गंधी व केमिकलयुक्त पदार्थामुळे वातावरण दूषित होऊन प्रदूषण वाढत आहे. शिवाय अनेकवेळा याच ठिकाणी कचरा जाळला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. गावालगतच कच-याची विल्हेवाट लावली जात असल्याने गावातील रहिवाशांसह येथून ये-जा करणा-या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. कच-यामुळे या ठिकाणी मोकाट जनावरे व कुत्र्याचा वावर वाढला आहे. येथून ये-जा करणा-याच्या पाठीमागे कुत्रे लागत असल्याने रात्रीच्या वेळी येणा-या जाणा-या पादचारी व वाहनधारकामध्ये भीती पसरली आहे. शिवाय बाजूलाच धार्मिक स्थळ व अनेक कारखाने आहेत. दर्शनासाठी येणा-या भाविकांना व कंपनीत येणा-या उद्योजकासह कामगारांना या प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. मोकळ्या भूखंडावर कच-याची विल्हेवाट लावणा-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या भागातील त्रस्त उद्योजक व नागरिकांमधून केली जात आहे.