शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

धान्य पुरवठ्यात विस्कळीतपणा

By admin | Updated: September 3, 2015 00:19 IST

उमरगा : उमरगा व तालुक्यातील मुरूम येथील गोडाऊनमधून रास्तभाव दुकानदारांना वेळेवर धान्याचा पुरवठा होत नाही़ परिणामी उमरगा विभागातील ९७ गावातील

उमरगा : उमरगा व तालुक्यातील मुरूम येथील गोडाऊनमधून रास्तभाव दुकानदारांना वेळेवर धान्याचा पुरवठा होत नाही़ परिणामी उमरगा विभागातील ९७ गावातील १५१ दुकानांतर्गतच्या ६७ हजार ५१६ कार्डधारकांना याचा फटका सहन करावा लागत आहे़पुरवठा विभागाकडून प्राधान्य कुटुंब केसरी, शुभ्र, प्राधान्य कुटुंब बी.पी.एल. प्राधान्य कुटुंब अंत्योदय आदी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना शासनाकडून गहू, तांदूळ, साखर आदी धान्य स्वस्त भावाने दिले जाते. उमरगा विभागातील ९७ गावांसाठी १५१ रास्तभाव दुकाने आहेत़ तर तालुक्यात २७५२ शुभ्र, १० हजार ६८१ केशरी, १७ हजार ४५३ प्राधान्य कुटुंब केसरी शिधापत्रिकाधारक, १४ हजार २१५ प्राधान्य कुटुंब बी.पी.एल. शिधापत्रिका धारक आहेत़ उमरगा येथील गोडाऊनमधून १०२ दुकानांना धान्याचा पुरवठा होतो़ या दुकानांतर्गत ७१ गावातील कार्डधारकांना धान्याचा पुरवठा होतो़ तर मुरूम गोडाऊनमधून ४९ दुकानदारांना धान्याचा पुरवठा होत असून, याचा लाभ २६ गावातील कार्डधारकांना होत आहे़ यात तालुक्यातील तलमोड, दगडधानोरा, मानेगोपाळ, जगदाळवाडी, नारंगवाडी, मातोळा, कवठा, दाळींब, केसरजवळगा, वागदरी, व्हंताळ, बलसूर, जकेकूर, येळी, जकेकूरवाडी, औराद, कदेर, मुरळी, कंटेकूर आदी गावे मुरूम व उमरगा शहरापासून खूपच दूर आहेत़ त्यामुळे मालाच्या वाहतुकीत मोठा विलंब होताना दिसत आहे़ तर अनेक वेळा गोडाऊनमध्येच मागणीनुसार धान्य उपलब्ध नसल्याने गावात धान्याचा पुरवठा उशिराने होत आहे़ गोडाऊनमधून दुकानदारांना उशिराने धान्याचा पुरवठा होत असल्याने याचा थेट फटका तालुक्यातील कार्डधारकांना सहन करावा लागत आहे़ (वार्ताहर) कदेर, व्हंताळ, भगतवाडी, चिरेवाडी, सावळसूर, धाकटीवाडी, एकोंडीवाडी, अंबरनगर, तुगाव, कंटेकूर या गावातील लाभार्थींना महिला बचतगटामार्फत रास्त भावाने धान्याचा पुरवठा करण्यात येतो.प्राधान्य कुटूंब अंत्योदय मधील ६ हजार ८७१ शिधापत्रिकाधारकांना १ हजार ३७४ क्विंटल गहू तर ६८७ क्विंटल तांदळाचे प्रतिमाह वाटप होते़ तर तालुक्यातील ६७ हजार ५१६ कार्डधारक असून, या अंतर्गत ३ लाख २६ हजार २६५ लाभार्थ्यांना प्रतिमहा ६० हजार २६ क्विंटल गव्हाचे तर ३ हजार ७८८ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात येते़याशिवाय इतर शिधापत्रिकांनाही नियमानुसार धान्याचे वाटप करण्यात येते़शासनाकडून दुकानदारांना प्रतिक्विंटल ७० रुपये कमिशन दिले़ तसेच प्रतिक्विंटल साडेनऊ रुपये रिपीट मार्जीन दिले जाते. तर प्रवास खर्च व कमिशन तुटपुंजे असून, तोटा सहन करावा लागत असल्याचे रास्तभाव दुकानदारांचे म्हणणे आहे़ शासनाने कमिशनमध्ये वाढ करावी, अशी मागणी के. व्ही. क्षीरसागर, सुधाकर गायकवाड, व्हंताळ येथील बचतगटाच्या सुनीता ममाळे यांनी केली़