शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांची उकल

By admin | Updated: September 25, 2014 00:54 IST

लातूर : प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातून सामाजिक प्रश्नांची उकल झाली असल्याची भावना चित्रपट अभिनेत्याबरोबरच प्रेक्षकांनी बुधवारी येथील

लातूर : प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच ‘इश्क वाला लव्ह’ या चित्रपटातून सामाजिक प्रश्नांची उकल झाली असल्याची भावना चित्रपट अभिनेत्याबरोबरच प्रेक्षकांनी बुधवारी येथील दयानंद सभागृहात व्यक्त केली.‘लोकमत सखी मंच व युवा नेक्स्ट’ सदस्यांसाठी बुधवारी ‘इश्क वाला लव्ह’ फिल्म प्रमोशन अ‍ॅक्टिव्हिटी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चित्रपट अभिनेते आदिनाथ कोठारे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री सुलग्ना पानीगृही, गीतकार मंगेश बोरगावकर, संगीतकार विश्वजीत जोशी यांच्यासह द्वारकादास शामकुमारचे तुकाराम पाटील, मनोजा एजन्सीचे प्रवीण ब्रिजवासी यांची उपस्थिती होती. यावेळी अभिनेते अदिनाथ कोठारे म्हणाले, ‘इश्क वाला लव्ह’ हा विषय जिव्हाळ्याचा आणि महाविद्यालयीन तरुणांच्या आणि इतरांच्याही जिव्हाळ्याचा बनला आहे. या चित्रपटातून तरुण पिढीसमोर प्रेम, मनोरंजन याची माहिती मिळतेच. त्याचबरोबर लिव्ह इन रिलेशन याच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. लिव्ह इन रिलेशन हेच महत्वाचे आहे का? हा प्रश्न समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजात विविध प्रश्न आहेत़ त्यामध्ये विवाह आणि लिव्ह इन रिलेशन या बाबीकडे आकर्षित होणारी तरुणाई आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न. यामुळे तरुणाईची होणारी घुसमट आदी बाबींकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पुढे कोठारे म्हणाले, मराठी चित्रपटसृष्टीत बहुतांश वेळा केवळ मनोरंजनावरच भर देण्यात येत आहे. परंतु, मनोरंजना बरोबरच सामाजिक समस्या मांडून वास्तव चित्र समाजासमोर मांडणेही आवश्यक आहे. या चित्रपटातून हाच प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे निश्चितच त्यास प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल, असेही ते म्हणाले.सूत्रसंचालन प्राग़णेश बेळंबे यांनी केले़ या कार्यक्रमाचे प्रायोजक द्वारकादास शामकुमार, मनोजा एजन्सी, राजभोग आटा हे होते़ तत्पूर्वी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय येथेही या चित्रपट प्रमोशनसाठी कार्यक्रम घेण्यात आला़ या कार्यक्रमास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा़ सुधीर आनवले यांनी केले़ (प्रतिनिधी)यावेळी गायक मंगेश बोरगावकर यांनी चित्रपटातील गीत सादर करताच सखी मंचच्या सदस्यांनी प्रतिसाद दिला़ अभिनेता अदिनाथ कोठारी व अभिनेत्री सुलग्ना पानीगृही यांनी गाण्याच्या तालावर नृत्य सादर केले. यावेळी चित्रपटातील काही क्षणचित्रेही दाखवण्यात आली.शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अभिनेते अदिनाथ कोठारे यांनी महाविद्यालय तरुणांशी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यास महाविद्यालयीन तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. तितक्याच तन्मयतेने कोठारे, अभिनेत्री सुलग्ना पानीगृही यांनी माहिती देऊन युवकांच्या समस्यांचे निरसन केले. यावेळी जल्लोषच साजरा होत असल्याचे पहावयास मिळाले.