शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

निजामांच्या तावडीतून केली शिताफीने सुटका

By admin | Updated: September 17, 2015 00:31 IST

पद्माकर वाघ , नेकनूर मराठवाड्यातील निजामांची राजवट उलथून टाकताना स्वातंत्र्यसैनिकांना शक्ती आणि युक्तीचा वापर करावा लागला. बीड शहरातील राजुरी वेसजवळ निजामाच्या पोलिसांनी

पद्माकर वाघ , नेकनूरमराठवाड्यातील निजामांची राजवट उलथून टाकताना स्वातंत्र्यसैनिकांना शक्ती आणि युक्तीचा वापर करावा लागला. बीड शहरातील राजुरी वेसजवळ निजामाच्या पोलिसांनी स्वातंत्र्यसैनिकांना पकडले. यहां ठहरो असे फर्मान सोडत ते रजिस्टर आणण्यासाठी आत गेले तेव्हा त्यांच्या तावडीतून आम्ही मोठ्या शिताफीने सुटका करून घेतली...या आणि अशा इतर आठवणींना स्वातंत्र्यसैनिक प्रल्हादराव कदम यांनी बुधवारी उजाळा दिला.मराठवाडा मुक्तीसंग्रामात गुप्तहेराची भूमिका साकारणाऱ्या स्वा. सै. कदम यांनी ‘लोकमत’जवळ मुक्तीसंग्रामच्या लढ्यातील अनुभवाची पाने उलगडली. येळंबघाट (ता. बीड) येथील स्वा. सै. कदम आता थकले आहेत. मात्र, मुक्तीसंग्रामाच्या लढ्यातील आठवणी सांगताना त्यांच्यातील करारीपणा जाणवत होता. ते म्हणाले, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली रामलिंग स्वामी, डॉ. कचेरीकर, भाऊराव पाटील, वामनराव वझे व इतरांनी खांद्याला खांदा लावून अनेक जोखमीची कामे केली.कासीम रझवी याच्या सभेत माझ्याकडे गुप्तहेर म्हणून जबाबदारी होती. ती सभा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे झाली. निजाम स्टेट पाकिस्तानात विलीन व्हावे असा ठराव तेव्हा संमत करण्यात आला होता व बैठकीला उपस्थित असलेल्यांच्या स्वाक्षऱ्या व अंगठे रक्ताने घेण्यात आले होते. हा सर्व प्रसंग आपण डोळ्याने पाहिला. त्याचे रिपोर्टिंग स्वामी रामानंद तीर्थ यांना व इतरांना दिले. त्यानंतर निजामांचा डाव उधळून लावता आला. स्वातंत्र्यसैनिक निष्ठेने लढले, त्यामुळे निजामांचा पाडाव करता आला, असे सांगायलाही कदम विसरले नाहीत.जांबियाचा आधारमुक्तीसंग्रामातील लढ्यात माझ्याकडे गुप्तहेर म्हणून काम सोपविले होते. त्यामुळे निजामांच्या बारीकसारीक हालचालींवर निरीक्षण ठेवावे लागत असे. महिनोंमहिने एकच ड्रेस अंगात असायचा. सोबत जांबिया मात्र नेहमीच ठेवत असे. त्यामुळे भीती वाटायची नाही, असे कदम यांनी सांगितले.प्रल्हादराव सांगत होते, त्यांच्या थोरल्या बंधूच्या निधनाचे पत्र १९४२ साली घरी आले. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या पत्राची शहानिशा करण्यासाठी मी मांजरसुंबा, येडशी, बार्शी मार्गे पुण्याला गेलो. तेथे समजले की, भाऊ जिवंत आहे. पत्र खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यावर जीवात जीव आला. त्यावेळी पुण्यात भारत छोडो आंदोलनाचे तीन दिवसीय शिबीर होते. तेथे मी हजेरी लावली. तेंव्हापासून मराठवाडा मुक्तीसंग्रामात लढ्यात सहभागी झालो.