शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

विदारक ! खरबूज शेतातच सडतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:05 IST

कायगाव : परिसरातील खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना कमी झालेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतातील ...

कायगाव : परिसरातील खरबूज उत्पादक शेतकऱ्यांना कमी झालेल्या दराचा मोठा फटका बसला आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने शेतातील खरबूज काढून विकणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे चित्र आहे. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातच खरबूज सडत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे.

दरवर्षी १८ ते २० रुपये किलोने ठोक बाजारात विक्री होणाऱ्या खरबुजाला यंदा फक्त ७-८ रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. खरबूज काढून बाजारात नेण्यासाठी एका खेपेला सुमारे ८ ते १० हजारांचा वाहतूक खर्च येतो. तर शेतातून काढून गाडी भरण्यासाठी सुमारे १८००-२००० रुपये मजुरी लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कमी मिळणाऱ्या भावामुळे खरबूज विकणे तोट्याचे ठरू लागले आहे. परिणामी, परिसरातील अगरवाडगाव, भिवधानोरा, गळनिंब, धनगरपट्टी भागातील शेतकऱ्यांनी खरबूज काढून बाजारात विकणे बंद केले आहे.

बऱ्याच शेतकऱ्यांचे खरबूज शेतातच सडत आहे. यावर्षी खरबुजाला भरपूर माल लागला होता. जवळपास सगळ्या शेतकऱ्यांच्या खरबूजवाड्यात चांगले पीक बहरले होते. मात्र, भावामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

कायगाव परिसरातील जुने कायगाव, अंमळनेर, लखमापूर, धनगरपट्टी आणि गळनिंब आदी शिवारात दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरबूज शेती केली जाते.

दरवर्षी परिसरातील खरबूज औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर, श्रीरामपूर, वाशी, ठाणे, भिवंडी, नाशिक आदी बाजारात पाठवले जाते.

लॉकडाऊन असल्याने खरबुजाला किरकोळ बाजारात उठाव नाही. किरकोळ बाजारात माल विकला जात नसल्याने व्यापारी माल विकत घेण्यासाठी तयार होईना. त्यामुळे खरबुजाला यावर्षी कमी भाव मिळत आहे.

- बाळू बोकडिया, खरबूज उत्पादक, अगरवाडगाव.

फोटो :

खरबूज बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने धनगरपट्टी परिसरातील खरबुजाच्या वाडीत माल पडून सडत आहे. (तारेख शेख)

030521\tarekh ahemad usuf shaikh_img-20210501-wa0014_1.jpg

खरबूज बाजारात योग्य भाव मिळत नसल्याने धनगरपट्टी परिसरातील खरबुजाच्या वाडीत माल पडून सडत आहे. (तारेख शेख)