शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

दोनशे कोटींच्या नियोजनावर चर्चा

By admin | Updated: June 30, 2014 01:03 IST

औरंगाबाद : जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक उद्या सोमवारी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होत आहे.

औरंगाबाद : जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक उद्या सोमवारी पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत होत आहे. या बैठकीत दोनशे कोटी रुपयांच्या वार्षिक योजनेच्या खर्चाचे नियोजन तसेच मागील वर्षीच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे.जिल्हा प्रशासनाने २०१४-१५ सालासाठी १८४ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा तयार केला होता. राज्य सरकारने नंतर त्यात १६ कोटी रुपयांची वाढ करून एकूण दोनशे कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात जिल्हा योजनेतून दोनशे कोटी रुपयांची विविध विकासकामे करता येणार आहेत. विकास आराखड्यात विविध खात्यांच्या कामांवर अपेक्षित खर्च दाखविण्यात आला आहे. आता त्यातून नेमकी कुठे आणि कोणती कामे करायची हे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठरविले जाणार आहे. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी होणाऱ्या बैठकीत सदस्यांकडून त्याविषयी सूचना ऐकून घेतल्या जाणार आहेत.विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सर्वच सदस्यांकडून आपापल्या भागात जास्तीत जास्त विकासकामे खेचून नेण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने आधी सादर केलेल्या नियोजनानुसार सर्वाधिक ७९ कोटी रुपयांचा निधी सामाजिक आणि सामूहिक सेवांवर प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ रस्ते, कृषी, संलग्न सेवा, पाटबंधारे व पूरनियंत्रण, उद्योग आदींवर खर्च केला जाणार आहे. वाढीव १६ कोटींच्या निधीचे नियोजनही बाकी आहे. टंचाई उपाययोजनांकडे निधी वळवाजिल्ह्यात दरवर्षीच कमी अधिक प्रमाणात टंचाई परिस्थिती निर्माण होत आहे. मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. वार्षिक योजनेतूनही जिल्हाधिकारी कार्यालय आणि उच्च न्यायालयाच्या इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंग यंत्रणा उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. यंदाही टंचाई निवारण, जलसंधारणाच्या कामांसाठी वार्षिक योजनेतून निधी वळविण्यात यावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वार्षिक आराखड्यातील प्रस्तावित तरतुदीकृषी व संलग्न सेवा २६ कोटी ३२ लाखग्रामविकास ११ कोटी ३२ लाखपाटबंधारे व पूरनियंत्रण ११ कोटी २ लाखअपारंपरिक ऊर्जा ७ लाखउद्योग व खाण ६५ लाखरस्ते ४१ कोटी ६६ लाखसामान्य आर्थिक सेवा ४ कोटी ५० लाखसामाजिक, सामूहिक सेवा७९ कोटी ८ लाखआराखड्यातील योजनांव्यतिरिक्त ९ कोटी २० लाख