शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

वाळूजला कृषी विषयक चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:09 IST

तज्ज्ञांनी एकविसाव्या शतकातील कृषी क्षेत्र समस्या व उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

वाळूज महानगर: वाळूज येथील राजर्षी शाहु महाविद्यालयात कृषी विषयक चर्चासत्राचे नुकतेच आयोजन केले होते. यात तज्ज्ञांनी एकविसाव्या शतकातील कृषी क्षेत्र समस्या व उपाय या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा.अशोक देशमाने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.निशिकांत आलटे तर प्रमूख पाहुणे म्हणूून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदचे सदस्य प्रा.डॉ.राजेश करपे हे होते.

प्रा.देशमाने म्हणाले की, शासनाच्या उदासीन धोरणामुळेच कृषी क्षेत्राची पिछेहाट होत चालली असून, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. कृषी क्षेत्राशा चालना देऊन उत्पादित मालाला हमीभाव देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ.करपे यांनी शिवकालीन शेतकऱ्यांच्या स्थितीबाबत व छत्रपती शिवाजी महाराज यांचे शेतकºयाविषयी असलेले धोरण या विषयी सखोल मार्गदर्शन केले. दुसºया सत्रात विविध राज्यांतून आलेल्या संशोधक, प्राध्यापक यांनी आपले मत मांडले. चर्चासत्राच्या समारोप प्रसंगी प्रा.डॉ.शंकर अंधारे, अ‍ॅड. ब्रह्मानंद चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.प्राजक्ती वाघ तर आभार प्रा.डॉ.विश्वनाथ कोकर यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा.मोहन सौंदर्य, प्रा.रेखा वाघ, प्रा.गौतम कांबळे, प्रा. वाय.ई.भालेराव, प्रा.शितल बियाणी, प्रा.करुणा कदम आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :agricultureशेतीWalujवाळूज