शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

नामविस्ताराच्या रौप्यमहोत्सव दिनाला पाहुणे बोलावण्यावरून मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:42 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला.

ठळक मुद्दे विद्यापीठ : कुलगुरूंनी शरद पवार यांना बोलावण्याच्या मांडलेल्या ठरावावर निर्णय प्रलंबित

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलावण्यात यावे, असा ठराव कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बुधवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत मांडला. मात्र, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य किशोर शितोळे यांनी त्यास विरोध केल्यामुळे कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ऐतिहासिक लढ्यानंतर मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी घेतला. येत्या १४ जानेवारी रोजी या घटनेला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देवगिरी महाविद्यालयात सर्वपक्षीयांतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी झालेल्या भेटीतच कुलगुरूंचे शरद पवार यांच्याशी रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात प्राथमिक बोलणे झाले होते. रौप्यमहोत्सव काही दिवसांवर आलेला आहे. यामुळे कुलगुरूंनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शरद पवार यांना बोलावण्याचा ठराव मांडला होता. मात्र, किशोर शितोळे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलवावे, अशी मागणी केली. या मागणीला सर्व सदस्यांनी होकार दर्शविला. इतरही काही नावांची सूचना सदस्यांनी केली. तेव्हा कुलगुरूंनी या विषयावर मौन बाळगणेच पसंत केले. मात्र, बैठक मध्यंतरासाठी थांबली असता, शितोळे यांनी पुन्हा कुलगुरूंची भेट घेऊन शरद पवार यांच्याऐवजी केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच बोलावावे, त्यांच्याशिवाय इतर कोणीही पाहुणा आणू नये, अशी मागणी केली. यामुळेच कुलगुरूंनी नामविस्ताराला पाहुणा बोलवण्याचा विषयच प्रलंबित ठेवल्याचा आरोप डॉ. नरेंद्र काळे यांनी केला.कोट,विद्यापीठाच्या ऐतिहासिक नामविस्तारात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या व्यक्तींना बोलावले पाहिजे. मात्र, ज्यांनी नामविस्ताराला विरोध केला त्या विचारसरणीच्या लोकांना बोलावण्याचा आग्रह करण्यात येत आहे. हे दुर्दैव आहे. सरकारचा धाक दाखवून कुलगुरूंवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, आम्ही चांगल्या निर्णयासाठी कुलगुरूंसोबत आहोत. त्यांनी भूमिका बदलू नये.- डॉ. नरेंद्र काळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद------------------------नामविस्तार दिनाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांना बोलावत असाल तर विद्यमान मुख्यमंत्र्यांनाही बोलावले पाहिजे, अशी मागणी केली. मात्र, सध्या ज्या काही चर्चा सुरू आहेत, त्या चुकीच्या आहेत. कुलगुरूंवर कोणताही दबाव आणलेला नाही.- किशोर शितोळे, सदस्य, व्यवस्थापन परिषद

टॅग्स :universityविद्यापीठPoliticsराजकारण