शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

परळी शहरवासियांची गैरसोय, पथदिवे बंद

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

परळी: येथील उड्डाणपूल परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

परळी: येथील उड्डाणपूल परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे परिसरात अंधार पसरत असून, नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. न.प.च्या दुर्लक्षामुळे बंद असलेले पथदिवे आता उजेडात आले आहेत. याकडे न.प. दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे.शहरातील उखळवेस, कालरात्री मंदिर भागात नगर परिषदेने लाखो रुपये खर्चून अंधाराचे जाळे संपुष्टात आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हायमास्ट दिवे बसविण्यात आले होते. ज्यादिवशी बसविले त्या दिवशीपासून हे पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे या चौकातील अंधाराचे सावट दूर होण्याऐवजी अडचण होऊन बसली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरीलही अनेक पथदिवे इलेक्ट्रीक साहित्याअभावी बंद आहेत. त्यामुळे अनेक गल्लीबोळात पथदिवे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.परळी नगर परिषदेकडून गेल्या तीन महिन्यांपासून मेन रोडवरील पथदिवे दुरुस्त करण्यासाठी टी५, २५० वॅट चोक, गल्लीबोळातील पथदिव्यांसाठी सीएफएल ट्यूब, ४०० वॅट ट्यूब, ४०० वॅट चोक आदी साहित्य नगर परिषदेकडे अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे बंद असलेले पथदिवे चालू करता येत नाहीत. चालू पथदिवे कमी व बंद पथदिवे जास्त, असा प्रकार उड्डाण पूल परिसरात दिसून येत आहे. उड्डाण पुलावरीलही पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंदच आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात, चोऱ्या आदी प्रकार घडण्याममध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक मिनार चौक ते शिवाजी चौक, आझाद चौक, पोलीस ठाणे, ईटके कॉर्नर, टॉवर ते गणेशपार या मुख्य रस्त्यावरील पथदिवे अनेकवेळा बंद अवस्थेत आढळून आले. याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांना पथदिवेही बंद असल्याचे कारण ठरल्याचे नागरिकांनी सांगितले. उखळवेस, कालरात्री मंदिर, भीमनगर, या भागातील हायमास्ट दिवे बंदच आहेत. हे पथदिवे कधी चालू असतात तर कधी बंद. नगर परिषदेने लवकरात लवकर हे पथदिवे चालू करुन नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली.वैद्यनाथ मंदिर परिसरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील पथदिवे नेहमी बंद असतात, असे येथील नागरिकांनी सांगितले. याबाबत नगर परिषदेकडे येथील नागरिकांनी तक्रार केली असता इलेक्ट्रीकल साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.श्यामाप्रसादजी मुखर्जी उड्डाणपूलावरील शनिवारी २१ पथदिवे रात्रीच्या वेळी बंद होते तर केवळ बोटावर मोजण्याइतकेच चालू होते. त्यामुळे अर्धा उड्डाणपूल अंधारात आहे, असे पाहणीत आढळून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोवतालचे पथदिवे बंद दिसून आल्याने सर्वत्र अंधाराचे सावट पसरले होते. याबाबत परळीचे नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले, नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याचे काम कर्मचारी युद्धपातळीवर करीत आहेत. नागरिकांची तक्रार आलेली नाही. जे हायमास्ट दिवे बंद आहेत त्या दिव्यांना वीजपुरवठा जोडला जाईल व हायमास्ट दिवे चालू करण्यात येतील. शहरातील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. पथदिवे चालू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)नागरिकांमधून होतोय संताप व्यक्तपथदिवे दुरुस्तीसाठी न.प.कडे नाही इलेक्ट्रीकल साहित्यउड्डाणपूलावरील २१ पथदिवे बंद तर १४ चालूबाजार समिती भोवतीचेही पथदिवे बंदतीन वर्षांपासून हायमास्टचे बल्ब नादुरुस्तन.प.चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप