शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
2
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
5
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
6
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
7
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
8
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
9
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
10
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
11
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
12
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
13
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
14
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
15
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
16
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
17
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
18
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
19
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

परळी शहरवासियांची गैरसोय, पथदिवे बंद

By admin | Updated: June 16, 2014 01:13 IST

परळी: येथील उड्डाणपूल परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत.

परळी: येथील उड्डाणपूल परिसरातील पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. बंद असलेल्या पथदिव्यांमुळे परिसरात अंधार पसरत असून, नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. न.प.च्या दुर्लक्षामुळे बंद असलेले पथदिवे आता उजेडात आले आहेत. याकडे न.प. दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात आहे.शहरातील उखळवेस, कालरात्री मंदिर भागात नगर परिषदेने लाखो रुपये खर्चून अंधाराचे जाळे संपुष्टात आणण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हायमास्ट दिवे बसविण्यात आले होते. ज्यादिवशी बसविले त्या दिवशीपासून हे पथदिवे बंदच आहेत. त्यामुळे या चौकातील अंधाराचे सावट दूर होण्याऐवजी अडचण होऊन बसली आहे. शहरातील मुख्य रस्त्यावरीलही अनेक पथदिवे इलेक्ट्रीक साहित्याअभावी बंद आहेत. त्यामुळे अनेक गल्लीबोळात पथदिवे बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.परळी नगर परिषदेकडून गेल्या तीन महिन्यांपासून मेन रोडवरील पथदिवे दुरुस्त करण्यासाठी टी५, २५० वॅट चोक, गल्लीबोळातील पथदिव्यांसाठी सीएफएल ट्यूब, ४०० वॅट ट्यूब, ४०० वॅट चोक आदी साहित्य नगर परिषदेकडे अद्यापही उपलब्ध नाही. त्यामुळे बंद असलेले पथदिवे चालू करता येत नाहीत. चालू पथदिवे कमी व बंद पथदिवे जास्त, असा प्रकार उड्डाण पूल परिसरात दिसून येत आहे. उड्डाण पुलावरीलही पथदिवे मागील अनेक दिवसांपासून बंदच आहेत. त्यामुळे याठिकाणी अपघात, चोऱ्या आदी प्रकार घडण्याममध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एक मिनार चौक ते शिवाजी चौक, आझाद चौक, पोलीस ठाणे, ईटके कॉर्नर, टॉवर ते गणेशपार या मुख्य रस्त्यावरील पथदिवे अनेकवेळा बंद अवस्थेत आढळून आले. याकडे नगर परिषद दुर्लक्ष करीत असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस घडणाऱ्या या घटनांना पथदिवेही बंद असल्याचे कारण ठरल्याचे नागरिकांनी सांगितले. उखळवेस, कालरात्री मंदिर, भीमनगर, या भागातील हायमास्ट दिवे बंदच आहेत. हे पथदिवे कधी चालू असतात तर कधी बंद. नगर परिषदेने लवकरात लवकर हे पथदिवे चालू करुन नागरिकांचे हाल थांबवावेत, अशी मागणी भाजपा दलित आघाडीचे शहराध्यक्ष रमेश गायकवाड यांनी केली.वैद्यनाथ मंदिर परिसरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरातील पथदिवे नेहमी बंद असतात, असे येथील नागरिकांनी सांगितले. याबाबत नगर परिषदेकडे येथील नागरिकांनी तक्रार केली असता इलेक्ट्रीकल साहित्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.श्यामाप्रसादजी मुखर्जी उड्डाणपूलावरील शनिवारी २१ पथदिवे रात्रीच्या वेळी बंद होते तर केवळ बोटावर मोजण्याइतकेच चालू होते. त्यामुळे अर्धा उड्डाणपूल अंधारात आहे, असे पाहणीत आढळून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भोवतालचे पथदिवे बंद दिसून आल्याने सर्वत्र अंधाराचे सावट पसरले होते. याबाबत परळीचे नगराध्यक्ष दीपक देशमुख म्हणाले, नादुरुस्त पथदिवे दुरुस्त करण्याचे काम कर्मचारी युद्धपातळीवर करीत आहेत. नागरिकांची तक्रार आलेली नाही. जे हायमास्ट दिवे बंद आहेत त्या दिव्यांना वीजपुरवठा जोडला जाईल व हायमास्ट दिवे चालू करण्यात येतील. शहरातील विद्युत व्यवस्थेचे नूतनीकरण करण्याच्या कामासही प्रारंभ करण्यात आला आहे. पथदिवे चालू करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)नागरिकांमधून होतोय संताप व्यक्तपथदिवे दुरुस्तीसाठी न.प.कडे नाही इलेक्ट्रीकल साहित्यउड्डाणपूलावरील २१ पथदिवे बंद तर १४ चालूबाजार समिती भोवतीचेही पथदिवे बंदतीन वर्षांपासून हायमास्टचे बल्ब नादुरुस्तन.प.चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप