शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

शिष्यवृत्तीपासून विद्यार्थी वंचित

By admin | Updated: June 30, 2014 00:37 IST

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यानंतर येथील विद्यार्थ्यास तब्बल तीन वर्षांपासून लाभ मिळालेला नाही.

परभणी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरल्यानंतर येथील विद्यार्थ्यास तब्बल तीन वर्षांपासून लाभ मिळालेला नाही. या संदर्भात विद्यार्थ्याच्या पालकाने संबंधितांकडे अनेकवेळा तक्रारही नोंदविली आहे.येथील बाल विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी राजन रामचंद्र जाधव याने २०११-१२ मध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक ठरला होता. शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणारा राष्ट्रीय बँकेचा खाते क्रमांक तसेच आय.एफ.सी. कोड संबंधितांना कळविण्यात आला. सतत तीन वर्षे पाठपुरावा करुनही या विद्यार्थ्यास ही शिष्यवृत्ती मिळालेली नाही.विद्यार्थ्यांना प्रोत्साह देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. परंतु जर विद्यार्थ्यांना वेळच्या वेळी शिष्यवृत्ती मिळत नसेल तर या योजनेचा उद्देशच सफल होत नाही, असे दिसते. सदर विद्यार्थ्याच्या पालकाने तक्रार केल्याने शिष्यवृत्ती न मिळण्याचा प्रकार समोर आला आहे. शिष्यवृत्तीचा लाभ न मिळालेले अनेक विद्यार्थी असू शकतात. त्यामुळे शिक्षण विभागाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)आॅनलाईन खाते क्रमांक कळवावा लागतो यासंदर्भात शिक्षणाधिकारी आर.बी. गिरी यांच्याशी संपर्क साधला असता, शिष्यवृत्ती मिळाली नसल्याची तक्रार आपल्याकडे आली नाही. शिष्यवृत्तीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत आॅनलाईन खाते क्रमांक कळवावा लागतो, असे त्यांनी सांगितले.अशी मिळते शिष्यवृत्तीमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. सातवी इयत्तेतील विद्यार्थी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देण्यास पात्र असतो. हा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरल्यानंतर त्यास दहावीपर्यंत प्रतिवर्षी १५०० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.