शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वंचित शेतक-यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.

संजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा शेतकºयांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण तालुक्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या १८९०० शेतकºयांपैकी ७४४१ शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असून या शेतकºयांच्या कर्जखात्यात १७ कोटी ३३ लाख ११ हजार ३४९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध बँकेच्या ९२८१ खातेदारांनी कर्जमाफीसाठी दाखल केलेल्या आॅनलाइन अर्जात काही त्रुटी राहिल्या आहेत. काही अर्जात दाखल केलेली माहिती व बँकेने दाखल केलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याने या शेतकºयांना कर्जमाफी यादीत स्थान मिळाले नाही.या शेतकºयांच्या अर्जांची तपासणी करून ते कर्जमाफीच्या निकषात बसतात का नाही, याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे असे अर्ज तपासून पुन्हा कर्जमाफी यादी निश्चित करण्यात येणार आहे.तफावत असलेले बँकनिहाय अर्जजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २२६९पंजाब नँशनल बँक ३०महाराष्ट्र ग्रामीण बँक १२९कँनरा बँक १४७सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९५४देना बँक ५०२बँक आॅफ बडोदा ७८स्टेट बँक आॅफ इंडिया ३१८५बँक आॅफ महाराष्ट्र १३९४आय सी आय सी बँक ५९३नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहनबँकेकडून कर्ज उचलून या कर्जाची नियमित परतफेड करणाºया तालुक्यातील शेतकºयांनाही कर्जमाफी मिळाली असून या अंतर्गत २८९७ शेतकºयांना ४ कोटी १७ लाख ५९ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. याचबरोबर रूपांतरीत हप्ते पाडून दिलेल्या ८९ शेतकºयांनाही १७ लाख ९२ हजार ९१३ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.च्अर्जदार व बँकेकडील माहितीआधारे ताळमेळ घालून जे अर्जदार पात्र ठरले, त्यांच्या कर्जमाफीसाठी आवश्यक त्या याद्या व रक्कम सर्व बँकांना आॅनलाइन पद्धतीने वितरीत करण्यात आल्या आहेत. परंतु बँकेने पुरविलेल्या कर्जखात्यातील माहितीतील त्रुटी व शेतकºयांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही, अशा प्रकरणात निकषात बसणारे अर्जदार शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकºयांनी आपल्या बँकेकडे संपर्क साधून अर्ज दुरूस्ती करून घ्यावी. काही अडचण आल्यास सहायक निबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी१८९०० शेतकºयांपैकी १.५ लाख रूपयांच्या आत कर्ज असलेल्या ४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी मिळाली असून या पोटी १२ कोटी ९७ लाख ५८ हजार ७७६ रूपये या शेतकºयांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आले आहेत.