शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

वंचित शेतक-यांनाही कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:33 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत.

संजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी राज्य शासनाकडे दाखल केलेल्या अर्जात त्रुटी राहिली असे बँकेच्या माहितीत व शेतक-यांनी दाखल केलेल्या अर्जांच्या माहितीत तफावत आढळून आलेले तालुक्यातील ९२८१ शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकºयांनाही कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून अशा शेतकºयांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.तालुकास्तरीय अंमलबजावणी समितीछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पैठण तालुक्यातील शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरलेल्या १८९०० शेतकºयांपैकी ७४४१ शेतकºयांना कर्जमाफी मिळाली असून या शेतकºयांच्या कर्जखात्यात १७ कोटी ३३ लाख ११ हजार ३४९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान, तालुक्यातील विविध बँकेच्या ९२८१ खातेदारांनी कर्जमाफीसाठी दाखल केलेल्या आॅनलाइन अर्जात काही त्रुटी राहिल्या आहेत. काही अर्जात दाखल केलेली माहिती व बँकेने दाखल केलेल्या माहितीत तफावत आढळून आल्याने या शेतकºयांना कर्जमाफी यादीत स्थान मिळाले नाही.या शेतकºयांच्या अर्जांची तपासणी करून ते कर्जमाफीच्या निकषात बसतात का नाही, याची जबाबदारी निश्चित करण्यासाठी तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीद्वारे असे अर्ज तपासून पुन्हा कर्जमाफी यादी निश्चित करण्यात येणार आहे.तफावत असलेले बँकनिहाय अर्जजिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक २२६९पंजाब नँशनल बँक ३०महाराष्ट्र ग्रामीण बँक १२९कँनरा बँक १४७सेंट्रल बँक आॅफ इंडिया ९५४देना बँक ५०२बँक आॅफ बडोदा ७८स्टेट बँक आॅफ इंडिया ३१८५बँक आॅफ महाराष्ट्र १३९४आय सी आय सी बँक ५९३नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांनाही प्रोत्साहनबँकेकडून कर्ज उचलून या कर्जाची नियमित परतफेड करणाºया तालुक्यातील शेतकºयांनाही कर्जमाफी मिळाली असून या अंतर्गत २८९७ शेतकºयांना ४ कोटी १७ लाख ५९ हजार ६६० रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे. याचबरोबर रूपांतरीत हप्ते पाडून दिलेल्या ८९ शेतकºयांनाही १७ लाख ९२ हजार ९१३ रूपयांची कर्जमाफी मिळाली आहे.च्अर्जदार व बँकेकडील माहितीआधारे ताळमेळ घालून जे अर्जदार पात्र ठरले, त्यांच्या कर्जमाफीसाठी आवश्यक त्या याद्या व रक्कम सर्व बँकांना आॅनलाइन पद्धतीने वितरीत करण्यात आल्या आहेत. परंतु बँकेने पुरविलेल्या कर्जखात्यातील माहितीतील त्रुटी व शेतकºयांच्या अर्जामध्ये असलेल्या अपुºया माहितीमुळे ताळमेळ होऊ शकला नाही, अशा प्रकरणात निकषात बसणारे अर्जदार शेतकरी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून तालुकास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. शेतकºयांनी आपल्या बँकेकडे संपर्क साधून अर्ज दुरूस्ती करून घ्यावी. काही अडचण आल्यास सहायक निबंधक कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक निबंधक श्रीराम सोन्ने यांनी केले आहे.४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी१८९०० शेतकºयांपैकी १.५ लाख रूपयांच्या आत कर्ज असलेल्या ४४५५ शेतकºयांना १०० टक्के कर्जमाफी मिळाली असून या पोटी १२ कोटी ९७ लाख ५८ हजार ७७६ रूपये या शेतकºयांच्या कर्जखात्यात वर्ग करण्यात आले आहेत.