शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिग्दर्शकाला सामाजिक प्रश्नांचं भान असावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:48 IST

ग्रंथांबरोबरच चित्रपट हे समाज परिवर्तनासाठी प्रमुख माध्यम ठरु शकते. चित्रपटं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतात. तेव्हा दिग्दर्शकांनी चित्रपट बनविताना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम दिग्दर्शकांनी करावे, असे मत दिग्दर्शक संतोष राम यांनी व्यक्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रंथांबरोबरच चित्रपट हे समाज परिवर्तनासाठी प्रमुख माध्यम ठरु शकते. चित्रपटं समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचतात. तेव्हा दिग्दर्शकांनी चित्रपट बनविताना सामाजिक प्रश्नांचे भान ठेवणे आवश्यक आहे. चित्रपटाच्या माध्यमातून समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम दिग्दर्शकांनी करावे, असे मत दिग्दर्शक संतोष राम यांनी व्यक्त केले.एका कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष राम परभणीत आले होते. यावेळी ‘लोकमत’ने त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.दिग्दर्शनाकडे कसे वळालात? या थेट प्रश्नावर संतोष राम म्हणाले, मी मूळचा उदगीरचा. आमच्याकडे चित्रपट करणारा म्हटलं की वाया गेलेला, अशी धारणा होती. बाल वयापासून चित्रपट पाहण्याची आवड. पुढे एफटीआयमध्ये (फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया) प्रवेश घेण्यासाठी गेलो; परंतु, प्रवेश मिळाला नाही़ मात्र चित्रपट करायचे हे ध्येय समोर ठेवून अनेक प्रशिक्षणे केली़ पंडित सत्यदेव दुबे हे त्यातील प्रमुख नाव़ आशय फिल्म क्लबच्या माध्यमातून तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळाले व त्यानंतर १६ प्रोजेक्टमध्ये सह दिग्दर्शक म्हणून काम पाहिले़ या काळात नामांकीत दिग्दर्शकांसमवेत काम करण्याची संधी मिळाली़ एका प्रश्नाच्या उत्तरात संतोष राम म्हणाले, शिक्षण आणि फिल्म या सारख्याच गोष्टी आहेत़ प्रत्येक दिग्दर्शक प्रेक्षकांसमोर चित्रपट रुपाने जातो़ ती त्याची परीक्षाच असते़ त्यासाठी नवोदितांनी जागतिक चित्रपटांबरोबरच कला चित्रपटही पाहिले पाहिजेत़वर्तुळ आणि गल्ली या लघुपटांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल काय सांगाल? असे विचारले असता संतोष राम म्हणाले, वर्तुळ या लघुपटाची कथा माझीच आहे़ याच कथाबिजाला चित्रपटाच्या माध्यमातून साकारलं़ गल्ली लघुपटातून जगण्यातील काँट्रॉस एका नवीन शैलीत मांडण्याचा प्रयत्न केला़ या लघुपटांना जगभरात ५६ फिल्म फेस्टीव्हलमध्ये दाखविण्यात आले़ वर्तुळला १३ तर गल्लीला १२ पुरस्कार मिळाले़