शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

उदगीरला यायला एक तरी वाट ठेवा : दिलीपराव देशमुख

By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST

उदगीर : उदगीरला येणारी एक तरी वाट आमच्यासाठी ठेवा, असे भावोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी उदगीरात काढले़

उदगीर : नजीकच्या काळातील निवडणुकांद्वारे उदगीरला येणाऱ्या आमच्या वाटा बंद झाल्या आहेत़ आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकमेव मार्ग राहिला आहे़ हे सत्ताकेंद्र शेतकरीहिताचा विचार करणाऱ्या आमच्या प्रमाणिक पॅनलच्या हाती देऊन उदगीरला येणारी एक तरी वाट आमच्यासाठी ठेवा, असे भावोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी उदगीरात काढले़उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील काँग्रेस प्रणित पॅनलच्या प्रचारार्थ शनिवारी उदगीरात सभा झाली़ मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, विश्वनाथ बेळकोणे, कल्याण पाटील, रामराव बिरादार, गोविंदराव भोपणीकर, आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे, मुन्ना पाटील, विक्रांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी दिलीपराव यांनी माजी सभापती शिवाजी हुडे यांचे नाव न घेता ते आमच्या पॅनलमध्ये असते तर मी प्रचारालाही आलो नसतो, असे सांगत दिलीपरावांनी हुडे यांच्यावर टीका केली़ बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत नाही़ उद्योगपतींचे कर्ज मात्र झटक्यात माफ केले जाते़ शिवाय, येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांचे साकोळ येथील कारखान्यावर असलेले ८० कोटींचे कर्ज बँकाच्या ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेद्वारे माफ केले जाईल, असा दावा केला़ काँग्रेस प्रणित पॅनलला विजयी करुन विजयाची गुढी उभी करा, असे आवाहनही त्यांनी केले़