शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

उदगीरला यायला एक तरी वाट ठेवा : दिलीपराव देशमुख

By admin | Updated: March 25, 2017 23:11 IST

उदगीर : उदगीरला येणारी एक तरी वाट आमच्यासाठी ठेवा, असे भावोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी उदगीरात काढले़

उदगीर : नजीकच्या काळातील निवडणुकांद्वारे उदगीरला येणाऱ्या आमच्या वाटा बंद झाल्या आहेत़ आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा एकमेव मार्ग राहिला आहे़ हे सत्ताकेंद्र शेतकरीहिताचा विचार करणाऱ्या आमच्या प्रमाणिक पॅनलच्या हाती देऊन उदगीरला येणारी एक तरी वाट आमच्यासाठी ठेवा, असे भावोद्गार माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी उदगीरात काढले़उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील काँग्रेस प्रणित पॅनलच्या प्रचारार्थ शनिवारी उदगीरात सभा झाली़ मंचावर राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, विश्वनाथ बेळकोणे, कल्याण पाटील, रामराव बिरादार, गोविंदराव भोपणीकर, आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे, मुन्ना पाटील, विक्रांत भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी दिलीपराव यांनी माजी सभापती शिवाजी हुडे यांचे नाव न घेता ते आमच्या पॅनलमध्ये असते तर मी प्रचारालाही आलो नसतो, असे सांगत दिलीपरावांनी हुडे यांच्यावर टीका केली़ बस्वराज पाटील नागराळकर म्हणाले, हे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करीत नाही़ उद्योगपतींचे कर्ज मात्र झटक्यात माफ केले जाते़ शिवाय, येत्या काही दिवसात पालकमंत्र्यांचे साकोळ येथील कारखान्यावर असलेले ८० कोटींचे कर्ज बँकाच्या ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेद्वारे माफ केले जाईल, असा दावा केला़ काँग्रेस प्रणित पॅनलला विजयी करुन विजयाची गुढी उभी करा, असे आवाहनही त्यांनी केले़