शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जमिनीच्या मोबदल्यात तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:32 IST

जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या एकाच गटातील जमिनीला वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. जमिनीच्या मोबदल्यातील तफावतीमुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला असून, जमीन देण्यास विरोध होत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित केल्या जाणा-या एकाच गटातील जमिनीला वेगवेगळे दर निश्चित करण्यात आले आहेत. जमिनीच्या मोबदल्यातील तफावतीमुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला असून, जमीन देण्यास विरोध होत आहे. एका गटातील जमिनीला सारखाचा दर मिळावा, अशी समृद्धीबाधित शेतक-यांची मागणी आहे.जालना व बदनापूर तालुक्यातील २५ गावांमधील सुमारे ५१२ हेक्टर जमीन समृद्धी महामार्गासाठी संपादित केली जाणार आहे. या जमिनीच्या संयुक्त मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. संपादित केल्या जाणाºया जमिनीची जिरायती, हंगामी बागायती व बागायती, असे तीन गट करण्यात आले आहेत. मात्र, बहुतांश गावांमध्ये एकाच शेतक-याची एकाच गटातील काही जमीन बागायत तर काही जमीन जिरायती दाखविण्यात आली आहेत.संपूर्ण संचिन सुविधा उपलब्ध असताना केवळ ऊस, फळबागा असणारी जमिनी बागायती तर अन्य पिके असणारी जमीन जिरायती दाखविण्यात आली आहे. त्यानुसार जमिनीला वेगवेगळा दर निश्चित करण्यात आला आहे. यामुळे शेतक-यांमध्ये संभ्रम वाढला आहे.परिणामी बागायती जमीन मोठ्या प्रमाणात असलेल्या गावांमधील शेतकरी जमीन देण्यास विरोध करत आहेत. बारमही सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या एका गटातील जमिनीला वेगवेगळे दर न बागायती जमिनीचे दर द्यावे, अशी मागणी समृद्धीबाधित शेतक-यांमधून केली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून जमिनीचा दर ठरविण्याचे वेगवेगळे निकष पुढे करून शेतकºयांची दिशाभूल करत असल्याचे शेतकरी हक्क बचाव व कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत गाढे यांनी सांगितले.