शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

डिझेलअभावी रस्त्यातच बंद पडली एस. टी.

By admin | Updated: September 29, 2014 00:46 IST

औरंगाबाद : डिझेल संपल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून निघालेली बस रस्त्यातच बंद पडल्याने सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांची शनिवारी रात्री मोठी गैरसोय झाली.

औरंगाबाद : डिझेल संपल्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकातून निघालेली बस रस्त्यातच बंद पडल्याने सर्वसामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांची शनिवारी रात्री मोठी गैरसोय झाली. विशेष म्हणजे औरंगाबादहून प्रवास सुरू केल्यानंतर ही बस जालन्यात बंद पडली. तब्बल तासाभरानंतर इंधन मिळाल्याने पुढील प्रवास सुरू झाला. परंतु इंधन भरण्यात निष्काळजीपणा केल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.मध्यवर्ती बसस्थानकातून औरंगाबाद - नागपूर बस रात्री सुटली. परंतु जालन्यात पोहोचत नाही तोच ती बंद पडली. याविषयी प्रवाशांनी अधिक माहिती घेतली असता बसमध्ये डिझेल नसल्याने ती बंद पडल्याचे समोर आले. एक तासानंतर इंधन मिळाल्याने बस पुढे निघाली. परंतु मिळालेले डिझेल अपुरे असून, ही बस नागपूरला पोहोचणार नाही, असे चालक-वाहकांकडून प्रवाशांना सांगण्यात आले. त्यामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. करिअरच्या महत्त्वाच्या टप्प्यातील परीक्षेसाठी नागपूरला जाणारे अनेक विद्यार्थी या बसमध्ये होते. सकाळी ९ वाजता परीक्षेची वेळ असल्याने त्यापूर्वी बस नागपूरला पोहोचणार नसल्याची चिंता विद्यार्थ्यांना सतावत होती. याविषयी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना माहिती दिली. याविषयी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही माहिती मिळाली. परंतु पुरेसे इंधन मिळाल्याने बस नागपूरला पोहोचेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जालन्यानंतर पुढील टप्प्यात इंधन घेऊन बस सकाळी ७ वाजता नागपूरला पोहोचल्याचे प्रवाशांनी सांगितले. तासभर उशिराने बस पोहोचली. लांब पल्ल्याचा प्रवास सुरू करण्याआधीच बसमध्ये डिझेल भरण्याची गरज आहे. बसमध्ये इंधन आहे की, नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित चालकाची आहे, असे प्रवाशांनी सांगितले.