शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

जिल्ह्यात दहा हजारांच्यावर मधुमेहाचे रूग्ण

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

बीड : आरोग्याबाबत ‘अव्हेरनेस’ चा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासण्या न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो़ वयाच्या वीस-ऐकेवीसीतच मधुमेहा सारखा आजार होत आहे़

बीड : आरोग्याबाबत ‘अव्हेरनेस’ चा अभाव असल्याने वेळेवर आरोग्य तपासण्या न करून घेतल्याने उपचाराला विलंब होतो़ वयाच्या वीस-ऐकेवीसीतच मधुमेहा सारखा आजार होत आहे़ याला वेळीच आळा घालण्यासाठी व्यायाम, योग्य आहार व औषधोपचार या त्रिसुत्रीचा अवलंब करून मधुमेह आटोक्यात ठेवता येऊ शकतो़ आज स्थितीत जिल्ह्यात दहा हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण असल्याचे डॉ़ संजय पाटील यांनी सांगितले़जिल्ह्यातील मधुमेह रूग्णांची मोफत तपासणी करण्याची मोहीम जिल्हा रूग्णालय प्रशासनाने मागील चार दिवसापासून हाती घेतली होती़ यामध्ये ११४ रूग्णांची तपासणी करण्यात आली़ मधुमेहाच्या रूग्णांना समुपदेशनाची नितांत गरज असल्याचे लक्षात घेवून येथील जिल्हा रूग्णालय प्रशासनाच्या वतीने तपासणी केल्यानंतर रूग्णाचे समुपदेशन करण्यात आले़ आज स्थितीत बीड जिल्ह्यात दहा हजाराच्या वर मधुमेहाचे रूग्ण आहेत़ पुर्वी मधुमेह हा वयोवृध्द व्यक्तींमध्ये आढळून येत होता़ मात्र आता आठरा वर्ष वयातील तरूणांमध्ये देखील मधुमेहाचे प्रमाण दिसून येत आहे़ यामुळे तज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे़ जिल्ह्यातील सरकारी दवाखान्यातील आकडेवाडी नुसार जिल्ह्ययात दहा हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण आहेत़ मात्र खाजगी दवाखाण्यांमधूनही उपचार घेतले जातात़ यामुळे पंचेवीस हजाराच्या जवळपास मधुमेहाचे रूग्ण जिल्ह्यात असण्याची शक्यता असल्याचे मेडिकल क्षेत्रातील तंज्ञांचे म्हणणे आहे़त्रिसुत्रीचा ‘युज’़़़ ‘डायबेटीज’ गुलडायबेटिजच्या रूग्णांनी सहा महिन्यातून एकदा आपल्या आरोग्य तपासण्या करून घेणे आवश्यक आहे़ याशिवाय व्यायाम, योग्य आहार व औषधोपचार ही त्रिसुत्री जर मधुमेहाच्या रूग्णांनी आमलात आनली तर आजार आटोक्यात ठेवता येऊ शकतो़ नाहीतर डोळ्यांचे आजार अथवा जखम झाली तर ती भरून न येणे असे आजार फोफावू शकतात़ असे तज्ञांनी सांगितले़