शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

समृद्धीच्या कामावरील अवजड वाहनांमुळे धुळेचे लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

शेंद्रा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे परिसरात धुळेचे लोट हवेत उडत असून, यामुळे अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला ...

शेंद्रा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे परिसरात धुळेचे लोट हवेत उडत असून, यामुळे अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

समृद्धी महामार्गामुळे परिसरात विकासाची गंगा वाहणार आहे. दळणवळण यंत्रणा अधिक सोयीची झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग परिसरात येणार आहेत. यातून रोजगारच्या संधीही वाढणार आहेत. या मार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही वाहने गावाशेजारुन नियमित ये-जा करतात; मात्र या वाहनांमुळे तसेच स्फोटानंतर होणारी धूळ ग्रामीण भागातील शेती आणि नागरिकांना मृत्यूच्या सापळ्यात ओढणारी ठरत आहे. वायू तसेच ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाची समस्या वाढत आहे.

भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे धूळ हवेच्या संपर्कात येऊन ५०० मीटर अंतरपेक्षा जास्त दूरपर्यंत पसरते. या धुळीमुळे शेतीचेही नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

धुळीमुळे होणारे आजार...

डोळ्यांना खाज येणे/ डोळे लाल होणे, नियमित सर्दीचा त्रास होणे

श्वसनास त्रास होणे, अंगाला खाज येणे, थंडीमध्ये चेहरा आणि हात पाय काळे पडणे,

....शेतीचे होणारे नुकसान

गहू आणि ज्वारी पिकाचे दाणे बारीक पडणे, बियाणाचा कांदा बोडखा होणे, जनावरांच्या चाऱ्यावर धूळ साचल्याने अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.

धूळयुक्त चारा खाल्ल्याने दुभती जनावरे कमी दूध देतात,

अनेक विहिरीतील पाणीही दूषित झाले आहे.

कॅप्शन

क्रेशरमुळे होत असलेली ही धूळ आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे.