शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

समृद्धीच्या कामावरील अवजड वाहनांमुळे धुळेचे लोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:04 IST

शेंद्रा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे परिसरात धुळेचे लोट हवेत उडत असून, यामुळे अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला ...

शेंद्रा : समृद्धी महामार्गाच्या कामावरील अवजड वाहनांमुळे परिसरात धुळेचे लोट हवेत उडत असून, यामुळे अबालवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

समृद्धी महामार्गामुळे परिसरात विकासाची गंगा वाहणार आहे. दळणवळण यंत्रणा अधिक सोयीची झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्योग परिसरात येणार आहेत. यातून रोजगारच्या संधीही वाढणार आहेत. या मार्गाच्या कामामुळे अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. ही वाहने गावाशेजारुन नियमित ये-जा करतात; मात्र या वाहनांमुळे तसेच स्फोटानंतर होणारी धूळ ग्रामीण भागातील शेती आणि नागरिकांना मृत्यूच्या सापळ्यात ओढणारी ठरत आहे. वायू तसेच ध्वनी प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनाची समस्या वाढत आहे.

भरधाव धावणाऱ्या वाहनांमुळे धूळ हवेच्या संपर्कात येऊन ५०० मीटर अंतरपेक्षा जास्त दूरपर्यंत पसरते. या धुळीमुळे शेतीचेही नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

धुळीमुळे होणारे आजार...

डोळ्यांना खाज येणे/ डोळे लाल होणे, नियमित सर्दीचा त्रास होणे

श्वसनास त्रास होणे, अंगाला खाज येणे, थंडीमध्ये चेहरा आणि हात पाय काळे पडणे,

....शेतीचे होणारे नुकसान

गहू आणि ज्वारी पिकाचे दाणे बारीक पडणे, बियाणाचा कांदा बोडखा होणे, जनावरांच्या चाऱ्यावर धूळ साचल्याने अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात.

धूळयुक्त चारा खाल्ल्याने दुभती जनावरे कमी दूध देतात,

अनेक विहिरीतील पाणीही दूषित झाले आहे.

कॅप्शन

क्रेशरमुळे होत असलेली ही धूळ आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहे.