शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांची शहरात धूम, ३ महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:12 IST

लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.

ठळक मुद्देवृद्ध महिला चोरट्यांचे लक्ष्य : बीड बायपास, सेव्हन हिल आणि सिडकोत घडल्या घटना

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.पहिली घटनाबीड बायपास परिसरातील गोपीकिसन रामकिसन राठी यांच्या आई वत्सलाबाई (वय ८०) या बुधवारी सकाळी ६.३० वाजता झोपेतून उठल्या. त्या घराच्या अंगणात तोंड धूत होत्या. तेव्हा लाल रंगाच्या मोटारसायकलवरून दोन जण आले. दुचाकीवरील एक जण खाली उतरला आणि राठी यांच्या घराशेजारील किराणा दुकानात गेला. त्याने पाण्याची बाटली विकत घेतली. पाणी पिले. तोपर्यंत दुचाकीस्वार त्याची मोटारसायकल पुढे जाऊन वळवून आला. त्याच्या साथीदाराने आणखी एक पाण्याची बाटली मागितली. याचवेळी त्या चोरट्याने वत्सलाबाई यांच्या पाठीला स्पर्श केला. वत्सलाबाई मागे वळून पाहत असतानाच एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोनसाखळी हिसका देत तोडली आणि तो साथीदारासह मोटारसायकलवर बसून निघून गेला. वत्सलाबाई यांनी चोर, चोर म्हणून आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत चोरटे वेगाने तेथून पळून गेले. या घटनेप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.घटना दुसरीदुसरी घटना जळगाव रोडलगतच्या सर्व्हिस रोडवरील विजयश्री कॉलनीच्या कॉर्नरवर सकाळी ७.१० वाजेच्या सुमारास घडली. बायपासवर वृद्धेची सोनसाखळी हिसकावल्यानंतर चोरट्यांनी जळगाव रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडने पायी जाणाºया ७२ वर्षीय पुष्पावती गोपालराव गंटा (रा. सत्यमनगर, सिडको एन-५) यांना गाठले. पुष्पावती सर्व्हिस रोडने एकट्याच जात होत्या. त्या विजयश्री कॉलनी कॉर्नरवर असताना लाल रंगाच्या दुचाकीने आलेले दोन चोरटे अचानक मागून आले आणि त्यांच्याजवळ येऊन थांबले. दुचाकीवर मागे बसलेल्या एका चोरट्याने पुष्पावती यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रास हिसका दिला. प्रसंगावधान राखून पुष्पावती यांनी सोनसाखळी पकडली. त्यामुळे माळेतील दोन वाट्या त्यांच्या हातात राहिल्या आणि चोरटे दोन पदरी सोनसाखळी घेऊन सुसाट निघून गेले. पुष्पावती यांनी चोर, चोर म्हणून मदतीसाठी आरडाओरड केली, तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी पुष्पावती यांनी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसChain Snatchingसोनसाखळी चोरी