शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
5
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
6
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
7
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
8
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
9
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
10
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
11
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
12
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
13
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
14
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
15
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
16
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
17
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
18
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
19
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
20
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!

धारूर सा.बां. विभागाचा कारभार राम भरोसे

By admin | Updated: June 9, 2014 00:05 IST

धारुर: धारुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार राम भरोसे चालत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे.

धारुर: धारुर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा कारभार राम भरोसे चालत असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. येथे कार्यरत असलेले उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे उंटावरुनच कारभार हाकत असल्याने महिनाभरापूर्वी करण्यात आलेले रस्ते उखडू लागले आहेत. केवळ महिनाभरातच हे रस्ते उखडल्याने या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.धारुर सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता एस.डी. नाईक, कनिष्ठ अभियंते दोन आहेत, मात्र हे सर्व लातूरहूनच धारुर सार्वजनिक बांधकाम विभागाचा कारभार हाकतात. उपअभियंता व कनिष्ठ अभियंता हे तब्बल महिना-महिना सा.बां. विभागाच्या कार्यालयाकडे फिरकत नसल्याने होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष होत असून, उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना वरिष्ठांचेच अभय असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंडोबा सावंत यांनी केला आहे. पांगरी ते वाघोली हे ४ कि.मी.अंतर असलेल्या रस्त्याचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे झाले असून, या रस्त्यावर हॉटमिक्स कारपेट करण्याचे टाळून सरफेज ड्रेसिंग करुन काम आटोपते घेण्यात आले. त्यामुळे महिन्यापूर्वी झालेल्या रस्त्यावर खड्डे झाले आहेत. तीच अवस्था धारुर, आसरडोह रस्त्याची झाली असून, या रस्त्याचे काम होऊन यावर आत्ताच खड्डे झाल्याने पावसाळ्यात याची काय अवस्था होणार? असा प्रश्न भाजपाचे बाळासाहेब कुरुंद यांनी उपस्थित केला आहे. या सर्व कामाच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व कारभाराकडे उपअभियंता व कनिष्ठ अभियंत्याचे दुर्लक्ष असल्याचा आरोपही कुरुंद यांनी केला आहे. या कार्यालयाचा कारभार पूर्णपणे ढासळत चालला असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे यांच्यावर अंकुश कोण ठेवणार? कामाचा दर्जा सुधारणार की नाही? यासारखे अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहेत.याबाबत उपविभागाचे उपअभियंता एस.डी. नाईक, कनिष्ठ अभियंता देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे दोन्ही अभियंते मागील अनेक दिवसांपासून कार्यालयाकडे फिरकले नसल्याने सर्वसामान्यांमधून तर्कवितर्क लावले जात आहेत. हे अभियंते लातूरला वास्तव्यास असल्याने धारुरच्या सा.बां. विभागाचा संपूर्ण कारभार हा लातूरहूनच हाकला जात असल्याचा आरोपही कुरुंद व सावंत यांनी केला आहे.सा.बां. विभागाच्या गलथान कारभारामुळे धारुर तालुक्यातील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. महिनाभरातच रस्ते उखडत असल्याने रस्त्यासाठी आलेला निधी हडप करण्याचे काम अभियंत्यासह इतर अधिकारी, कर्मचारी करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या दोन्ही अभियंत्यांनी धारुर कार्यालयात थांबून व्यवस्थित काम करुन सर्वसामान्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.(वार्ताहर)नियंत्रणाचा अभावअभियंते कार्यालयात हजर राहत नसल्याने रस्त्याचे कामे होत आहेत निकृष्ट दर्जाचेमहिनाभरातच उखडले रस्तेअभियंत्यांच्या कामकाजावर सर्वसामान्यांमधून होतोय प्रश्न उपस्थितवरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असल्याचा बंडोबा सावंत, बाळासाहेब कुरुंद यांचा आरोप