शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

हजारो भाविकांच्या साक्षीने धर्म संमेलनाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : ‘हरि बोल’ असा जयघोष करीत हजारो भाविकांच्या साक्षीने विराट धर्म संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली.

औरंगाबाद : ‘हरि बोल’ असा जयघोष करीत हजारो भाविकांच्या साक्षीने विराट धर्म संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली. हरिकृपा सेवा समितीच्या वतीने श्रीहरी पॅव्हेलियन येथे सायंकाळी ६ वाजता धर्म संमेलनाला सुरुवात झाली. स्वामी हरिचैतन्य महाप्रभूजी यांनी सांगितले की, परमेश्वराची उपासना पद्धती विविध प्रकारची असून भक्तीचे मार्गही विविध आहेत; परंतु परमेश्वर एकच असून आपण त्याची सर्व लेकरे आहोत. असे असताना आपण आपसात का भांडतो? परमेश्वराने आपल्या नसांमध्ये रक्त दिले आहे. त्या रक्ताला हिंसेने वाया घालवू नका. विचार पंथ आणि संप्रदाय वेगळे असू शकतात, पण धर्म एकच आहे. जो राष्ट्रीयता, नैतिकता, मानवता आणि एकात्म भावनेचा संदेश देतो. परंतु दुर्दैवाने आज धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे, ही निंदनीय बाब आहे, असे म्हणत स्वामीजी पुढे म्हणाले की, धर्म विज्ञान प्रेरित आहे आणि ते एकमेकास पूरक आहेत. धर्मापासून विज्ञान वेगळे केले तर समाजात ढोंगी पाखंडी, अंधविश्वास आणि रुढी-परंपरावाद वाढीस लागेल. त्याला प्रोत्साहन मिळेल आणि विकासाऐवजी विनाश ओढवेल, समाजातील वाईट आचार-विचार आणि विकारांना दूर सारून धर्मपालन व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले. स्वामीजींची दिव्य वाणी ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले होते. प्रभावी विचार आणि अमूल्य संदेशाने सर्व जण मंत्रमुग्ध झाले होते.