शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

धनगर समाज,शेतकऱ्यांची आंदोलने

By admin | Updated: September 16, 2014 01:33 IST

बीड : शासनाकडून प्राप्त झालेली व्याज अनुदानाची रक्कम मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या खाती जमा न केल्याने परळी तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांनी बीड शहरातील

बीड : शासनाकडून प्राप्त झालेली व्याज अनुदानाची रक्कम मागील तीन वर्षापासून शेतकऱ्यांच्या खाती जमा न केल्याने परळी तालुक्यातील मोहा येथील शेतकऱ्यांनी बीड शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर तर धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शासनाने कोणताही निर्णय न घेतल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख पीक प्रोत्साहन सवलत अनुदान योजनेर्तंगत शासनाकडुन व्याज अनुदानाची रक्कम प्राप्त झाली असल्याचा आरोप अ‍ॅड. अजय बुरांडे यांनी केला आहे. परळी तालुक्यातील भिल्लेगाव, कवळ्याचीवाडी येथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा मोहा येथे अनुदान मिळण्यासाठी वारंवार निवेदन व पत्र दिले होते. मात्र शाखाधिकारी कसबे यांनी पीक कर्जाच्या व्याज माफी सवलतीची अंमलबजावणी करुन स्वीकारलेली व्याजाची रक्कम परत खात्यावर जमा केली नाही. याबाबत त्यांच्याशी वारंवार संपर्क साधल्यानंतर त्यांनी लेखी उत्तर दिले होते. व्याज सवलतीच्या ७ टक्के रकमेची मागणी न करता केवळ ४ टक्के व्याज मागितले आहे. यामुळे उर्वरित ३ टक्के व्याज शाखा व्यवस्थापकाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांच्या माथी मारले गेले असल्याचा उल्लेख पत्रकात करण्यात आला आहे. नवीन पीक कर्ज देण्याबाबत शाखाधिकारी यांच्याकडे विनंती केली असता कागदपत्रांची मागणी केली असता नवीन पीक कर्ज संदर्भात योग्य ती कागदपत्रे देऊन कर्जाची मागणी केली. मात्र बँकेकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली आहेत.या उपोषणात सुमंत देशमुख, विष्णू देशमुख, अनिस शेख, अल्लाउद्दीन याकूब शेख, प्रवीण देशमुख, उद्धव निंबाळकर, कोंडीबा कडभाने, चंद्रकांत कडभाने, हनुंमत धावणे, भगवान कडभाने, मदन वाघमारे, बालासाहेब कडभाने, विशाल पुरी, सागर विर्धे, अप्पाराव माने, शेख अली, विशाल देशमुख, बाळासाहेब शेप यांच्यासह आदी शेतकरी बीड येथील सुभाष रोडवरील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर उपोषणाला बसले आहेत.धनगर समाजाला आरक्षण देण्या संदर्भात यशवंत सेनेच्यावतीने आंदोलने करण्यात आली होती. मात्र शासनाने याचा गांर्भियाने विचार केला नाही. धनगर समाजाला आरक्षण नाकारल्याच्या निषेधार्थ यशवंत सेना धनगर समाजाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यशवंत सेनेच्यावतीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. आंदोलन व्यापक स्वरुपात होत असल्याने याची दखल शासनाने घेतली होती. या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आरक्षण कृती समितीने भेट घेऊन धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात निवेदन दिले होते. त्यावेळी दोन्ही मंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले होते मात्र याबाबत कोणातही निर्णय घेतला नाही. आता आचार संहिता लागु झाली आहे. त्यामुळे शासन कोणाताही निर्णय जाहीर करु शकणार नसल्याने यशवंत सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाचा निषेध करण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. धनगर आरक्षण प्रश्नासंदर्भात गेल्या चार-पाच महिन्यापासून धनगर समाज बांधव राज्यात आंदोलने करीत होते. या आंदोलनांची गांर्भियाने दखल घेण्यात आली होती. त्यामुळे आरक्षण कृती समितीला आश्वासन देऊन या संदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वास दिले होते मात्र असे न करता आमचा प्रश्न मार्गी न लावता प्रलंबित ठेवला आहे. याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केले आहे. धरणे आंदोलनात परमेश्वर सोन्नर, अजय जेटे, संगत बेद्रे, संदिप सोन्नर, विशाल पांढरे, यांच्यासह शेकडो धनगर समाज बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)