शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

शाडूच्या गणेशमूर्तींना भक्तांची सर्वाधिक पसंती

By admin | Updated: August 29, 2014 01:31 IST

औरंगाबाद : गणेशोत्सवाचे स्वागत जोरदार केले जात असताना काळानुरूप त्याच्या स्वरूपात बदल झाले पाहिजेत, अशी समस्त गणेशभक्तांची केवळ मागणीच आहे असे नाही;

औरंगाबाद : गणेशोत्सवाचे स्वागत जोरदार केले जात असताना काळानुरूप त्याच्या स्वरूपात बदल झाले पाहिजेत, अशी समस्त गणेशभक्तांची केवळ मागणीच आहे असे नाही; तर हे बदल कसे करता येतील हेही त्यांनी सांगितले आहे.२९ आॅगस्टपासून सुरू होत असलेल्या ११ दिवसांच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने १७ ते ६५ वर्षे वयापर्यंतच्या ६५ स्त्री-पुरुषांना प्रश्नावली दिली होती. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, घरकाम, गृहिणी अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारे गणेशभक्त जागरूक नागरिक असल्याचे या पाहणीतून समोर आले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने सर्वाधिक पसंती शाडूच्या गणेशमूर्तींना मिळाली आहे. गणेशोत्सवात आवाजाचा त्रास खूप होतो, अशी सार्वत्रिक तक्रार असली तरी या पाहणीत भक्तांनी मंडळाच्या ठिकाणी लाऊडस्पीकर असावा, अशी ठाम भूमिका घेतली आहे. ६५ पैकी ४१ जणांना लाऊडस्पीकर असावा असे वाटते. उत्सवाचे १० दिवस गणपतीच्या मूर्ती बघायला येणाऱ्या भक्तांना चित्रपटांतील गाणी ऐकायला काही प्रमाणात आवडते. मात्र, या उत्सवात चित्रपटगीते वाजवूच नयेत, असेही तेवढ्याच भक्तांना वाटते.उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीचे आकर्षण सगळ्यांनाच असते. त्या दिवशी जवळपास सुटीही असते. त्यामुळे आबालवृद्धांमध्ये मिरवणुकीचा उत्साह असतो. विसर्जन मिरवणूक पुणे शहरात २४-३० तास चालते. औरंगाबादेतही ही मिरवणूक किती चालावी, हे सांगताना नागरिकांनी १२ तासांना सर्वाधिक पसंती दिली. कार्यकर्त्यांनी धांगडधिंगा करू नये. त्यामुळे मंडळाची व उत्सवाची प्रतिमा मलिन होते.४इतरांना त्रास होऊ नये अशा पद्धतीने उत्सव साजरा करावा.४उत्सवाच्या मूळ धार्मिक परंपरा जपाव्यात.४सांस्कृतिक कार्यक्रम करावेत.४समाजोपयोगी उपक्रमांनाही प्राधान्य असावे.४दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अनुत्पादक खर्च कमी करून तो पैसा सरकारला द्यावा.