शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
3
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
4
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
5
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
6
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
7
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
8
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
9
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
11
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
12
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
13
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?
14
अलास्कामध्ये ट्रम्प-पुतिन भेटीनंतर एका अमेरिकन नागरिकाला मिळाले १९ लाखांचे गिफ्ट; नेमकं प्रकरण काय?
15
Nashik Crime: 'तुझ्या आईने आपले लग्न जमवलंय'; भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर घरातच सुरू केले...
16
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
17
"जन्मदात्यांना नकोशी होती, गर्भातच मारण्याचा प्रयत्न", भारती सिंगची हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट
18
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
19
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
20
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

विकास आराखड्याचीच ‘हत्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:01 IST

औपचारिकता म्हणून आराखडे मंजूर करून ठेवण्यात येतात, अशा शब्दांत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या कारभाराचे वाभाडे काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकांसाठी शहर विकास आराखडा आत्मा आहे. एखाद्या धर्मासाठी त्यांचा धर्मग्रंथ जसा मार्गदर्शक असतो तसेच महापालिकांसाठी विकास आराखडा आहे. याची किंचितही अंमलबजावणी होत नाही. औपचारिकता म्हणून आराखडे मंजूर करून ठेवण्यात येतात, अशा शब्दांत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या कारभाराचे वाभाडे काढले. औरंगाबादेत मागील पाच दशकांमध्ये दोन विकास आराखडे मंजूर झाले. या आराखड्यांची ‘हत्या’ करण्याचे पापही सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाºयांकडूनच झाले, हेविशेष.इतिहासाचा वारसा लाभलेल्या औरंगाबाद शहरात सर्वात प्रथम म्हणजेच १९७२ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. जुन्या शहराशी निगडित हा आराखडा होता. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने शासनाने १९८२ मध्ये नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत केले. याच दरम्यान, शहराच्या आजूबाजूच्या १८ खेड्यांचा मनपात समावेश करण्यात आला. मनपाने नवीन औरंगाबाद शहर डोळ्यासमोर ठेवून १९८६-८७ मध्ये एक नवीन विकास आराखडा तयार केला. त्याला १९९१ मध्ये मंजुरी मिळाली. या आराखड्याची मुदत २०११ मध्ये संपली. आराखड्याची अंमलबजावणी १० टक्केही झाली नाही. २०११ पासून नवीन विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाने नगररचना विभागातील तज्ज्ञ अधिकाºयांचे एक पथक या कामासाठी नेमले. या पथकावर तब्बल दीड कोटी रुपये मनपाकडून खर्च करण्यात आला. २०१५ मध्ये आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले. ३० आॅक्टोबर रोजी मनपा आयुक्तांकडे आराखडा सोपविण्यात आला.शासनाने सादर केलेला आराखडा जनतेसमोर प्रसिद्ध करण्यात आला नाही. त्यामध्ये प्रचंड फेरफार करून नागरिकांसमोर ४ फेबु्रवारी २०१६ मध्ये मांडण्यात आला. या चुकीच्या आराखड्याला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरवून नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.खंडपीठाच्या निर्णयाला सध्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवार, ११ सप्टेंबर रोजी याची सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर मनपाने आतापर्यंत १ कोटी रुपये खर्च केले आहेत, हे विशेष. मनपा सर्वसाधारण सभेत विकास आराखड्याचीहत्या करण्याचे काम मागील वर्षी सत्ताधारी शिवसेना-भाजपकडूनच झाले.