शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखड्याचीच ‘हत्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 01:01 IST

औपचारिकता म्हणून आराखडे मंजूर करून ठेवण्यात येतात, अशा शब्दांत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या कारभाराचे वाभाडे काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकांसाठी शहर विकास आराखडा आत्मा आहे. एखाद्या धर्मासाठी त्यांचा धर्मग्रंथ जसा मार्गदर्शक असतो तसेच महापालिकांसाठी विकास आराखडा आहे. याची किंचितही अंमलबजावणी होत नाही. औपचारिकता म्हणून आराखडे मंजूर करून ठेवण्यात येतात, अशा शब्दांत शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकांच्या कारभाराचे वाभाडे काढले. औरंगाबादेत मागील पाच दशकांमध्ये दोन विकास आराखडे मंजूर झाले. या आराखड्यांची ‘हत्या’ करण्याचे पापही सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या पदाधिकाºयांकडूनच झाले, हेविशेष.इतिहासाचा वारसा लाभलेल्या औरंगाबाद शहरात सर्वात प्रथम म्हणजेच १९७२ मध्ये शहर विकास आराखडा तयार करण्यात आला. जुन्या शहराशी निगडित हा आराखडा होता. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने शासनाने १९८२ मध्ये नगर परिषदेचे रूपांतर महापालिकेत केले. याच दरम्यान, शहराच्या आजूबाजूच्या १८ खेड्यांचा मनपात समावेश करण्यात आला. मनपाने नवीन औरंगाबाद शहर डोळ्यासमोर ठेवून १९८६-८७ मध्ये एक नवीन विकास आराखडा तयार केला. त्याला १९९१ मध्ये मंजुरी मिळाली. या आराखड्याची मुदत २०११ मध्ये संपली. आराखड्याची अंमलबजावणी १० टक्केही झाली नाही. २०११ पासून नवीन विकास आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. शासनाने नगररचना विभागातील तज्ज्ञ अधिकाºयांचे एक पथक या कामासाठी नेमले. या पथकावर तब्बल दीड कोटी रुपये मनपाकडून खर्च करण्यात आला. २०१५ मध्ये आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले. ३० आॅक्टोबर रोजी मनपा आयुक्तांकडे आराखडा सोपविण्यात आला.शासनाने सादर केलेला आराखडा जनतेसमोर प्रसिद्ध करण्यात आला नाही. त्यामध्ये प्रचंड फेरफार करून नागरिकांसमोर ४ फेबु्रवारी २०१६ मध्ये मांडण्यात आला. या चुकीच्या आराखड्याला औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले. खंडपीठाने संपूर्ण प्रक्रिया रद्द ठरवून नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.खंडपीठाच्या निर्णयाला सध्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. सोमवार, ११ सप्टेंबर रोजी याची सुनावणी होणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर मनपाने आतापर्यंत १ कोटी रुपये खर्च केले आहेत, हे विशेष. मनपा सर्वसाधारण सभेत विकास आराखड्याचीहत्या करण्याचे काम मागील वर्षी सत्ताधारी शिवसेना-भाजपकडूनच झाले.