शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

सुनियोजित वसाहतींशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:04 IST

एस.एस. खरवडकर सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद ‘महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता ...

एस.एस. खरवडकर

सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद

‘महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता जिल्ह्यातील सर्व एन-ए च्या परवानग्या सहसंचालक कार्यालयातून दिल्या जात आहेत.’

दोन दशकांपूर्वी नगररचना विभागाकडे खूप गांभीर्याने पाहिले जात नसे; परंतु अधिकृत मालमत्तांचे फायदे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वसाहतींमुळे मिळणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांमध्ये आलेली जागरूकता सुनियोजित वसाहती निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. सुनियोजित वसाहती असतील तरच शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होईल.

औद्योगिक एन-ए, व्यावसायिक एन-ए, रहिवासी एन-ए आणि शैक्षणिक एन-ए, अशा चार एन-ए परवानग्या सध्या दिल्या जात आहेत. औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता जिल्ह्यातील सर्व एन-एच्या परवानग्या सहसंचालक कार्यालयातून दिल्या जात आहेत. शासनाने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेत बदल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुनियोजित वसाहती निर्माण होत आहेत.

सरकारने एमएलआर कोडमध्ये खूप बदल केले आहेत. त्यामुळे एन-एची प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील त्यामध्ये खूप बदल करून सुविधा दिल्या आहेत. एएमआरडीए, शेंद्रा परिसरातील विकास प्रादेशिक आराखड्यामुळे सध्या सुरळीत होत आहे. औद्योगिक विकासाला चालन मिळते आहे. पूर्वी ग्रीन झोनमध्ये रहिवासी परवानगी मिळत नव्हती. पंतप्रधान आवास योजना, मनपा हद्दीपासून २ कि.मी., नगरपालिका हद्दीपासून १ कि.मी. हद्दीत शासनाने परवानगी देऊ केली आहे. लो इन्कम किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक एफएसआयमध्ये घरकुलांसाठी परवानगीचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिडकोतून झालर क्षेत्रासाठी टेंटेटिव्ह एन-एची परवानगी मिळते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली जात आहे.

जिथे शहरी भाग असेल तेथे पूर्ण नियोजन झाले असेल आणि कुणाची त्या निवासी भागात शेती असेल, तर तेथे स्वतंत्र एन-एची गरज नाही. त्यासाठी तलाठी किंवा तहसीलदार हे अकृषक मूल्यांकन करून परवानगी सध्या दिली जात आहे. उद्योगासाठी एखाद्याला जागा वापरायची असेल, तर त्यासाठी जिल्हाधिकारी थेट एन-ए देऊ शकतात. ग्रीन झोनसाठी एन-ए मिळत नाही. शासनाने सर्व काही सुटसुटीत आणि नियमानुकूल केल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात अधिकृत सुनियोजित वसाहतींचे प्रमाण वाढेल आणि ते सर्वांच्याच हिताचे असेल.