शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

सुनियोजित वसाहतींशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:04 IST

एस.एस. खरवडकर सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद ‘महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता ...

एस.एस. खरवडकर

सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद

‘महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता जिल्ह्यातील सर्व एन-ए च्या परवानग्या सहसंचालक कार्यालयातून दिल्या जात आहेत.’

दोन दशकांपूर्वी नगररचना विभागाकडे खूप गांभीर्याने पाहिले जात नसे; परंतु अधिकृत मालमत्तांचे फायदे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वसाहतींमुळे मिळणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांमध्ये आलेली जागरूकता सुनियोजित वसाहती निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. सुनियोजित वसाहती असतील तरच शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होईल.

औद्योगिक एन-ए, व्यावसायिक एन-ए, रहिवासी एन-ए आणि शैक्षणिक एन-ए, अशा चार एन-ए परवानग्या सध्या दिल्या जात आहेत. औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता जिल्ह्यातील सर्व एन-एच्या परवानग्या सहसंचालक कार्यालयातून दिल्या जात आहेत. शासनाने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेत बदल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुनियोजित वसाहती निर्माण होत आहेत.

सरकारने एमएलआर कोडमध्ये खूप बदल केले आहेत. त्यामुळे एन-एची प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील त्यामध्ये खूप बदल करून सुविधा दिल्या आहेत. एएमआरडीए, शेंद्रा परिसरातील विकास प्रादेशिक आराखड्यामुळे सध्या सुरळीत होत आहे. औद्योगिक विकासाला चालन मिळते आहे. पूर्वी ग्रीन झोनमध्ये रहिवासी परवानगी मिळत नव्हती. पंतप्रधान आवास योजना, मनपा हद्दीपासून २ कि.मी., नगरपालिका हद्दीपासून १ कि.मी. हद्दीत शासनाने परवानगी देऊ केली आहे. लो इन्कम किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक एफएसआयमध्ये घरकुलांसाठी परवानगीचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिडकोतून झालर क्षेत्रासाठी टेंटेटिव्ह एन-एची परवानगी मिळते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली जात आहे.

जिथे शहरी भाग असेल तेथे पूर्ण नियोजन झाले असेल आणि कुणाची त्या निवासी भागात शेती असेल, तर तेथे स्वतंत्र एन-एची गरज नाही. त्यासाठी तलाठी किंवा तहसीलदार हे अकृषक मूल्यांकन करून परवानगी सध्या दिली जात आहे. उद्योगासाठी एखाद्याला जागा वापरायची असेल, तर त्यासाठी जिल्हाधिकारी थेट एन-ए देऊ शकतात. ग्रीन झोनसाठी एन-ए मिळत नाही. शासनाने सर्व काही सुटसुटीत आणि नियमानुकूल केल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात अधिकृत सुनियोजित वसाहतींचे प्रमाण वाढेल आणि ते सर्वांच्याच हिताचे असेल.