शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

सुनियोजित वसाहतींशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:04 IST

एस.एस. खरवडकर सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद ‘महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता ...

एस.एस. खरवडकर

सहायक संचालक, नगररचना, औरंगाबाद

‘महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता जिल्ह्यातील सर्व एन-ए च्या परवानग्या सहसंचालक कार्यालयातून दिल्या जात आहेत.’

दोन दशकांपूर्वी नगररचना विभागाकडे खूप गांभीर्याने पाहिले जात नसे; परंतु अधिकृत मालमत्तांचे फायदे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या वसाहतींमुळे मिळणाऱ्या सुविधांबाबत नागरिकांमध्ये आलेली जागरूकता सुनियोजित वसाहती निर्माण करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत आहे. सुनियोजित वसाहती असतील तरच शहराचा आणि जिल्ह्याचा विकास होईल.

औद्योगिक एन-ए, व्यावसायिक एन-ए, रहिवासी एन-ए आणि शैक्षणिक एन-ए, अशा चार एन-ए परवानग्या सध्या दिल्या जात आहेत. औरंगाबाद महानगर विकास प्राधिकरण (एएमआरडीए) मधील ३१३ गावे आणि महापालिका हद्दीतील ११५ वॉर्ड वगळता जिल्ह्यातील सर्व एन-एच्या परवानग्या सहसंचालक कार्यालयातून दिल्या जात आहेत. शासनाने अनेक परिवर्तनकारी निर्णय घेत बदल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सुनियोजित वसाहती निर्माण होत आहेत.

सरकारने एमएलआर कोडमध्ये खूप बदल केले आहेत. त्यामुळे एन-एची प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीदेखील त्यामध्ये खूप बदल करून सुविधा दिल्या आहेत. एएमआरडीए, शेंद्रा परिसरातील विकास प्रादेशिक आराखड्यामुळे सध्या सुरळीत होत आहे. औद्योगिक विकासाला चालन मिळते आहे. पूर्वी ग्रीन झोनमध्ये रहिवासी परवानगी मिळत नव्हती. पंतप्रधान आवास योजना, मनपा हद्दीपासून २ कि.मी., नगरपालिका हद्दीपासून १ कि.मी. हद्दीत शासनाने परवानगी देऊ केली आहे. लो इन्कम किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी एक एफएसआयमध्ये घरकुलांसाठी परवानगीचा निर्णय शासनाने घेतला आहे. सिडकोतून झालर क्षेत्रासाठी टेंटेटिव्ह एन-एची परवानगी मिळते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली जात आहे.

जिथे शहरी भाग असेल तेथे पूर्ण नियोजन झाले असेल आणि कुणाची त्या निवासी भागात शेती असेल, तर तेथे स्वतंत्र एन-एची गरज नाही. त्यासाठी तलाठी किंवा तहसीलदार हे अकृषक मूल्यांकन करून परवानगी सध्या दिली जात आहे. उद्योगासाठी एखाद्याला जागा वापरायची असेल, तर त्यासाठी जिल्हाधिकारी थेट एन-ए देऊ शकतात. ग्रीन झोनसाठी एन-ए मिळत नाही. शासनाने सर्व काही सुटसुटीत आणि नियमानुकूल केल्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात अधिकृत सुनियोजित वसाहतींचे प्रमाण वाढेल आणि ते सर्वांच्याच हिताचे असेल.