शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

शहर विकासाला हवे अर्थक्रांतीचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:33 IST

नवनिर्वाचित महापौरांनी येणा-या अडीच वर्षांमध्ये पन्नासपेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. खरोखरच शहर ‘स्मार्ट’बनवायचे असेल, तर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी काही कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचा कारभार मागील काही महिन्यांपासून निव्वळ जीएसटी अनुदानावर सुरू आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना आदी उत्पन्नाच्या आर्थिक स्रोताचा मनपाने अक्षरश: गळा घोटला आहे. तिजोरीत पैसेच नसतील, तर शहराचा विकास करणार कसा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नवनिर्वाचित महापौरांनी येणा-या अडीच वर्षांमध्ये पन्नासपेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. खरोखरच शहर ‘स्मार्ट’बनवायचे असेल, तर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी काही कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. आजपर्यंत प्रशासन आणि पदाधिका-यांनी ‘जुमलों की बारिश’अनेकदा केली आहे. यापुढे औरंगाबादकरांना फक्त कृती हवी आहे.महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ५५० कोटी रुपये येतात. त्यातील २२५ कोटी रुपये निव्वळ पगारावर खर्च होतात. पाणीपुरवठा, कचरा उचलणे, विजेचे बिल या अत्यावश्यक खर्चावर सुमारे १०० कोटी रुपये खर्च होतात. मागील काही वर्षांमध्ये बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, पथदिवे, डागडुजी, प्राणिसंग्रहालय, वाहनांचा खर्च, विविध कल्याणकारी योजना राबविणे आदी कामांवर किमान ३० कोटी रुपये खर्च होतात. शहरातील १५ लाख नागरिकांसाठी विकासकामे करण्यासाठी ७० ते ८० कोटी रुपयेच शिल्लक राहतात. दरवर्षी महापालिका अर्थसंकल्प तयार करते. हा अर्थसंकल्प कोटींची उड्डाणे घेणारा असतो. वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प कधीच तयार करण्यात आला नाही. यंदाही १२०० कोटींचा अर्थसंकल्प तयार करून ठेवला आहे. वर्षअखेरीस तिजोरीत ५५० कोटींपेक्षा अधिक रक्कम येणार नाही, हे माहीत असतानाही विकास कामांचा निव्वळ रतीब लावून ठेवला आहे. अर्थसंकल्पात काम समाविष्ट केलेले आहे, एवढे कारण समोर करून सध्या नगरसेवक विविध विकास कामांचे मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून घेण्यात मग्न आहेत. ई-टेंडरला विकास काम लावल्यानंतर एकही कंत्राटदार काम घेण्यास तयार नाही. कारण केलेल्या कामाचे वर्षानुवर्षे पैसे न मिळण्याची पद्धत रुढ झाली आहे. आमच्या वॉर्डातील विकासकामे घ्या, अशी विनंती कंत्राटदाराकडे करताना नगरसेवक दिसून येतात. ही केविलवाणी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचारच कोणी करीत नाही. अनेक नगरसेवक नातेवाईकांच्या, कार्यकर्त्यांच्या नावावर कामे करतात. आर्थिक शिस्त बिघडलेली असल्याने त्यांचेही कंबरडे मोडले आहे.