शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहर विकासाला हवे अर्थक्रांतीचे चाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:33 IST

नवनिर्वाचित महापौरांनी येणा-या अडीच वर्षांमध्ये पन्नासपेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. खरोखरच शहर ‘स्मार्ट’बनवायचे असेल, तर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी काही कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेचा कारभार मागील काही महिन्यांपासून निव्वळ जीएसटी अनुदानावर सुरू आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी, नगररचना आदी उत्पन्नाच्या आर्थिक स्रोताचा मनपाने अक्षरश: गळा घोटला आहे. तिजोरीत पैसेच नसतील, तर शहराचा विकास करणार कसा हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नवनिर्वाचित महापौरांनी येणा-या अडीच वर्षांमध्ये पन्नासपेक्षा अधिक लहान-मोठे प्रकल्प राबविण्याचा मानस व्यक्त केला आहे. खरोखरच शहर ‘स्मार्ट’बनवायचे असेल, तर महापालिकेला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे लागेल. त्यासाठी काही कठोर आणि कटू निर्णय घ्यावे लागतील. आजपर्यंत प्रशासन आणि पदाधिका-यांनी ‘जुमलों की बारिश’अनेकदा केली आहे. यापुढे औरंगाबादकरांना फक्त कृती हवी आहे.महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी ५५० कोटी रुपये येतात. त्यातील २२५ कोटी रुपये निव्वळ पगारावर खर्च होतात. पाणीपुरवठा, कचरा उचलणे, विजेचे बिल या अत्यावश्यक खर्चावर सुमारे १०० कोटी रुपये खर्च होतात. मागील काही वर्षांमध्ये बँकांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते, पथदिवे, डागडुजी, प्राणिसंग्रहालय, वाहनांचा खर्च, विविध कल्याणकारी योजना राबविणे आदी कामांवर किमान ३० कोटी रुपये खर्च होतात. शहरातील १५ लाख नागरिकांसाठी विकासकामे करण्यासाठी ७० ते ८० कोटी रुपयेच शिल्लक राहतात. दरवर्षी महापालिका अर्थसंकल्प तयार करते. हा अर्थसंकल्प कोटींची उड्डाणे घेणारा असतो. वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प कधीच तयार करण्यात आला नाही. यंदाही १२०० कोटींचा अर्थसंकल्प तयार करून ठेवला आहे. वर्षअखेरीस तिजोरीत ५५० कोटींपेक्षा अधिक रक्कम येणार नाही, हे माहीत असतानाही विकास कामांचा निव्वळ रतीब लावून ठेवला आहे. अर्थसंकल्पात काम समाविष्ट केलेले आहे, एवढे कारण समोर करून सध्या नगरसेवक विविध विकास कामांचे मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रक तयार करून घेण्यात मग्न आहेत. ई-टेंडरला विकास काम लावल्यानंतर एकही कंत्राटदार काम घेण्यास तयार नाही. कारण केलेल्या कामाचे वर्षानुवर्षे पैसे न मिळण्याची पद्धत रुढ झाली आहे. आमच्या वॉर्डातील विकासकामे घ्या, अशी विनंती कंत्राटदाराकडे करताना नगरसेवक दिसून येतात. ही केविलवाणी परिस्थिती का निर्माण झाली याचा विचारच कोणी करीत नाही. अनेक नगरसेवक नातेवाईकांच्या, कार्यकर्त्यांच्या नावावर कामे करतात. आर्थिक शिस्त बिघडलेली असल्याने त्यांचेही कंबरडे मोडले आहे.