शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

देवणी गोवंशाला मिळाले ‘गोकूळ’

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

व्ही़ ए सक़ुलकर्णी , उदगीर दिल्लीपर्यंत धडक मारुन देशभर नाव मिळविलेल्या देवणी गोवंशाला राजाश्रय मिळू शकला नाही़ त्यामुळे ही जात नामशेष राहते की काय, अशी शंका निर्माण होत

व्ही़ ए सक़ुलकर्णी , उदगीरदिल्लीपर्यंत धडक मारुन देशभर नाव मिळविलेल्या देवणी गोवंशाला राजाश्रय मिळू शकला नाही़ त्यामुळे ही जात नामशेष राहते की काय, अशी शंका निर्माण होत असताना आता केंद्र सरकारनेच १५० कोटी रुपयांची तरतूद असलेल्या राष्ट्रीय गोकूळ योजनेत देवणी गोवंशाचा समावेश केल्याने पशुपालकांत उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे़केंद्र शासनाने नव्याने सुरु केलेल्या राष्ट्रीय गोकूळ योजनेत देशभरातील ६ प्रजातींचा समावेश करण्यात आला आहे़ त्यामध्ये देवणी गोवंशाचाही समावेश झाला आहे़ या प्रजातींच्या संगोपन व संवर्धनासाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे़ त्याअंतर्गत देवणी गोवंशासाठी १५० कोटींची तरतूद झाली आहे़देवणी या पशु प्रजातीचे मूळ उगमस्थान देवणी, उदगीर, जळकोटच्या भागात असल्याने त्याच्या संगोपन, संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची मागणी पशुपालकांची होती़ देवणी गोवंशासाठी तत्कालीन पशुसंवर्धन उपसंचालक डॉ़मुन्शी अब्दुल रहेमान यांनी मोठे प्रयत्न केले होते़ त्यांच्याच प्रयत्नातून देवणी गोवंश दिल्लीपर्यंत पोहोचले़ मात्र राजाश्रय मिळत नसल्याने ही प्रजात नामशेष राहण्याची भिती तयार झाली़ परंतु, आता मोठी तरतूद झाल्याने उदगीरच्या पशुविद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात दर्जेदार देवणी प्रक्षेत्राची उभारणी केली जाणार आहे़ यातून उत्कृष्ट देवणी जातीच्या गोवंश निर्मितीला प्रोत्साहित केले जाईल़ शिवाय, गोपालक संघ स्थापन करण्यासोबतच देवणी जातीच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटनांना कामधेनू पशुपैदास संघटना असे नाव दिले जाणार आहे़ प्रशिक्षणासाठी शासकीय यंत्रणेचा उपयोग करुन घेतला जाणार आहे़ याच यंत्रणेकडून पशुंच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मोफत उपचार केले जाणार आहेत़ गेली कित्येक वर्षे या गोवंशाच्या संवर्धनासाठी धडपडत असलेल्या पशुपालकांना या योजनेमुळे चांगलाच आधार मिळणार आहे़ देवणी गोवंशाचा गोकुळमध्ये समावेश झाल्याने या भागातील पशूपालकांना मोठा लाभ होणार आहे़ त्यामुळे पशूपालनाची संख्याही वाढण्याची अपेक्षा आहे़राष्ट्रीय गोकूळ योजनेद्वारे देवणी गोवंशाच्या केवळ संवर्धनालाच चालना मिळणार असे नाही तर इतरही महत्वाकांक्षी उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत़ या प्रजातींपासून मिळणारे दूध, दुग्धजन्य पदार्थ, गोमूत्र, गांडूळ खत अशा पदार्थांचा ब्रँडही विकसीत करण्यात येणार आहे़ या पदार्थांच्या विक्रीसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्मिली जाणार आहे़ त्यामुळे देवणी गोवंशाचे नाव पुन्हा देशभर जाण्याचा विश्वास वाढला आहे़ त्यामुळे पशूपालकांना चांगला लाभ होणार आहे़