शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जीवन गुणवत्तेत शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 13:54 IST

शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ) मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले अस्तिककुमार पाण्डेय यांच्या कामाचे कौतुककेंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणार

औरंगाबाद : जीवन गुणवत्तेत औरंगाबाद शहर देशात १३व्या स्थानी आले आहे. पुढच्या वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या परिश्रमामुळे हे साध्य झाले. शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिक आनंदी कसे बनेल, यादृष्टीने भविष्यात काम करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दिले.

शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ) मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे. या चांगल्या कामगिरीबद्दलची माहिती देण्यासाठी देसाई यांनी पाण्डेय यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. शहराने ६३व्या स्थानावरून झेप घेत ३४वे स्थान पटकावले आहे. शहराची ही चांगली प्रगती आहे. शिक्षण, आरोग्य आणि विकासकामामध्ये नजरेत भरणारी ही प्रगती ठरली आहे, असे देसाई म्हणाले. या शहराबद्दल मुख्यमंत्र्यांचा ममत्व भाव, आपुलकीची भावना यामुळेच शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. पाणी, कचरा, रस्ते हे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटी घेत विकासाचा संवाद हा कार्यक्रम घेतला. आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सूचना विचारात घेऊन शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे काम हाती घेतले.

महापालिकेच्या मेहनतीचे फळअखिल भारतीय पातळीवर महापालिकेच्या सेवांचा विचार मानांकन देताना करण्यात आला. आरोग्य, शिक्षण व इतर सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले तसेच मनपा प्रशासनाने प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री देसाई यांनी मनपा प्रशासक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले.

केंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणारकेंद्र शासनाने औरंगाबाद शहराला दिलेल्या वेगवेगळ्या रँकिंगमध्ये कोणकोणते निकष तपासण्यात आले. याचा बारीक अभ्यास करून त्रुटी दूर करण्यात येतील. केंद्राच्या सर्वेक्षणात नागरिक हा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समाधानावर बरेच काही अवलंबून आहे. पुढील वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका