शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

जीवन गुणवत्तेत शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 13:54 IST

शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ) मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी केले अस्तिककुमार पाण्डेय यांच्या कामाचे कौतुककेंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणार

औरंगाबाद : जीवन गुणवत्तेत औरंगाबाद शहर देशात १३व्या स्थानी आले आहे. पुढच्या वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्याचा निर्धार पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केला. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या परिश्रमामुळे हे साध्य झाले. शहरातील नागरिकांचे जीवनमान अधिक आनंदी कसे बनेल, यादृष्टीने भविष्यात काम करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी शुक्रवारी दिले.

शहराने इज ऑफ लिव्हिंग (ईएलओ) मध्ये ३४वा क्रमांक पटकावला असून, जीवन गुणवत्ता सुधारणेत १३वे स्थान मिळवले आहे. या चांगल्या कामगिरीबद्दलची माहिती देण्यासाठी देसाई यांनी पाण्डेय यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. शहराने ६३व्या स्थानावरून झेप घेत ३४वे स्थान पटकावले आहे. शहराची ही चांगली प्रगती आहे. शिक्षण, आरोग्य आणि विकासकामामध्ये नजरेत भरणारी ही प्रगती ठरली आहे, असे देसाई म्हणाले. या शहराबद्दल मुख्यमंत्र्यांचा ममत्व भाव, आपुलकीची भावना यामुळेच शहराच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. पाणी, कचरा, रस्ते हे मूलभूत प्रश्न मार्गी लागले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शहरातील मान्यवरांच्या भेटी घेत विकासाचा संवाद हा कार्यक्रम घेतला. आरोग्य, शिक्षण, उद्योग, व्यापारी यांच्याशी संवाद साधत त्यांच्या सूचना विचारात घेऊन शहराच्या विकासाचा रोडमॅप तयार करण्याचे काम हाती घेतले.

महापालिकेच्या मेहनतीचे फळअखिल भारतीय पातळीवर महापालिकेच्या सेवांचा विचार मानांकन देताना करण्यात आला. आरोग्य, शिक्षण व इतर सेवा नागरिकांना पुरविण्यासाठी राज्य सरकारचे सहकार्य मिळाले तसेच मनपा प्रशासनाने प्रयत्न केल्याबद्दल पालकमंत्री देसाई यांनी मनपा प्रशासक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले.

केंद्राच्या निकषांचा अभ्यास करून त्रुटी दूर करणारकेंद्र शासनाने औरंगाबाद शहराला दिलेल्या वेगवेगळ्या रँकिंगमध्ये कोणकोणते निकष तपासण्यात आले. याचा बारीक अभ्यास करून त्रुटी दूर करण्यात येतील. केंद्राच्या सर्वेक्षणात नागरिक हा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या समाधानावर बरेच काही अवलंबून आहे. पुढील वर्षी शहराला टॉप टेनमध्ये आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे पाण्डेय यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका