शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

मराठवाड्यातील जलसंधारणाच्या कामांचा एका पत्रामुळे खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी जारी केलेल्या पत्रामुळे मराठवाड्यासह राज्यातील कामांचा खोळंबा होण्याची ...

विकास राऊत

औरंगाबाद : जलसंधारण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार यांनी जारी केलेल्या पत्रामुळे मराठवाड्यासह राज्यातील कामांचा खोळंबा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जलसंधारण महामंडळाला अर्थसंकल्पित निधी उपलब्ध होईपर्यंत कोणत्याही नवीन कामास प्रशासकीय मंजुरी देऊ नये तसेच याआधी प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात येऊ नयेत, असे आदेश जारी करणारे हे पत्र आहे.

अर्धी कामे होत आल्यानंतर आणि पावसाळच्या तोंडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी उपलब्ध होण्याची साशंकता असल्यामुळे सचिवांनी ऐनवेळी असे पत्र काढले आहे.

ज्या कामांच्या निविदाप्रक्रिया राबविण्यात आल्या असतील, ज्या कामांच्या वर्कऑर्डर दिलेल्या नसतील अशा कामांना वर्कऑर्डर देण्यात येऊ नयेत, वित्त विभागाला निधी मागणीचा प्रस्ताव पाठविताना २१ मेपर्यंतची बँक गॅरंटी आणि अनामत रक्कम जमा करून दिलेल्या वर्कऑर्डर ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे पत्रात म्हटल्यामुळे काम करणारी यंत्रणा हादरून गेली आहे. प्रशासकीय मान्यतेने जी कामे सुरू आहेत, ती कामे करणाऱ्यांचे तर आर्थिक कंबरडे मोडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर निविदा होऊन कामे सुरू झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक कामे सुरू केल्यानंतर आता अचानक सचिव पातळीवरून पत्र आल्यामुळे सगळ्या यंत्रणेची भंबेरी उडाली आहे.

२०२०-२१ या वित्तीय वर्षात महामंडळासाठी अर्थसंकल्पात १२७७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यातील ६३८ कोटींचा निधी वितरित झाला आहे. नंतर सुधारित अर्थसंकल्पात १२१३ कोटींची तरतूद करताना वितरित निधी वजा करून ५७५ कोटींची मागणी वित्त विभागाकडे करण्यात आली. मात्र कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे जुनी व नवीन तरतूद मिळून महामंडळासाठी १५६३ कोटींची तरतूद केली. यातील एक रुपयादेखील महामंडळाला मिळालेला नाही, असे सचिवांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, कामे तर सुरू आहेत. त्या कामांचे व पावसाळ्याच्या तोंडावर कराव्या लागणाऱ्या कामांचे काय करायचे? असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.

चौकट...

विभागासाठी तरतूद

विभागात पाझर तलावांची दुरुस्ती, नवीन पाझर तलाव बांधणे, सिमेंट बंधारे बांधणे, खोलीकरण करणे, लघुसिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी सुमारे ८०० कोटींचा निधी राज्याच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सुमारे १०० कोटींच्या आसपास कामे आहेत. महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी सांगितले की, विभागात अंदाजे ८०० कोटींची कामे असतील. सचिवांनी दिलेल्या पत्रानुसार वित्त विभागाच्या तरतुदी आनुषंगाने माहिती मागविली आहे. अनुदान मिळताच कामांचा मार्ग मोकळा होणार आहे. काही कामांच्या वर्कऑर्डर दिल्या आहेत. काही कामे निविदांपर्यंत आलेली आहेत. त्यामुळे ८०० कोटी एकदाच लागणार नाहीत. कोरोनामुळे वित्त विभागाकडून किती निधी मिळतो, त्यावर सगळे काही अवलंबून आहे.