शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

अखेर नियतीने साधला डाव; एका हॉस्पिटलने नाकारले; दुसरीकडे उपचार करताना प्रयत्नांची पराकाष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 13:08 IST

. नेमके काय झाले, याची विचारणा ‘लोकमत’ प्रतिनिधीने तणावात असलेल्या नातेवाईकांकडे केली, तेव्हा व्हेंटिलेटर नसल्याने याठिकाणी दाखल केले जात नाही, आम्ही दुसऱ्या रुग्णालयात जात असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देगंभीर अवस्थेतील रुग्णाची रिक्षातून धावपळ दुसरे रुग्णालय गाठण्याची नामुष्कीरुग्णाची प्राणज्योत मालवली

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : वेळ सोमवारी दुपारी १२ वाजेची. स्थळ एमजीएम रुग्णालय. एक रिक्षा इमर्जन्सी विभागासमोर येऊन थांबते. रिक्षात आॅक्सिजन सिलिंडरसह एक वृद्ध अत्यवस्थ अवस्थेत. तरीही रिक्षातच तपासणी केल्यानंतर व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे कारण सांगून सरळ माघारी पाठवले जाते. नातेवाईक कसेबसे दुसरे रुग्णालय गाठतात. याठिकाणीही अडचण होती. ‘लोकमत’ने मदतीचा हात दिला आणि रुग्ण दाखल झाला. उपचार सुरु झाले. रुग्णाला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. मात्र,  रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती रात्री रुग्णालयाकडून देण्यात आली.  

शाहगंज येथील ६८ वर्षीय वृद्धाला श्वास घेण्यास त्रास होत होता. या रुग्णाला एमजीएम रुग्णालयाने उपचारासाठी नकार दिल्यानंतर त्याला मुकुंदवाडीतील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अस्थमा असलेल्या या रुग्णाला गेल्या तीन-चार दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबियांनी खाजगी डॉक्टरांच्या मदतीने त्याला घरीच आॅक्सिजन लावला होता. अनेक वेळा घरी असे आॅक्सिजन लावल्यानंतर प्रकृती सुधारत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

सोमवारी त्रास अधिक वाढल्याने कुटुंबियांनी सिलिंडरसह त्यांना घेऊन दुपारी १२ वाजता एमजीएम रुग्णालयात गाठले. रिक्षा एमजीएम रुग्णालयाच्या इमर्जन्सी विभागासमोर येऊन थांबते. याठिकाणी पीपीई कीट घातलेले डॉक्टर रिक्षातच रुग्णाच्या शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण पाहतात. जवळपास ५ मिनिटांनंतर त्यांना  इमर्जन्सी विभागापासून काही अंतरावर असलेल्या कोविड-१९ ओपीडीकडे जाण्यास सांगितले जाते. त्यासाठी एक कर्मचारी रस्ताही दाखवितो. कोविड-१९ ओपीडीसमोर रिक्षा थांबवली जाते. याठिकाणीही रुग्णाला रिक्षातच ठेवले जाते. ढगाळ वातावरणामुळे चांगलाच उकाडा जाणवत होता. त्याचा रुग्णालाही प्रचंड त्रास होत होता. रुग्णाची अवस्था नातेवाईकांना पाहवत नव्हती. नातेवाईक पेपरच्या मदतीने रुग्णाला हवा घालत होते. याठिकाणी तपासणी केल्यानंतर १५ मिनिटांनंतर रुग्णाला घेऊन नातेवाईक  रुग्णालयातून बाहेर पडण्यासाठी  निघतात. हा सगळा प्रकार ‘लोकमत’चे प्रतिनिधी कॅमेऱ्यात टिपत होते. नेमके काय झाले, याची विचारणा ‘लोकमत’ प्रतिनिधीने तणावात असलेल्या नातेवाईकांकडे केली, तेव्हा व्हेंटिलेटर नसल्याने याठिकाणी दाखल केले जात नाही, आम्ही दुसऱ्या रुग्णालयात जात असल्याचे त्यांनी सांगितले.

रिक्षा एमजीएम रुग्णालयातून बाहेर पडली, तसे ‘लोकमत’चे प्रतिनिधी आणि छायाचित्रकारही त्यांच्या मागे धावले.  साधारण दुपारी १२.४० वाजता रिक्षा सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये पोहोचली. याठिकाणी रुग्णाला डॉक्टरांनी तपासले. आयसीयू बेड शिल्लक नसल्याचे येथील डॉक्टरांकडूनही सांगण्यात येते. त्यामुळे नातेवाईक येथूनही बाहेर पडण्याच्या मार्गावर होते; परंतु ‘लोकमत’ प्रतिनिधीने हा प्रकार धूत हॉस्पिटलचे प्रशासक डॉ. हिमांशू गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा नातेवाईकांनी संमतीपत्र भरून दिले  तर जनरल वॉर्डात रुग्णावर उपचार करण्याची तयारी त्यांनी दाखवली. याविषयी कल्पना देताच नातेवाईकांनी संमतीपत्र भरून देण्यास होकार दिला आणि अखेर रुग्ण रुग्णालयात दाखल झाला. दुपारपासून वृद्धावर उपचार सुरू करण्यात आले.  सायंकाळी रुग्णाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईक आणि रुग्णालयातर्फे कळविण्यात आले. 

रुग्णांना नाकारणाऱ्या रुग्णालयांना ‘आयएमए’ देणार नोटीसजागा असूनही रुग्णांना नकार देणाऱ्या रुग्णालयांना नोटीस दिली जाईल, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांचे दरवाजे गंभीर रुग्णांसाठी बंदच आहेत. गंभीर रुग्ण येताच त्यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. यातून रुग्णांचा जीवही धोक्यात येत आहे. तरीही रुग्णांना नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याविषयी ‘आयएमए’ची भूमिका जाणून घेण्यात आली. याविषयी डॉ. रंजलकर म्हणाले, कोरोनाचे उपचार काही मोजक्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना रेफर केले जाते. जागा उपलब्ध असूनही रुग्णास नकार दिला जात असेल, तर रुग्णालयास नोटीस दिली जाईल. रुग्णांना नाकारण्यात येऊ नये, अशी सूचना रुग्णालयांना केली जाईल, असे ते म्हणाले.

१५ टक्के डॉक्टर हे ५५ वर्षांवरीलशहरात १५ टक्के डॉक्टर हे ५५ वर्षांवरील आहेत, तर २० टक्के रुग्णालयांमध्ये एका डॉक्टरद्वारे सेवा दिली जाते. यात काही ठिकाणी रुग्णसेवा देण्यास अनेक कारणांमुळे अडचणी येत असल्याचेही डॉ. संतोष रंजलकर यांनी सांगितले. च्शहरात एका डॉक्टरद्वारे रुग्णसेवा दिल्या जाणाऱ्या रुग्णालयांना कर्मचाऱ्यांच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर वसाहतीतून ये-जा करता येत नाही. त्यामुळे कर्मचारी रुग्णालयात येऊ शकत नाहीत. त्याचाही रुग्णसेवेवर परिणाम होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सेंट्रल रेफरल सिस्टीमची गरजआयसीयू बेड खाली नसताना रुग्णाला दाखल करून घेतले.आयसीयू बेड रिक्त नसेल तर इतर ठिकाणी जावे लागेल याची नातेवाईकांना कल्पना दिली होती. त्यामुळे ते परत जात होते; परंतु नंतर त्यांनी होकार दिला. सुरुवातीला जनरल वॉर्डात आवश्यक ती सुविधा दिली आणि नंतर आयसीयू बेड रिक्त झाल्यानंतर त्याला तिथे भरती केले. मनपाने सेंट्रल रेफरल सिस्टीम केली पाहिजे.   - डॉ. हिमांशू गुप्ता, प्रशासक,  धूत हॉस्पिटल

व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगितले असेलव्हेंटिलेटर नसल्याचे सांगितले असेल; परंतु उपचार नाकारले जात नाहीत. दाखल करून घेतले जाईल; पण व्हेंटिलेटरची गरज लागली तर उपलब्ध नाही, हे सांगितले जाते. नातेवाईकांना रुग्णास अन्य कुठे घेऊन जायचे असेल तर आम्ही थांबवू शकत नाही. रुग्णाच्या तपासणीविषयी माहिती घेतली जाईल. - डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपअधिष्ठाता, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद