शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-शिंदेसेनेच्या बैठकीत 'ठिणगी'? १५ मिनिटांत वातावरण तापले अन् मंत्री ताडकन् बाहेर पडले
2
Gold Silver Price Today: चांदी एका झटक्यात ₹१५,३७९ नं महागली, सोनंही नव्या उच्चांकी स्तरावर; पटापट चेक करा १८, २२ आणि २४ कॅरेटचा भाव
3
कुलदीप सेंगरचा जामीन स्थगित; उन्नाव बलात्कार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
4
अहिल्यानगरमध्ये उद्धवसेनेला हादरा, पक्षात अंतर्गत मतभेद; तेजस्विनी राठोडांनी भरला अपक्ष अर्ज
5
स्मार्टफोन बाजारात मोठा उलटफेर.! भारतीयांनी २०२५ मध्ये या मॉडेलचे ५६ लाख स्मार्टफोन खरेदी केले; ठरला भारताचा नंबर १ 
6
Travel : स्वप्नातलं शहर की वास्तवातली जादू? पाण्यावर तरंगणाऱ्या वेनिस शहरात 'असा' करा स्वस्तात प्रवास!
7
Thane Politics: शिंदे-चव्हाण स्वतःचे बालेकिल्ले राखण्यासाठी 'ठाणे, कडोंम'मध्ये एकत्र; मीरा-भाईंदर, नवी मुंबईचं काय?
8
जागावाटपाचे घोडे अडलेलेच! काँग्रेस-राष्ट्रवादी (शरद पवार) आघाडीचा दावा, जागा गुलदस्त्यात
9
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
10
आता १२५ दिवस रोजगाराची गॅरेंटी! पाहा G RAM G विधेयकामुळे ग्रामीण भागात कसा होणार फायदा?
11
मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाने पलटवार! ठाकरे बंधूंच्या रणनीतीला शह देणार, भाजपानं आखला प्लॅन
12
“मुंबईसाठी अदानी अन् आमची नैतिक लढाई सुरूच राहणार, ती थांबवणार नाही”: संजय राऊत
13
Nagpur Municipal Election: महाविकास आघाडीचं अखेर ठरलं! काँग्रेस १२९, राष्ट्रवादी १२ जागा; उद्धवसेनेला किती जागा?
14
टीम इंडियाविरुद्ध चुलत भाऊ कॅप्टन झाला; दुसरीकडे संधी मिळेना म्हणून स्टार ऑलराउंडरनं क्रिकेट सोडलं
15
Health Tips: गुडघेदुखीने त्रस्त आहात? मग 'रिव्हर्स वॉकिंग' करून पहा; २ मिनिटांत मिळेल आराम!
16
भाजपविरोधात शिंदेसेना-अजित पवार गटाची युती, महापालिकेसाठी तिरंगी लढत होण्याची शक्यता
17
FD-RD काहीच नाही! एलआयसीच्या 'या' योजनेत २४३ रुपयांची गुंतवणूक करा, मिळेल ५४ लाखांचा फंड
18
आता PF च्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज नाही; 'पासपोर्ट केंद्रां'प्रमाणे मिळणार सेवा
19
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
20
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
Daily Top 2Weekly Top 5

उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:58 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.शासनाच्या भांडार तपासणी पथकाने समोर आणलेल्या माहिती आधारे लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी याप्रकरणी औषधी खरेदीच्या नोंदी मागविल्या असून, वेळप्रसंगी याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ती औषधी कुठेही खरेदी होवो, कालबाह्य औषधीमुळे नुकसान तर होणारच आहे, कंपनी बदलून देणार असेल तर ठीक आहे. अन्यथा याप्रकरणात चौकशी केली जाईल, असे कदम यांनी नमूद केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड म्हणाले, त्या खरेदीचा आणि मिनी घाटीचा काहीही संंबंध नाही. त्यावर पालकमंत्री संतापून म्हणाले, संबंध असो किंवा नसो खरेदीच्या नोंदी पाहाव्या लागतील.चिकलठाणा परिसरात नव्याने उभारलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला आवश्यक असणाºया साहित्य सामग्रीसाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा, सीसीटीव्ही कॅमेºयासाठी २२ लाखांचा, तसेच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणि जिल्हा स्त्री आणि बालरुग्णालयाच्या आवश्यक जागेसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांना दिल्या. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भटकर, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड आदींची उपस्थिती होती.पथकाकडून औषधींची तपासणीआरोग्य विभागातर्फे कालबाह्य औषधी प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी साठ्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत भांडार विभागाची चौकशी केली असता औषधी साठ्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आणखी ९० लाखांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले. शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनामा केला आहे. ही योग्यरीत्या झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात औषधी साठ्याची कल्पना असूनही त्याकडे अधिकारी-कर्मचाºयांनी कानाडोळा केल्याचे दिसते.राज्यस्तरावरून औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये आवश्यकता नसलेली तर काही गरजेपेक्षा जास्त औषधांचा पुरवठा झाल्याचे समजते. त्यामुळे ही औषधी वापराविना पडून राहिली. ही वेळीच संबंधित पुरवठादारास परत करून आवश्यक असलेली औषधी मागविता आली असती; परंतु अधिकाºयांनी त्याकडे लक्ष दिले नाही. याबरोबर औषधांचा साठाही योग्यरीत्या केला जात नसल्याचे दिसते. त्यातून कोणती औषधी आहेत, उपलब्ध नाही, याची माहिती घेण्यात कुचराई होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.काही औषधीच कालबाह्य झाली असल्याची कबुली स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. त्यामुळे औषधी साठ्याच्या बाबतीत हलगर्जीपणा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.‘लोकमत’ने प्रकरण समोर आणल्यानंतर आता आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली असून, औषधांची तपासणी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. या पथकातील सदस्यांकडून औषधी साठ्याची तपासणी केली जात आहे. पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील साठ्याची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन वर्षे दुर्लक्षलाखो रुपयांची औषधी वापराविना पडून आहे, याची कल्पना असूनही आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाºयांनी कानाडोळा केला. औषधी साठ्याकडे दोन वर्षे दुर्लक्ष केल्याने तब्बल लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाली. याचा फटका कुठेतरी सर्वसामान्यांनाच बसणार आहे. आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने ही वेळ आल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.