शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:58 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.शासनाच्या भांडार तपासणी पथकाने समोर आणलेल्या माहिती आधारे लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी याप्रकरणी औषधी खरेदीच्या नोंदी मागविल्या असून, वेळप्रसंगी याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ती औषधी कुठेही खरेदी होवो, कालबाह्य औषधीमुळे नुकसान तर होणारच आहे, कंपनी बदलून देणार असेल तर ठीक आहे. अन्यथा याप्रकरणात चौकशी केली जाईल, असे कदम यांनी नमूद केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड म्हणाले, त्या खरेदीचा आणि मिनी घाटीचा काहीही संंबंध नाही. त्यावर पालकमंत्री संतापून म्हणाले, संबंध असो किंवा नसो खरेदीच्या नोंदी पाहाव्या लागतील.चिकलठाणा परिसरात नव्याने उभारलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला आवश्यक असणाºया साहित्य सामग्रीसाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा, सीसीटीव्ही कॅमेºयासाठी २२ लाखांचा, तसेच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणि जिल्हा स्त्री आणि बालरुग्णालयाच्या आवश्यक जागेसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांना दिल्या. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भटकर, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड आदींची उपस्थिती होती.पथकाकडून औषधींची तपासणीआरोग्य विभागातर्फे कालबाह्य औषधी प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी साठ्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत भांडार विभागाची चौकशी केली असता औषधी साठ्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आणखी ९० लाखांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले. शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनामा केला आहे. ही योग्यरीत्या झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात औषधी साठ्याची कल्पना असूनही त्याकडे अधिकारी-कर्मचाºयांनी कानाडोळा केल्याचे दिसते.राज्यस्तरावरून औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये आवश्यकता नसलेली तर काही गरजेपेक्षा जास्त औषधांचा पुरवठा झाल्याचे समजते. त्यामुळे ही औषधी वापराविना पडून राहिली. ही वेळीच संबंधित पुरवठादारास परत करून आवश्यक असलेली औषधी मागविता आली असती; परंतु अधिकाºयांनी त्याकडे लक्ष दिले नाही. याबरोबर औषधांचा साठाही योग्यरीत्या केला जात नसल्याचे दिसते. त्यातून कोणती औषधी आहेत, उपलब्ध नाही, याची माहिती घेण्यात कुचराई होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.काही औषधीच कालबाह्य झाली असल्याची कबुली स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. त्यामुळे औषधी साठ्याच्या बाबतीत हलगर्जीपणा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.‘लोकमत’ने प्रकरण समोर आणल्यानंतर आता आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली असून, औषधांची तपासणी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. या पथकातील सदस्यांकडून औषधी साठ्याची तपासणी केली जात आहे. पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील साठ्याची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन वर्षे दुर्लक्षलाखो रुपयांची औषधी वापराविना पडून आहे, याची कल्पना असूनही आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाºयांनी कानाडोळा केला. औषधी साठ्याकडे दोन वर्षे दुर्लक्ष केल्याने तब्बल लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाली. याचा फटका कुठेतरी सर्वसामान्यांनाच बसणार आहे. आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने ही वेळ आल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.