शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 23:58 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात ५८ लाख रुपयांची औषधी कालबाह्य झाल्यानंतर पुन्हा ९० लाख रुपयांच्या औषधी कालबाह्य झाल्याचे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आरोग्य उपसंचालक विभाग संशयाच्या भोव-यात सापडला आहे.शासनाच्या भांडार तपासणी पथकाने समोर आणलेल्या माहिती आधारे लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर गुरुवारी पालकमंत्री रामदास कदम यांनी याप्रकरणी औषधी खरेदीच्या नोंदी मागविल्या असून, वेळप्रसंगी याप्रकरणी चौकशी करण्यात येईल, असे लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ती औषधी कुठेही खरेदी होवो, कालबाह्य औषधीमुळे नुकसान तर होणारच आहे, कंपनी बदलून देणार असेल तर ठीक आहे. अन्यथा याप्रकरणात चौकशी केली जाईल, असे कदम यांनी नमूद केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गोवर्धन गायकवाड म्हणाले, त्या खरेदीचा आणि मिनी घाटीचा काहीही संंबंध नाही. त्यावर पालकमंत्री संतापून म्हणाले, संबंध असो किंवा नसो खरेदीच्या नोंदी पाहाव्या लागतील.चिकलठाणा परिसरात नव्याने उभारलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला आवश्यक असणाºया साहित्य सामग्रीसाठी १ कोटी ३० लाख रुपयांचा, सीसीटीव्ही कॅमेºयासाठी २२ लाखांचा, तसेच सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी आणि जिल्हा स्त्री आणि बालरुग्णालयाच्या आवश्यक जागेसाठी तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायकवाड यांना दिल्या. त्यांनी रुग्णालयाची पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, कृष्णा डोणगावकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. एस. भटकर, अप्पर तहसीलदार रमेश मुंडलोड आदींची उपस्थिती होती.पथकाकडून औषधींची तपासणीआरोग्य विभागातर्फे कालबाह्य औषधी प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या चौकशीसाठी एका विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधी साठ्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत भांडार विभागाची चौकशी केली असता औषधी साठ्यातील ५८ लाख ३८ हजार ६४७ रुपयांची औषधी कालबाह्य झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आणखी ९० लाखांची औषधी कालबाह्य झाल्याचे समोर आले. शासनाच्या भांडार पडताळणी अधिकाºयांच्या पथकाने केलेल्या चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. या पथकाने त्वरित संपूर्ण औषधीचा पंचनामा केला आहे. ही योग्यरीत्या झालेली नसल्याचा आरोप केला जात आहे; परंतु प्रत्यक्षात औषधी साठ्याची कल्पना असूनही त्याकडे अधिकारी-कर्मचाºयांनी कानाडोळा केल्याचे दिसते.राज्यस्तरावरून औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यामध्ये आवश्यकता नसलेली तर काही गरजेपेक्षा जास्त औषधांचा पुरवठा झाल्याचे समजते. त्यामुळे ही औषधी वापराविना पडून राहिली. ही वेळीच संबंधित पुरवठादारास परत करून आवश्यक असलेली औषधी मागविता आली असती; परंतु अधिकाºयांनी त्याकडे लक्ष दिले नाही. याबरोबर औषधांचा साठाही योग्यरीत्या केला जात नसल्याचे दिसते. त्यातून कोणती औषधी आहेत, उपलब्ध नाही, याची माहिती घेण्यात कुचराई होत असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.काही औषधीच कालबाह्य झाली असल्याची कबुली स्वत: जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे. त्यामुळे औषधी साठ्याच्या बाबतीत हलगर्जीपणा होत असल्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.‘लोकमत’ने प्रकरण समोर आणल्यानंतर आता आरोग्य विभागाने चौकशी सुरू केली असून, औषधांची तपासणी करण्यासाठी एक पथक तयार केले आहे. या पथकातील सदस्यांकडून औषधी साठ्याची तपासणी केली जात आहे. पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयातील साठ्याची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.दोन वर्षे दुर्लक्षलाखो रुपयांची औषधी वापराविना पडून आहे, याची कल्पना असूनही आरोग्य विभागातील जबाबदार अधिकाºयांनी कानाडोळा केला. औषधी साठ्याकडे दोन वर्षे दुर्लक्ष केल्याने तब्बल लाखो रुपयांची औषधी कालबाह्य झाली. याचा फटका कुठेतरी सर्वसामान्यांनाच बसणार आहे. आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने ही वेळ आल्याची ओरड सर्वसामान्यांतून होत आहे.