शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

पीक विम्याची रक्कम होणार कर्जखाती जमा !

By admin | Updated: March 31, 2017 00:07 IST

उस्मानाबाद : सलग चार वर्ष दुष्काळाचा सामना केल्यानंतर गतवर्षी मुबलक पाऊस झाला.

उस्मानाबाद : सलग चार वर्ष दुष्काळाचा सामना केल्यानंतर गतवर्षी मुबलक पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीसारख्या नगदी पिकांसोबतच पालेभाज्यांच्या लागवडीवर भर दिला. हा शेतीमाल बाजारपेठेत येताच दर कोसळले. त्यातच नोटाबंदीही करण्यात आली. परिणामी अनेक शेतकऱ्यांना टोमॉटो रस्त्यावर फेकून द्यावे लागले. मध्यंतरी शेतकऱ्यांना गारपीटीचा माराही सोसावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याकडे लागल्या होत्या. ही रक्कम मिळाल्यानंतर आर्थिक स्थिती सुधारण्यास थोडाबहुत हातभार लागेल असे वाटत असतानाच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबुत करण्याची भाषा करणारे भाजप-सेनेचे सरकार विम्याची पन्नास टक्के रक्कम कर्जखाती जमा करून घेण्यास जिल्हा बँकांना मुभा देवून मोकळे झाले. शासनाच्या या भूमिकेविरूद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. याचा फटका जिल्हाभरातील सुमारे १५ हजार शेतकऱ्यांना बसणार असून तब्बल २५ कोटी रूपये कर्जखाती जमा करून घेतले जाणार आहेत. म्ाागील चार वर्षाचा दुष्काळ, चारा टंचाई, पाणी टंचाई, डोक्यावरील वाढते कर्ज यामुळे चिंताग्रस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी थेट आत्महत्येचा पर्याय निवडला! वाढलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने बळीराजा चेतना अभियानासह इतर विविध योजना राबविण्यास सुरूवात केली़ शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे़ अशा परिस्थितीत मागील वर्षी पडलेल्या परतीच्या पावसामुळे रबी हंगामातून काहीतरी पदरी पडेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे़ सध्या शेतातील पिकांची रास सुरू आहे़ शासनाकडून २०१५ मधील रबी हंगामातील पीक नुकसानीपोटी १६० कोटी रूपये अनुदान मिळाले आहे़ याचा लाभ जिल्ह्यातील २ लाख ५६ हजार शेतकरी सभासदांना होणार आहे़ नुकसान भरपाईची रक्कम आली असली तरी बँकेकडून वाटप सुरू करण्यात आलेले नाही़ अनुदानाचे वाटप कधी सुरू होणार ? याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले 3आहे़ मात्र, अशातच सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांनी जिल्हा बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीकोनातून नुकसान भरपाई अनुदान रक्कमेतून ५० टक्के रक्कम पीककर्जात वसूल करण्याचे आदेश दिले आहेत़जिल्हा बँकेचे शेती कर्जाची ५८४ कोटी एकूण कर्ज असून, यातील ३४८ कोटी रूपये थकीत आहेत़ तर बिगर शेतीचे जवळपास २३० कोटी रूपये एकूण कर्ज आहे़ तर १९६ कोटी रूपये थकीत आहेत़ मार्च अखेरमुळे बँकेने कर्ज वसुली मोहीम हाती घेऊन शेतकऱ्यांसह बड्या थकबाकीदार संस्थांना नोटीसा बजावल्या आहेत़ मुदतीत कर्जाचा भरणा न केल्यास थकबाकीदारांच्या घरासमोरच गांधीगिरी पध्दतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ त्यातच बँकेला बँकींग परवाना वाचविण्यासाठी ९ टक्के सीआर, एआर असणे आवश्यक आहे़ त्यासाठीही बँकेने कर्ज वसुलीसाठी विविध उपाय शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे़ मात्र, आता सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांनीच चक्क नुकसान भरपाई अनुदान रक्कमेतून ५० टक्क रक्कम पीक कर्जात वसूल करण्याचे आदेश दिले आहेत़ या आदेशानुसार जिल्ह्यातील जवळपास १५ हजार सभासदांकडून २५ कोटी रूपये कर्जाची वसुली होण्याची अपेक्षा बँकेला आहे़ बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने सहकार विभाग विचार करीत असले तरी रबी हंगामातील उत्पन्नातून खर्चही निघेल की नाही ? मिळालेल्या रक्कमेतून कर्ज फेडायचे कसे ? कुटुंबासमोरील प्रश्न मार्गी लावायचे कसे ? अशा एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा असून, या निर्णयामुळे संताप व्यक्त होत आहे़शेतकऱ्यांनी सहकार्य करावेजिल्हा बँकेला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत़ सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार अनुदान रक्कमेतून जवळपास २५ कोटी रूपये पीक कर्जाची वसुली होण्याची अपेक्षा आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांनीही सहकारी संस्था सहाकर आयुक्त व निबंधकांच्या आदेशानुसार होणाऱ्या कार्यवाहीत सहकार्य करावे, असे आवाहन डीसीसीचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांनी केले आहे़(प्रतिनिधी)