शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

'भानुदास-एकनाथ' जयघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:40 IST

पायी वारी रद्द झाल्याने पालखी पुढील १८ दिवस श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात  मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.  

ठळक मुद्देआषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला 

पैठण : पंढरपूर येथील आषाढी सोहळयासाठी  गुरुवारी दुपारी नाथमहाराजांच्या पादुका असलेल्या पालखीचे मोजक्या मानकऱ्यासह गावातील नाथ मंदिरातून प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आषाढीवारीचा पायी सोहळा राज्य शासनाने रद्द केल्याने शासकीय निर्देशानुसार मोजक्या मानकऱ्यासह  टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले. 

पायी वारी रद्द झाल्याने पालखी पुढील १८ दिवस श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात  मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.  दरम्यान आज पालखी मार्गावर अंगणात उभे राहून नागरिकांनी दुरुनच पालखीचे दर्शन घेऊन पुष्पवृष्टी केली. सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा रद्द झाल्याने  सोहळ्यासोबत नियमित वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मात्र मोठी रूखरूख लागल्याचे दिसून आले.  वारकरी संप्रदायास भागवत रूपी खांब देणारे व संप्रदायाची समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. बये दार उघड म्हणत शोषीत व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागृत करणाऱ्या संत एकनाथ महाराजांची विचारधारा समस्त वारकऱ्यांनी आज ही तेवत ठेवली आहे. सुमारे ४२५ वर्षापासून सुरू असलेल्या आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडा भरातून वारकरी नाथांच्या पैठण नगरीत जमा होत. पुढे आनंदाने 'भानुदास एकनाथ' असा जयघोष करित विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पालखीसोबत दरमजल करित रवाना होतात. परंतु, यंदा कोरोनामुळे पायी वारी सोहळा रद्द झाल्याने वारकऱ्यांना  पैठणला येता आले नाही.  रघुनाथ महाराज पालखीवाले व  मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत भानुदास एकनाथ अशा गजरात गावातील नाथमंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. 

गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर थोडावेळ विसावा घेऊन  पालखी बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, मुख्याधिकारी संतोष आगळे, अरूण काळे, दिनेश पारीख, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, महेश जोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, चंद्रकांत आंबिलवादे, सुरेश गायकवाड, विलास पोहेकर, समीर शुक्ल, सिध्दार्थ परदेशी, बंडू आंधळे, वैभव पोहेकर, सुरेश गायकवाड, गौतम बनकर,रमेश लिंबोरे आदीसह भाविक उपस्थित होते. 

वारीची परंपरा ४२५ वर्षांचीपैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४२५ वर्षाचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते; ते नियमीत पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्यानंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनीच नियमित केली. 

नाथांच्या पादुकांची वारीसंत एकनाथ महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली, ती आज तगायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना वारीची प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, एका वारीला तर नाथ महाराजांच्या पादुका गुपचूप घेऊन जाण्याचा प्रसंग हरिपंडित महाराजांवर ओढावला होता. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून  पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून हरिपंडित महाराजांनी निजामाची हद्द पार केली, परंतु वारी मात्र खंडीत होऊ दिली नाही असे जेष्ठ नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले. 

आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानूदास महाराज यांनी कर्नाटक (अनागोंदीच्या) राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून  पंढरपूर येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली असल्याचा इतिहास आहे. भानुदास महाराजांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात समाधी असून याच  कारनाने नाथमहाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAurangabadऔरंगाबाद