शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
2
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
3
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
4
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
5
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
6
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
7
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
8
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
9
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
10
Operation Sindoor Live Updates: थोड्याच वेळात परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद; पहाटे ५:४५ वाजता ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणार
11
रक्तसाठा मुबलक ठेवा; आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर; तातडीची बैठक : सचिवांच्या आरोग्य विभागाला सूचना
12
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
14
आयपीएल आठवडाभर स्थगित; बीसीसीआय : राष्ट्रहित सर्वांत महत्त्वाचे, नवे वेळापत्रक योग्य वेळी देणार
15
‘हॅलो, मुरली तुमचा कोण? अन् आईला भोवळ; शहीद नाईक यांचा ‘तो’ व्हिडीओ कॉल अखेरचा
16
सखे मी निघतो... परत या वाट पाहते; मेहंदीच्या हातांची ‘सिंदूर’ला पाठवणी
17
लेकीच्या वाढदिवसासाठी गावी आले; अवघ्या चार तासांतच कर्तव्यावर परतले
18
भारताचा संयम, पाकचा पर्यायांवर विचार; संघर्ष थांबण्याची चिन्हे दिसत आहेत का?
19
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
20
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

'भानुदास-एकनाथ' जयघोषात संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 17:40 IST

पायी वारी रद्द झाल्याने पालखी पुढील १८ दिवस श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात  मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.  

ठळक मुद्देआषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला 

पैठण : पंढरपूर येथील आषाढी सोहळयासाठी  गुरुवारी दुपारी नाथमहाराजांच्या पादुका असलेल्या पालखीचे मोजक्या मानकऱ्यासह गावातील नाथ मंदिरातून प्रस्थान झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  आषाढीवारीचा पायी सोहळा राज्य शासनाने रद्द केल्याने शासकीय निर्देशानुसार मोजक्या मानकऱ्यासह  टाळमृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले. 

पायी वारी रद्द झाल्याने पालखी पुढील १८ दिवस श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधी मंदिरात  मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.  दरम्यान आज पालखी मार्गावर अंगणात उभे राहून नागरिकांनी दुरुनच पालखीचे दर्शन घेऊन पुष्पवृष्टी केली. सलग दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा रद्द झाल्याने  सोहळ्यासोबत नियमित वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मात्र मोठी रूखरूख लागल्याचे दिसून आले.  वारकरी संप्रदायास भागवत रूपी खांब देणारे व संप्रदायाची समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज होय. बये दार उघड म्हणत शोषीत व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागृत करणाऱ्या संत एकनाथ महाराजांची विचारधारा समस्त वारकऱ्यांनी आज ही तेवत ठेवली आहे. सुमारे ४२५ वर्षापासून सुरू असलेल्या आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडा भरातून वारकरी नाथांच्या पैठण नगरीत जमा होत. पुढे आनंदाने 'भानुदास एकनाथ' असा जयघोष करित विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पालखीसोबत दरमजल करित रवाना होतात. परंतु, यंदा कोरोनामुळे पायी वारी सोहळा रद्द झाल्याने वारकऱ्यांना  पैठणला येता आले नाही.  रघुनाथ महाराज पालखीवाले व  मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत भानुदास एकनाथ अशा गजरात गावातील नाथमंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. 

गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर थोडावेळ विसावा घेऊन  पालखी बाहेरील नाथ मंदिरात नेण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष सुरज लोळगे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, पोलीस निरीक्षक किशोर पवार, मुख्याधिकारी संतोष आगळे, अरूण काळे, दिनेश पारीख, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, महेश जोशी, श्रीकृष्ण कुलकर्णी, चंद्रकांत आंबिलवादे, सुरेश गायकवाड, विलास पोहेकर, समीर शुक्ल, सिध्दार्थ परदेशी, बंडू आंधळे, वैभव पोहेकर, सुरेश गायकवाड, गौतम बनकर,रमेश लिंबोरे आदीसह भाविक उपस्थित होते. 

वारीची परंपरा ४२५ वर्षांचीपैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४२५ वर्षाचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते; ते नियमीत पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्यानंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनीच नियमित केली. 

नाथांच्या पादुकांची वारीसंत एकनाथ महाराज यांच्यानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली, ती आज तगायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना वारीची प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, एका वारीला तर नाथ महाराजांच्या पादुका गुपचूप घेऊन जाण्याचा प्रसंग हरिपंडित महाराजांवर ओढावला होता. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून  पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून हरिपंडित महाराजांनी निजामाची हद्द पार केली, परंतु वारी मात्र खंडीत होऊ दिली नाही असे जेष्ठ नाथवंशज हभप रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले. 

आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानूदास महाराज यांनी कर्नाटक (अनागोंदीच्या) राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून  पंढरपूर येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली असल्याचा इतिहास आहे. भानुदास महाराजांची पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात समाधी असून याच  कारनाने नाथमहाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे. 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकAurangabadऔरंगाबाद