शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

विभागीय टपाल कार्यालय रातोरात लातूरला हलविले..!

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविले

उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने दिली. यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.१९७२ पासून उस्मानाबाद येथे हे कार्यालय कार्यान्वित होते. उस्मानाबादमधून लातूर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर या जिल्ह्यासाठी विभागीय टपाल कार्यालयाची निर्मिती होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने उस्मानाबाद येथीलच टपाल कार्यालय लातूरला हलविण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर-२०१६ मध्ये याची कुणकुण टपाल कर्मचारी संघटनेला लागल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन दिले होते. यावर आ. पाटील यांनीही औरंगाबाद येथील जनरल पोस्ट मास्तर यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर न करण्याचे सूचविले होते. यावर पोस्ट मास्तरांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु सर्वांना अंधारात ठेवत हे कार्यालय लातूरला हलविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वास्तविक अशा प्रकारच्या स्थानांतर करण्यासाठी पुरेसा अवधी देणे आवश्यक होते. तसेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ही बाब अगोदर जाहीर करायला हवी होती. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना स्वतंत्र टपाल विभागीय कार्यालय आहे. एवढेच नाही तर सोलापूर (सोलापूर व पंढरपूर), नाशिक (मालेगाव व नाशिक), जवळगाव (भुसावळ व जळगाव) यांसारख्या अनेक जिल्ह्यात दोन टपाल विभाग कार्यरत आहेत. लातूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र टपाल विभागाचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर रखडला आहे. त्याबाबत निर्णय घेण्याऐवजी प्रशासनाने उस्मानाबाद येथील कार्यालय लातूरला स्थलांतरित करून जिल्ह्यावर अन्याय केल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)