शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय टपाल कार्यालय रातोरात लातूरला हलविले..!

By admin | Updated: April 16, 2017 23:20 IST

उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविले

उस्मानाबाद : उस्मानाबादसह लातूर जिल्ह्यासाठी संयुक्तरित्या येथे चालविण्यात येणाऱ्या टपाल विभागाचे विभागीय मुख्यालय प्रशासनाने १३ एप्रिल रोजी रातोरात लातूरला हलविल्याची माहिती उस्मानाबाद जिल्हा अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेने दिली. यामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांत संताप व्यक्त होत आहे.१९७२ पासून उस्मानाबाद येथे हे कार्यालय कार्यान्वित होते. उस्मानाबादमधून लातूर जिल्हा स्वतंत्र झाल्यानंतर या जिल्ह्यासाठी विभागीय टपाल कार्यालयाची निर्मिती होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने उस्मानाबाद येथीलच टपाल कार्यालय लातूरला हलविण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर-२०१६ मध्ये याची कुणकुण टपाल कर्मचारी संघटनेला लागल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. राणाजगजितसिंह पाटील यांना निवेदन दिले होते. यावर आ. पाटील यांनीही औरंगाबाद येथील जनरल पोस्ट मास्तर यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचा प्रस्ताव मंजूर न करण्याचे सूचविले होते. यावर पोस्ट मास्तरांनी असा कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु सर्वांना अंधारात ठेवत हे कार्यालय लातूरला हलविल्याचा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वास्तविक अशा प्रकारच्या स्थानांतर करण्यासाठी पुरेसा अवधी देणे आवश्यक होते. तसेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ही बाब अगोदर जाहीर करायला हवी होती. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना स्वतंत्र टपाल विभागीय कार्यालय आहे. एवढेच नाही तर सोलापूर (सोलापूर व पंढरपूर), नाशिक (मालेगाव व नाशिक), जवळगाव (भुसावळ व जळगाव) यांसारख्या अनेक जिल्ह्यात दोन टपाल विभाग कार्यरत आहेत. लातूर जिल्ह्यासाठी स्वतंत्र टपाल विभागाचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून वरिष्ठ पातळीवर रखडला आहे. त्याबाबत निर्णय घेण्याऐवजी प्रशासनाने उस्मानाबाद येथील कार्यालय लातूरला स्थलांतरित करून जिल्ह्यावर अन्याय केल्याची भावना संघटनेने व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)